शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांची दलाली दोन दिवसांत उघड करणार

By admin | Updated: February 15, 2016 01:15 IST

नारायण राणे : मुख्यमंत्र्याशी ‘पालघर’च्या प्रचारातील भाषा असंस्कृत

लांजा : मुख्यमंत्र्यांनी पालघर पोटनिवडणुकीच्या प्रचारात माझा ‘दलाल’ असा उल्लेख केला होता. ही भाषा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शोभणारी नाही. परंतु, येत्या दोन दिवसांत मी मुंबईत जाऊन यांची दलाली दाखवून देणार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, त्यावेळी नागपूरच्या काही लोकांनी येऊन मोठमोठी कार्यालये थाटली, काम करून द्यायला! देवेंद्रजी, याला दलाली म्हणतात. मुंबईत जाहीर पत्रकार परिषद घेऊन मी ही सर्व दलाली दाखवून देईन, असा स्पष्ट इशारा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिला.लांजा येथे सुमित्रा देसाई नागरी महिला पतसंस्था व कोकण किंग अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनी या दोन संस्थांच्या उद्घाटन समारंभासाठी लांजा येथे आले असता राणे बोलत होते. राणे पुढे म्हणाले की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काय भाषा वापरावी, ही त्यांना संस्कृतीच राहिली नाही. काही दिवसांपूर्वी मी पालघर येथील पोटनिवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराला गेलो होतो. त्या ठिकाणी मुख्यमंत्री गेले असता त्यांनी माझ्यावर टीका केली. ते म्हणाले होते की, इथे प्रचाराला कोकणचे नेते आले होते. हे नेते नाहीत, दलाल आहेत. मुख्यमंत्र्यांच्या तोंडात अशी भाषा शोभते का? पण मीसुद्धा ‘यांची’ दलाली दाखवून देईन. दोन दिवसांतच मुंबईला जाऊन त्यांनी काय काय दलाली दिली, हे दाखवून देणार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, तेव्हा नागपूरच्या काही लोकांनी मुंबईत येऊन मोठमोठी कार्यालये थाटली, काम करून द्यायला! जाहीर पत्रकार परिषद घेऊन हे सर्व उघड करणार असल्याचे ते म्हणाले.मुख्यमंत्री आता राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्याचा कांगावा करत आहेत. परंतु, एका वर्षात राज्य सक्षम होत नाही. काँग्रेसने गेल्या ५० वर्षांत केलेल्या कामाचे हे मुख्यमंत्री आता सादरीकरण करत आहेत व स्वत:ची पाठ थोपटून घेत आहेत. हे सर्व श्रेय काँग्रेसचे आहे, असे राणे म्हणाले.यावेळी नीलेश राणे उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, विरोधक आमच्या ‘स्टाईल’ची कॉपी करू शकतात. परंतु, विकास करू शकत नाहीत. जैतापूर आयलॉग प्रकल्पाला विरोध, आता चौपदरीकरणालाही त्यांचा विरोध! यांचा सर्वच गोष्टीला विरोध. मग कोकणचा विकास कसा साधणार? शौचालय व पाणी वाटपात मोठा भ्रष्टाचार होत आहे. लोकांना मिळालेले अनुदान जोपर्यंत लोकांपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही. वेळ पडल्यास रस्त्यावर उतरू आणि निकृष्ट दर्जाची शौचालये तोडून टाकू, असा इशारा माजी खासदार राणे यांनी दिला. अनघा निकम यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा चारुलता डोळस, अशी भाषा शोभते का? पण मीसुद्धा ‘यांची’ दलाली दाखवून देईन. दोन दिवसांतच मुंबईला जाऊन त्यांनी काय काय दलाली दिली, हे दाखवून देणार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, तेव्हा नागपूरच्या काही लोकांनी मुंबईत येऊन मोठमोठी कार्यालये थाटली, काम करून द्यायला! जाहीर पत्रकार परिषद घेऊन हे सर्व उघड करणार असल्याचे ते म्हणाले.मुख्यमंत्री आता राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्याचा कांगावा करत आहेत. परंतु, एका वर्षात राज्य सक्षम होत नाही. काँग्रेसने गेल्या ५० वर्षांत केलेल्या कामाचे हे मुख्यमंत्री आता सादरीकरण करत आहेत व स्वत:ची पाठ थोपटून घेत आहेत. हे सर्व श्रेय काँग्रेसचे आहे, असे राणे म्हणाले.यावेळी नीलेश राणे उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, विरोधक आमच्या ‘स्टाईल’ची कॉपी करू शकतात. परंतु, विकास करू शकत नाहीत. जैतापूर आयलॉग प्रकल्पाला विरोध, आता चौपदरीकरणालाही त्यांचा विरोध! यांचा सर्वच गोष्टीला विरोध. मग कोकणचा विकास कसा साधणार? शौचालय व पाणी वाटपात मोठा भ्रष्टाचार होत आहे. लोकांना मिळालेले अनुदान जोपर्यंत लोकांपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही. वेळ पडल्यास रस्त्यावर उतरू आणि निकृष्ट दर्जाची शौचालये तोडून टाकू, असा इशारा माजी खासदार राणे यांनी दिला. अनघा निकम यांनी सूत्रसंचालन केले.यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा चारुलता डोळस, माजी खासदार नीलेश राणे, नीलम राणे, नगराध्यक्षा संपदा वाघधरे, राजापूर नगराध्यक्षा मीना मालपेकर, दत्ताराम चाळके, सुहास बने, सुरेश साळुंखे, विजय भोसले, किरण नाईक, रिलायन्स एजन्सी मुंबईचे भारतभूषण शर्मा, संजीव भान, किशोर मोरे, महेंद्र चव्हाण, शांताराम गाडे, सुमित्रा देसाई, महिला नागरी पतसंस्था संस्थापक राजन देसाई, कोकण किंग अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष ऋषिनाथ पत्याणे, पतसंस्थेच्या अध्यक्षा अनुराधा राणे, रवींद्र नागरेकर, अनामिका जाधव, संभाजी काजरेकर, सुरेश बाईत, प्रसन्न शेट्ये, प्रकाश लांजेकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)