शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

अल्पायुष्यात माधवराव पेशवेंच्या स्वभावाची चुणूक

By admin | Updated: January 11, 2016 00:34 IST

चारूदत्त आफळे : इंग्लंडमध्ये किल्ले बांधण्यासाठी मागितली होती जागा

रत्नागिरी : माधवराव पेशवे मुत्सद्दी होते. अल्पायुष्यात त्यांनी त्यांच्या या स्वभावाची चुणूक दाखवली. इंग्रजांनी सत्ता प्रस्थापित करण्याच्या हेतूने व्यापारी कंपनीचा माल ठेवण्यासाठी वसई, साष्टीमध्ये किल्ले बांधण्याची परवानगी मागितली. पण माधवरावांनी इंग्लंडमध्ये आम्हालाही दोन किल्ले बांधण्यास जागा द्यावी, ती मिळाली की आम्हीसुद्धा परवानगी देऊ, असे सांगून इंग्रजाची बोळवण केली. माधवराव असेपर्यंत आपल्याला येथे हातपाय पसरता येणार नाहीत याची इंग्रजांना कल्पना आली, असे विवेचन करत राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळेबुवा यांनी पेशवाईची महती सांगितली.येथील स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे कीर्तनसंध्या परिवार आयोजित कीर्तन ङ्कमहोत्सवाच्या चौथ्या दिवशी आफळे बोलत होते. पानिपताच्या दुसऱ्या लढाईतील विजय आणि ङ्कमाधवराव पेशव्यांचे गुणवर्णन त्यांनी केले.उत्तररंगामध्ये ते म्हणाले की, पानिपतातील ङ्कमाघारीनंतर पराभव जिव्हारी लागला. त्यानंतर नानासाहेब पेशव्यांचे ५० दिवसांनी निधन झाले व त्यांच्या जागी १६ वर्षांच्या ङ्कमाधवराव पेशव्यांची निवड झाली. काका राघोबा (रघुनाथराव) याच्या कारस्थानी, अंत:स्थ स्वभावामुळे माधवरावांना शिंंदे, होळकर, रामशास्त्री प्रभुणे, नाना फडणवीस यांची भक्कम साथ मिळाली. अध्यात्माकडे वळलेल्या कोवळ्या वयातील माधवरावांची रामशास्त्रींनी कानउघाडणी केली. कलावंतीण, घरकामङ्क करणाऱ्या बायका, नोकर विकण्याची प्रथा रामशास्त्रींनी सर्वप्रथम बंद केली.आफळे यांनी सांगितले की, वीस वर्षांचा ङ्कमाधवराव कर्नाटक मोहिमेवर गेल्यानंतर राघोबाने पैठण लुटले. त्यादरम्यान पुणे लुटणाऱ्या निजामाला मदत करणाराङ्कमाधवरावांचाङ्कमामा त्र्यंबक याला ५० लाखांचा दंड रामशास्त्रींनी ठोठावला. त्यावेळी आईने दंड करू नको नाहीतर ङ्कमी घर सोडून जाईन व पुन्हा कधीही भेटणार नाही अशी ङ्कमाधवरावांना शपथ घातली. पण न्यायाच्या बाजूने उभे राहून दंड दिला आणि आई गोपिकाबार्इंनी शनिवारवाडा सोडला व त्या नाशिकला गेल्या. त्यानंतर या दोघांची कधीही भेट झाली नाही.माधवरावांबाबतचा एक किस्सा सांगितना आफळे म्हणाले की, पेशव्यांच्या परवानगीने इंग्रजांनी बंदरात उभ्या केलेल्या बोटींवरील माल विसाजी लेले यांनी लुटून स्वत:साठी ठेवला. त्या प्रकरणात न्यायदानावेळी न्यायासमोर पेशव्यांचा ङ्कमुलाहिजा ठेवणार नाही, असे रामशास्त्रींनी बजावले. त्याचा गैरअर्थ घेऊन राघोबाने रामशास्त्रींना माधवरावांसमोर उभे केले. पण माझे विधान बदलणार नाही, असे सांगितल्यानंतर ङ्कमाधवरावांनीही रामशास्त्रींना ङ्कमोत्यांची ङ्कमाळ व खंजीर दिला व ङ्कमाझ्याबाबतीतही असाच न्याय करा, असे सांगितले. ‘‘पानिपतावरील पहिल्या लढाईत झालेल्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी आठ वर्षांनी ५५ हजारांची ङ्कमराठी फौज पानिपतावर गेली. क्षय झाल्यामुळे ङ्कमाधवरावांना जाता आले नाही. पण त्यांनी ‘उत्तरक्रीया’ म्हणजे उत्तर दिशेला पानिपतावर ङ्कमारल्या गेलेल्या ङ्कमराठ्यांचे श्राद्ध न करता विजय मिळवून उत्तरक्रीया करा, असा आदेश दिला. या लढाईत ङ्कमराठे विजयी झाले. यावर स्वा. सावरकरांनी उत्तरक्रीया हे नाटक लिहिले आहे. लढाईनंतर थेऊरच्या गणेशासमोर माधवरावांनी प्राण सोडला. यावेळी आफळे यांनी सादर केलेले ‘अन्यायासी राजा न करी जरी दंड, तेजोनिधी लोहगोल’ हे नाट्यपद सुरेख झाले. (प्रतिनिधी)पाने वाहण्यापेक्षा बेल झाडे लावाआफळे यांनी पूर्वरंगामध्ये ‘शरण हनुमंता’ या अभंगावर निरूपण केले. हनुमंताची भक्ती व नवविधा भक्ती वर्णन केली. आपण अमराठी प्रांतात गेलो की तिथली भाषा लगेच शिकतो. पण अन्य भाषिक मातृभाषेला विसरत नाहीत. त्यामुळे आपण संस्कृत व मराठीची जोपासना केली पाहिजे. परिस्थितीनुसार पद्धती बदलायला हव्यात. पूर्वी अकरा लाख बेलपत्रे वाहत असत. आता झाडं तोडली गेली म्हणून आता बेलाची पानं वाहण्याऐवजी अकरा बेलाची झाडं लावायला हवीत. हेच खरे पूजन होय, असा समाजोपयोगी संदेश आफळे यांनी यावेळी दिला.