शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जलतरण तलावांतील सायंकाळची बॅच बंद

By admin | Updated: October 21, 2015 22:44 IST

पाणीकपातीचा परिणाम : महापालिकेने घेतला निर्णय

नाशिक : गंगापूर धरणातील उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेऊन महानगरपालिकेने दि. ९ आॅक्टोबरपासून पाणीकपात घोषित केल्यानंतर शहरातील मनपाच्या मालकीच्या पाचही जलतरण तलावांतील पाणीबचतीसाठी सायंकाळची बॅच बंद करण्यात आल्याची माहिती अधीक्षक अभियंता यू. बी. पवार यांनी दिली.पावसाने दिलेली ओढ आणि गंगापूर धरणात ७० टक्के पाणीसाठा लक्षात घेऊन भविष्यात पाणीसंकट ओढवू नये, यासाठी महानगरपालिकेने सावधानता बाळगत दि. ९ आॅक्टोबरपासून शहरात एकवेळ पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्यासाठी पाणीपुरवठ्याचे विभागनिहाय वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. पाणीकपातीच्या घोषणेप्रसंगीच महापौरांनी शहरातील वॉटरपार्क, जलतरण तलाव यांचा पाणीपुरवठाही बंद करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार, दि. १३ आॅक्टोबरपासून शहरातील मनपाच्या मालकीच्या पाचही जलतरण तलावांमध्ये पाणीबचतीचे धोरण अवलंबिले जात असून, केवळ सकाळची बॅच सुरू ठेवत सायंकाळची बॅच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरात त्र्यंबकरोडवरील वीर सावरकर जलतरण तलावासह नाशिकरोड, सिडको, सातपूर आणि पंचवटी याठिकाणी महापालिकेचे जलतरण तलाव आहेत. पाचही जलतरण तलावमिळून सुमारे एक लाख लिटर्स पाणी लागते. याशिवाय जलतरण तलावांमध्ये शॉवर्सचीही व्यवस्था आहे. सुमारे पाच हजार सभासद असून, सकाळ-सायंकाळ बॅचेस चालतात. पाणीकपातीच्या धोरणामुळे आता केवळ सकाळची बॅच सुरू ठेवण्यात येणार असल्याचे यू. बी. पवार यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

सराव : राज्य-राष्ट्रीय खेळाडूंची मागणी

महापालिकेने पाणीकपातीमुळे सायंकाळची बॅच बंद केल्याने विविध राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या सरावावर परिणाम झाला आहे. बव्हंशी खेळाडू हे सायंकाळी ७ ते ८ या वेळेत सरावासाठी जलतरण तलावांवर येत असतात. मोजक्या संख्येने असलेल्या या खेळाडूंच्या सरावात खंड पडू नये यासाठी त्यांच्यासाठी सायंकाळी जलतरण तलाव खुले ठेवण्याची मागणी संबंधित खेळाडूंनी महापालिकेकडे केली आहे. या खेळाडूंच्या मागणीवर विचार सुरू असल्याची माहिती यू. बी. पवार यांनी दिली.