शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

कौल मिळताच चिंदर गाव पुन्हा भरला; तीन दिवस लुटला आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 00:36 IST

आचरा : परंपरा जपणाऱ्या चिंदर गावची गावपळण पूर्ण झाल्याचा कौल ग्रामदैवत रवळनाथाने दिल्याने तीन दिवसांनी गावकरी गावात परतले. ग्रामस्थांनी ...

आचरा : परंपरा जपणाऱ्या चिंदर गावची गावपळण पूर्ण झाल्याचा कौल ग्रामदैवत रवळनाथाने दिल्याने तीन दिवसांनी गावकरी गावात परतले. ग्रामस्थांनी सहजीवनाचा आनंद लुटून पुन्हा गाव गाठला आहे.दर तीन वर्षांनी होणाºया गावपळणीकरिता यावर्षी तब्बल १० वर्षांनी कौल दिल्याने १ ते ४ डिसेंबर या कालावधीत ही गावपळण झाली. मुंबईचे चाकरमानी, नातेवाईक, शेजारील गावातील ग्रामस्थ या गावपळणीमध्ये उत्साहाने सहभागी झाले होते. गावाच्या सीमेलगतच्या आचरा, वायंगणी, कालावल, त्रिंबक येथे चिंदरवासीय झोपड्या उभारून आपले संसार थाटून राहिले होते. निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचा अनोखा अनुभव गावकºयांनी घेतला.तीन रात्रींच्या मुक्कामानंतर देव रवळनाथाचा कौल झाल्याने चिंदरवासीय मंगळवारी मिळेल त्या वाहनाने घराकडे धाव घेताना दिसत होते. ठिकठिकाणी थाटलेले आपले तात्पुरते संसार झटक्यात आवरताना दिसत होते. देवाच्या श्रद्धेपोटी ग्रामस्थ गावपळण कालावधीत रानावनात, काट्याकुट्यात निवांतपणे राहत होते. देवावरील श्रद्धेमुुळेच कोणत्याही अनुचित प्रकाराला सामोरे जावे लागले नाही, असे ग्रामस्थ अभिमानाने सांगत होते. सोशय मीडियावर गाव भरण्याचा कौल काही क्षणातच चिंदरवासीयांपर्यंत पोहोचल्याने तत्काळ ग्रामस्थ गावी येण्यास सुरुवात होऊन गावाचे जीवनमान पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली.