शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

जलतरण तलावांतील सायंकाळची बॅच बंद

By admin | Updated: October 21, 2015 22:44 IST

पाणीकपातीचा परिणाम : महापालिकेने घेतला निर्णय

नाशिक : गंगापूर धरणातील उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेऊन महानगरपालिकेने दि. ९ आॅक्टोबरपासून पाणीकपात घोषित केल्यानंतर शहरातील मनपाच्या मालकीच्या पाचही जलतरण तलावांतील पाणीबचतीसाठी सायंकाळची बॅच बंद करण्यात आल्याची माहिती अधीक्षक अभियंता यू. बी. पवार यांनी दिली.पावसाने दिलेली ओढ आणि गंगापूर धरणात ७० टक्के पाणीसाठा लक्षात घेऊन भविष्यात पाणीसंकट ओढवू नये, यासाठी महानगरपालिकेने सावधानता बाळगत दि. ९ आॅक्टोबरपासून शहरात एकवेळ पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्यासाठी पाणीपुरवठ्याचे विभागनिहाय वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. पाणीकपातीच्या घोषणेप्रसंगीच महापौरांनी शहरातील वॉटरपार्क, जलतरण तलाव यांचा पाणीपुरवठाही बंद करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार, दि. १३ आॅक्टोबरपासून शहरातील मनपाच्या मालकीच्या पाचही जलतरण तलावांमध्ये पाणीबचतीचे धोरण अवलंबिले जात असून, केवळ सकाळची बॅच सुरू ठेवत सायंकाळची बॅच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरात त्र्यंबकरोडवरील वीर सावरकर जलतरण तलावासह नाशिकरोड, सिडको, सातपूर आणि पंचवटी याठिकाणी महापालिकेचे जलतरण तलाव आहेत. पाचही जलतरण तलावमिळून सुमारे एक लाख लिटर्स पाणी लागते. याशिवाय जलतरण तलावांमध्ये शॉवर्सचीही व्यवस्था आहे. सुमारे पाच हजार सभासद असून, सकाळ-सायंकाळ बॅचेस चालतात. पाणीकपातीच्या धोरणामुळे आता केवळ सकाळची बॅच सुरू ठेवण्यात येणार असल्याचे यू. बी. पवार यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

सराव : राज्य-राष्ट्रीय खेळाडूंची मागणी

महापालिकेने पाणीकपातीमुळे सायंकाळची बॅच बंद केल्याने विविध राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या सरावावर परिणाम झाला आहे. बव्हंशी खेळाडू हे सायंकाळी ७ ते ८ या वेळेत सरावासाठी जलतरण तलावांवर येत असतात. मोजक्या संख्येने असलेल्या या खेळाडूंच्या सरावात खंड पडू नये यासाठी त्यांच्यासाठी सायंकाळी जलतरण तलाव खुले ठेवण्याची मागणी संबंधित खेळाडूंनी महापालिकेकडे केली आहे. या खेळाडूंच्या मागणीवर विचार सुरू असल्याची माहिती यू. बी. पवार यांनी दिली.