शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
4
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
6
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
7
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
8
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
9
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
10
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
11
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
12
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
13
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
14
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
15
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी
16
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; आतापर्यंत १४ मृत्यू ८० हून अधिक जखमी
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ४ ग्रहांचे गोचर ७ राशींना लाभ; धनलाभाची पुरेपूर संधी, नशिबाचीही साथ
18
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
19
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
20
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी

काळ्या दगडाच्या खाणी कायम स्वरूपी बंद करा ; जिल्हाधिकाऱ्याना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 13:49 IST

कणकवली तालुक्यातील कसवण गावात मोठया प्रमाणात गौण खनिज उत्खनन होत असल्याने पाणी टँचाई बरोबरच अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे गावातील काळ्या दगडाच्या खाणी कायम स्वरूपी बंद करण्यात याव्यात. अशी मागणी कसवण- तळवडे ग्रामपंचायतीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देकाळ्या दगडाच्या खाणी कायम स्वरूपी बंद करा कसवण ग्रामपंचायतीच्यावतीने मागणी; जिल्हाधिकाऱ्याना निवेदन

कणकवली : तालुक्यातील कसवण गावात मोठया प्रमाणात गौण खनिज उत्खनन होत असल्याने पाणी टँचाई बरोबरच अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे गावातील काळ्या दगडाच्या खाणी कायम स्वरूपी बंद करण्यात याव्यात. अशी मागणी कसवण- तळवडे ग्रामपंचायतीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या २० वर्षांपासून कसवण गावात पाणी टँचाई हा विषय तीव्र झाला असून भूजल साठा संवर्धनासाठी वेळोवेळी प्रयत्न केले जात आहेत. परंतु गावात होत असलेल्या गौण खनिज उत्खननामुळे या प्रयत्नांना अद्यापही यश मिळालेले नाही.दिवसेंदिवस भूजल पातळी खालावलेली आहे. याबाबत ग्रामसभेत चर्चा झाली आहे. तसेच या परिस्थितीस कारणीभूत असलेल्या काळ्या दगडाच्या खाणी तत्काळ बंद व्हाव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसा ठराव ग्रामसभेत मांडण्यात आला आहे.त्यामुळे या सर्व बाबींचा तांत्रिकदृष्ट्या अभ्यास करून खाणी बंद करण्यात याव्यात.कसवण गावात उंच सखल भूभाग असून सखल भागात थोड्याफार प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. परंतु अंदाजे ८० टक्के लोकवस्ती ही उंच भागात वसलेली आहे. तिथे कायमच पाणी टंचाई भासत असते.

उंच भागात कलेश्वरवाडी , गावकरवाडी, सावंतवाडी, चितरमूळ अशा वाडी वस्त्या आहेत. कलेश्वरवाडीपासून गावकरवाडी, सावंतवाडी असा एक नाला वाहत असतो. या नाल्याला फक्त पावसाळ्यात पाणी असते. परंतु या नाल्याला खोऱ्यातच फार पूर्वी पासूनच उदभव विहिरी आहेत. या विहिरींतून वस्तीला पुरेल असे पाणी उपलब्ध होत असे. शिवाय सावंतवाडीच्या टोकाला नाल्यावर ओझर नावाचा दगडी नैसर्गिक धबधबा होता.

या धबधब्याच्या खालील बाजूस बारमाही वाहणारा पाण्याचा झरा होता. त्याचा फायदा होत असे. मात्र, या परिसरात मोठ्या प्रमाणात दगड उत्खनन करण्यात आले आहे. घरांना भेगा पडणे असे प्रकारही घडले आहेत. ग्रामस्थांनी वेळोवेळी तक्रारी करूनही महसूल विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे.कोकण रेल्वे सुद्धा या भागातून अवघ्या १०० ते २०० मीटरवरून गेली आहे. कसवण नाला येथे कोकण रेल्वेचे मोठे ब्रिज आहे. मात्र , याकडे महसूल विभाग पूर्णतः दुर्लक्ष करीत आहे.गावात राष्ट्रीय पेयजल योजना , जलस्वराज्य योजना आणि आता जलयुक्त शिवार योजना राबविण्यात आली आहे. असे असताना शासनाचा महसूल विभाग खाण कामाला परवानगी देतो हा विरोधाभास आहे.

त्यामुळे पर्यावरणाची हानी थांबविण्यासाठी तसेच भूगर्भातील पाणीसाठा अबाधित राखण्याच्या दृष्टीने तांत्रिक व भुजलतज्ज्ञाची मते घेऊन कसवण गावातील खाणी ताबडतोब बंद करण्यात याव्यात.असेही या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, या निवेदनाची प्रत प्रांताधिकारी, तहसीलदार, तलाठी यांनाही देण्यात आली आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीsindhudurgसिंधुदुर्ग