शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

चिपळूण, पाली, लांजात उड्डाणपूल

By admin | Updated: September 11, 2016 00:27 IST

डिसेंबरपासून कामाला प्रारंभ : राजापूर वगळता सर्व वाद निकाली

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरण कामासाठी राजापूर वगळता दोन्ही जिल्ह्यांतील वादाचे सर्व मुद्दे निकाली निघाले आहेत. चिपळूण, पाली, लांजा व कणकवली येथे उड्डाणपूल होणार आहेत, तर सिंधुदुर्गमधील वागदे, कुडाळ येथे चौपदरीकरणाची रुंदी ४५ मीटर्स ठेवण्याचा निर्णयही मान्य झाला आहे. खासदार विनायक राऊत यांनी आज (शनिवारी) प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. ‘श्री रत्नागिरीचा राजा’ गणेशाचे दर्शन घेण्यासाठी खासदार राऊत रत्नागिरीत आले असता, प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यांच्यासोबत सेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, आमदार उदय सामंत व अन्य पक्षपदाधिकारी उपस्थित होते. मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात भूसंपादनाबाबतची कार्यवाही जोरात सुरू आहे. भूसंपादनाबाबतची कार्यवाही पूर्ण होत आल्याने येत्या डिसेंबर महिन्यात चौपदरीकरणाच्या कामाला प्रत्यक्षात सुरूवात होईल, असे राऊत म्हणाले. बावनदी ते संगमेश्वर हा रत्नागिरी जिल्ह्यातील तर कणकवली ते कुडाळ हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्ग भाग खड्डेमय बनल्याने गणेशोत्सवापूर्वी हे खड्डे भरण्यात आले. मात्र, त्यामुळे वाहतुकीला फारसा दिलासा मिळालेला नाही. गणेशभक्तांना खाचखळग्यातूनच प्रवास करावा लागल्याचे प्रसारमाध्यमांनी खासदार राऊत यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे या दोन्ही ठिकाणांच्या दरम्यान पूर्ण दुरुस्तीसाठी प्रयत्न केले जातील, असे खासदार राऊत म्हणाले. रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे दोन्ही जिल्हे डोंगराळ भागात येतात. त्यामुळे येथील भौगोलिक स्थितीचा विचार करून विकासकामांबाबत निर्णय घेणे आवश्यक आहे. या दोन्ही जिल्ह्यांत प्रत्येकी ६०० प्रमाणे १२०० साकव दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, त्यावरील खर्चासाठी स्वतंत्र शीर्षकांतर्गत निधीची व्यवस्था नाही. शासनाने दोन्ही जिल्ह्यांतील साकव दुरुस्तीस निधीची व्यवस्था केल्यास साकवांची समस्या मार्गी लागेल, असे राऊत म्हणाले. (प्रतिनिधी) सी - वर्ल्डला विरोध योग्यच...मालवण तालुक्यातील तोंडवळी-वायंगणी येथे प्रस्तावित असलेल्या सी -वर्ल्ड प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. त्या गावातील जागा सुपीक असल्याने लोकांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प देवगड तालुक्यातील मुणगे किनाऱ्यावर किवा वेंगुर्लेमध्ये होऊ शकेल. देवगडमध्ये २००७ पासून रखडलेला ९० कोटी खर्चाचा आनंदवाडी फिशिंग हार्बर प्रकल्प आता मंजुरीच्या प्रक्रियेत आहे. त्यामुळे याच तालुक्यातील मुणगे येथील किनाऱ्यावर सी-वर्ल्ड प्रकल्प उभारण्यास तेथील ग्रामस्थही अनुकुल आहेत. देवगड-मुणगेप्रमाणेच वेंगुर्ले तालुक्यातही या प्रकल्पासाठी जागा पाहणी केली जाणार आहे, असे खासदार राऊत यांनी सांगितले. पनवेल-रत्नागिरी रेल्वे कायम होणे शक्यगणेशभक्तांना परतीसाठी रत्नागिरी ते पनवेल दरम्यान रेल्वेगाडी सोडण्यात आली आहे. ही गाडी कायम होण्याची शक्यता आहे. तर वसई ते सावंतवाडी अशी कायमस्वरूपी रेल्वेगाडी सुरू करावी, अशी विनंती आपण कोकण रेल्वे चेअरमन संजय गुप्ता यांच्याकडे केली आहे. त्यांच्याशी याबाबत चर्चाही झाल्याचे खासदार राऊत म्हणाले.