शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

स्वच्छता अभियान १ मे पासून नव्या रुपात, संत गाडगेबाबा ऐवजी संत तुकडोजी महाराज अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 19:54 IST

शासन करोडोंनी रुपये खर्च करून राज्याच्या ग्रामीण भागात होऊ शकत नसलेली स्वच्छता व त्या अनुषंगाने प्रबोधन संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रात झाली. त्यामुळे विद्यमान सरकारने मागील सरकारचा उपक्रम कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, संत गाडगेबाबा ऐवजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामस्वच्छता असे या अभियानाला नाव देण्यात आले आहे.

ठळक मुद्देस्वच्छता अभियान १ मे पासून नव्या रुपातसंत गाडगेबाबा ऐवजी संत तुकडोजी महाराज अभियान तालुकास्तर वगळता स्पर्धेचे सर्व टप्पे कायम

सिंधुदुर्गनगरी : शासन करोडोंनी रुपये खर्च करून राज्याच्या ग्रामीण भागात होऊ शकत नसलेली स्वच्छता व त्या अनुषंगाने प्रबोधन संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रात झाली. त्यामुळे विद्यमान सरकारने मागील सरकारचा उपक्रम कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, संत गाडगेबाबा ऐवजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामस्वच्छता असे या अभियानाला नाव देण्यात आले आहे.

१ मे २०१८ पासून याची अंमलबजावणी सुरू होणार असून राज्यस्तरीय निकाल जाहीर करून २ आॅक्टोबर २०१९ रोजी बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. मागील स्पर्धेप्रमाणे जिल्हा परिषद गटापासूनचे फक्त तालुकास्तर वगळता स्पर्धेचे सर्व टप्पे कायम ठेवण्यात आले असून त्यापूर्वी ग्रामपंचायत स्तरावर प्रभाग हा टप्पा वाढविण्यात आला आहे.राज्यात ग्रामीण स्वच्छतेची व्याप्ती वाढावी, स्वच्छतेचे महत्त्व अधिक परिणामकारक ठरून ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबापर्यंत याचे महत्त्व पोहोचावे यासाठी हे अभियान नवीन दमात आणण्यात आले आहे.वैयक्तिक स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, मासिक पाळी व्यवस्थापन, पाणीपुरवठा व परिसर स्वच्छता या प्रमुख विषयांना यात प्राधान्य देण्यात आले आहे. १ ते १५ मे या कालावधीत राज्यस्तरावर पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मंत्री यांच्या स्तरावर राज्यस्तरीय बैठक तर जिल्हास्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गटविकास अधिकारी तालुकास्तरावर सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक-ग्रामविकास अधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच सभापती-उपसभापती, आमदार व खासदार यांची बैठक घेऊन याबाबत माहिती देणार आहेत.पंचायत समिती, जिल्हा परिषदेसाठी स्पर्धाराष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नावाने स्वच्छ पंचायत समिती व जिल्हा परिषद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गटविकास अधिकारी यांनी पंचायत समितीच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींना मिळालेल्या एकूण गुणांची बेरीज करून एकूण गुणांच्या ३५ टक्के गुण विचारात घेऊन त्यास एकूण ग्रामपंचायत संख्येने भागायचे. जे गुण येतील ते जिल्हा परिषदेजवळ सादर करावयाचे आहेत. राज्यात सर्वात जास्त गुण असणाºया पंचायत समित्यांना प्रथम तीन क्रमांक दिले जाणार आहेत. ५० लाख, ३० लाख व २० लाख असे अनुक्रमे प्रथम तीन क्रमांकाना बक्षीस असणार आहे. त्याचप्रमाणे राज्यात प्रथम येणाºया जिल्हा परिषदेला एक कोटी, द्वितीय ७५ लाख व तृतीय ५० लाख असे बक्षीस देण्यात येणार आहे.प्रत्येक स्तरावर भरघोस बक्षीसेग्रामपंचायत पातळीवर उत्कृष्ट प्रभागासाठी १० हजार रुपये, जिल्हा परिषद गटासाठी ५० हजार रुपये, जिल्हास्तर प्रथम ५ लाख, द्वितीय ३ लाख व तृतीय २ लाख, विभाग दहा लाख, आठ लाख व सहा लाख असे प्रथम तीन येणाºया ग्रामपंचायतींनी तर राज्यस्तर प्रथम २५ लाख, द्वितीय २० लाख व तृतीय १५ लाख रूपये.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानsindhudurgसिंधुदुर्ग