शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

क्रशर बंद करा; ग्रामस्थांचा ठिय्या

By admin | Updated: April 13, 2015 00:06 IST

कोळोशी-आयनल हद्दीतील घटना : नायब तहसीलदारांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

नांदगाव : गेली अनेक वर्षे कोळोशी- आयनल मणेरवाडी हद्दीत सुरू असलेल्या क्रशरमुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले असून या त्रासामुळे अक्षरश: जीव मुठीत घेऊन येथील ग्रामस्थ जीवन जगत आहेत. यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीही संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे हा क्रशर त्वरित बंद करावा, या मागणीसाठी कोळोशी व आयनलच्या ग्रामस्थांनी क्रशर परिसरात रविवारी सकाळी ठिय्या मांडला. अखेर महसूलच्या निवडणूक नायब तहसीलदार कांता खटावकर यांच्या आश्वासनानंतर संतप्त ग्रामस्थांनी ठिय्या सोडला. मात्र, आश्वासनांची पूर्तता न झाल्यास ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असेही ग्रामस्थांनी सांगितले.२००१ पासून कोळोशी व आयनल सीमेवर हा क्रशर सुरू झाला. त्यावेळी हा क्रशर याठिकाणी होऊ नये यासाठी ग्रामस्थांनी विरोधही केला होता. अनेक लोकप्रतिनिधींशी पत्रव्यवहार करून त्यातील भिषणता व भविष्यातील समस्या लक्षात आणून दिल्या. मात्र, क्रशरला मान्यता मिळून सुरूवातही झाली. या क्रशर परिसरात आयनल- कोळोशीमधील सुमारे ४० कुटुंबे येत असून यातून निर्माण होणाऱ्या धुळीचा परिणाम, गुरे, फळझाडे यांच्यासह ग्रामस्थांनाही जाणवतो. यामुळे सुमारे एक ते दीड किलोमीटर परिसरात धुळीचा थर पसरत असून या क्रशरमध्ये लावण्यात येणाऱ्या सुरूंगाचाही दुष्परिणाम या ग्रामस्थांना जाणवतो. अचानक केव्हाही लावण्यात येणाऱ्या सुरूंगाच्या स्फोटामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे हा क्रशर त्वरित बंद करावा, अशी जोरदार मागणी केली.शनिवारी सायंकाळी क्रशर परिसरात सुरूंग लावण्यात आले. या सुरूंगामुळे परिसरातील फळबागेत काम करणारे कामगार व ग्रामस्थांत घबराट पसरली. शेजारच्या घरातील भांडी पडणे, भिंतींना जबरदस्त हादरा बसणे असे प्रकार घडले. हा भीतीदायक स्फोट दगड फोडण्यासाठी करण्यात आला. शनिवारी या स्फोटाची पूर्वकल्पना कोणालाही देण्यात आलेली नव्हती. गेली अनेक वर्षे असा नियमित त्रास सहन करावा लागत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी रविवारी सकाळी क्रशरच्या ठिकाणी येत क्रशर त्वरित बंद करावा, अशी मागणी करीत ठिय्या मांडला. तसेच जोपर्यंत शासकीय अधिकारी येत नाहीत तोपर्यंत जागा सोडणार नाही, यावर ग्रामस्थ ठाम राहिले.दरम्यान, जिल्हा परिषद सदस्या विभावरी खोत यांनी तहसीलदारांशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली असता महसूलचे अधिकारी पाठवितो, असे सांगण्यात आले. त्यानंतर निवडणूक नायब तहसीलदार कांता खटावकर घटनास्थळी आले. ग्रामस्थ व क्रशर मालक यांचे म्हणणे ऐकून घेऊन परिसरातील घरे, बागा व क्रशर यांची पाहणी केली. त्यानंतर काढलेली खडी, आतापर्यंत केलेले खोदकाम यांची पाहणी करून वस्तुस्थितीदर्शक पंचनामा केला. यावेळी नांदगावचे तलाठी वसंत कोतमिरे व महसूलचे लिपिक यु. जी. दळवी उपस्थित होते.खटावकर यांनी सोमवारी क्रशर सील करण्यासाठी कार्यवाही केली जाईल, असे सांगितल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. यावेळी कोळोशी व आयनल ग्रामस्थांनी नायब तहसीलदार खटावकर यांच्याकडे लोकांच्या जीविताचा प्रश्न असून भविष्यात उद्भवणारे गंभीर परिणाम लक्षात घेता या क्रशरबाबत ठोस कार्यवाही करावी, याबाबतचे निवेदन देण्यात आले. यावेळी निवडणूक नायब तहसीलदार कांता खटावकर, नांदगाव तलाठी वसंत कोतमिरे, यु. जी. दळवी, आयनल सरपंच हेमलता ओटवकर, ओटव सरपंच श्वेता ओटवकर, कोळोशी सरपंच सुशील इंदप, जिल्हा परिषद सदस्या विभावरी खोत, आयनल पोलीस पाटील दिलीप साटम, उपसरपंच दशरथ वायंगणकर, संघर्ष समिती सचिव भालचंद्र चव्हाण, सहसचिव उत्तम सावंत व कोळोशी- आयनलचे ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)..तर ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागेलयावेळी नायब तहसीलदार कांता खटावकर यांनी दिलेले आश्वासनाचे पालन न झाल्यास ग्रामस्थ आक्रमक होतील व त्यामुळे ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, अशी चर्चा ग्रामस्थांमधून होत होती. या क्रशरबाबत यावेळी ग्रामस्थांनी मात्र आक्रमकच पवित्रा घेतल्याचे आजचे चित्र दिसत होते.गेली १५ वर्षे हा क्रशर सुरू असून या क्रशरबाबत ग्रामस्थांच्या असलेल्या तक्रारी लक्षात घेऊन या परवान्याला नूतनीकरण देण्यात येऊ नये, अशी मागणी संघर्ष समितीने यापूर्वीच केली आहे. मात्र, नूतनीकरणाला परवानगी न देताना अनधिकृतपणे सुरू असलेल्या या क्रशरवर कार्यवाहीही तेवढ्याच डोळसपणे करावी, अशी मागणी करण्यात आली.या क्रशरबाबत शासनासह प्रशासनाला जाग यावी यासाठी २०१२ साली संघर्ष समिती स्थापन करण्यात आली. या संघर्ष समितीने शासनातील विविध लोकप्रतिनिधी व प्रशासनातील विविध अधिकाऱ्यांना लेखी निवेदनाद्वारे याचे गांभीर्य लक्षात आणून दिले. मात्र, संघर्ष समितीच्या या निवेदनाकडे कोणीच लक्ष दिले नाही. संघर्ष समितीचा गेली तीन वर्षे असाच संघर्ष सुरू होता. त्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक होत आता ठिय्या करण्याचा पवित्रा घेतला.