शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

मुख्यमंत्र्यांची दलाली दोन दिवसांत उघड करणार

By admin | Updated: February 15, 2016 01:15 IST

नारायण राणे : मुख्यमंत्र्याशी ‘पालघर’च्या प्रचारातील भाषा असंस्कृत

लांजा : मुख्यमंत्र्यांनी पालघर पोटनिवडणुकीच्या प्रचारात माझा ‘दलाल’ असा उल्लेख केला होता. ही भाषा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शोभणारी नाही. परंतु, येत्या दोन दिवसांत मी मुंबईत जाऊन यांची दलाली दाखवून देणार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, त्यावेळी नागपूरच्या काही लोकांनी येऊन मोठमोठी कार्यालये थाटली, काम करून द्यायला! देवेंद्रजी, याला दलाली म्हणतात. मुंबईत जाहीर पत्रकार परिषद घेऊन मी ही सर्व दलाली दाखवून देईन, असा स्पष्ट इशारा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिला.लांजा येथे सुमित्रा देसाई नागरी महिला पतसंस्था व कोकण किंग अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनी या दोन संस्थांच्या उद्घाटन समारंभासाठी लांजा येथे आले असता राणे बोलत होते. राणे पुढे म्हणाले की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काय भाषा वापरावी, ही त्यांना संस्कृतीच राहिली नाही. काही दिवसांपूर्वी मी पालघर येथील पोटनिवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराला गेलो होतो. त्या ठिकाणी मुख्यमंत्री गेले असता त्यांनी माझ्यावर टीका केली. ते म्हणाले होते की, इथे प्रचाराला कोकणचे नेते आले होते. हे नेते नाहीत, दलाल आहेत. मुख्यमंत्र्यांच्या तोंडात अशी भाषा शोभते का? पण मीसुद्धा ‘यांची’ दलाली दाखवून देईन. दोन दिवसांतच मुंबईला जाऊन त्यांनी काय काय दलाली दिली, हे दाखवून देणार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, तेव्हा नागपूरच्या काही लोकांनी मुंबईत येऊन मोठमोठी कार्यालये थाटली, काम करून द्यायला! जाहीर पत्रकार परिषद घेऊन हे सर्व उघड करणार असल्याचे ते म्हणाले.मुख्यमंत्री आता राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्याचा कांगावा करत आहेत. परंतु, एका वर्षात राज्य सक्षम होत नाही. काँग्रेसने गेल्या ५० वर्षांत केलेल्या कामाचे हे मुख्यमंत्री आता सादरीकरण करत आहेत व स्वत:ची पाठ थोपटून घेत आहेत. हे सर्व श्रेय काँग्रेसचे आहे, असे राणे म्हणाले.यावेळी नीलेश राणे उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, विरोधक आमच्या ‘स्टाईल’ची कॉपी करू शकतात. परंतु, विकास करू शकत नाहीत. जैतापूर आयलॉग प्रकल्पाला विरोध, आता चौपदरीकरणालाही त्यांचा विरोध! यांचा सर्वच गोष्टीला विरोध. मग कोकणचा विकास कसा साधणार? शौचालय व पाणी वाटपात मोठा भ्रष्टाचार होत आहे. लोकांना मिळालेले अनुदान जोपर्यंत लोकांपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही. वेळ पडल्यास रस्त्यावर उतरू आणि निकृष्ट दर्जाची शौचालये तोडून टाकू, असा इशारा माजी खासदार राणे यांनी दिला. अनघा निकम यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा चारुलता डोळस, अशी भाषा शोभते का? पण मीसुद्धा ‘यांची’ दलाली दाखवून देईन. दोन दिवसांतच मुंबईला जाऊन त्यांनी काय काय दलाली दिली, हे दाखवून देणार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, तेव्हा नागपूरच्या काही लोकांनी मुंबईत येऊन मोठमोठी कार्यालये थाटली, काम करून द्यायला! जाहीर पत्रकार परिषद घेऊन हे सर्व उघड करणार असल्याचे ते म्हणाले.मुख्यमंत्री आता राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्याचा कांगावा करत आहेत. परंतु, एका वर्षात राज्य सक्षम होत नाही. काँग्रेसने गेल्या ५० वर्षांत केलेल्या कामाचे हे मुख्यमंत्री आता सादरीकरण करत आहेत व स्वत:ची पाठ थोपटून घेत आहेत. हे सर्व श्रेय काँग्रेसचे आहे, असे राणे म्हणाले.यावेळी नीलेश राणे उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, विरोधक आमच्या ‘स्टाईल’ची कॉपी करू शकतात. परंतु, विकास करू शकत नाहीत. जैतापूर आयलॉग प्रकल्पाला विरोध, आता चौपदरीकरणालाही त्यांचा विरोध! यांचा सर्वच गोष्टीला विरोध. मग कोकणचा विकास कसा साधणार? शौचालय व पाणी वाटपात मोठा भ्रष्टाचार होत आहे. लोकांना मिळालेले अनुदान जोपर्यंत लोकांपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही. वेळ पडल्यास रस्त्यावर उतरू आणि निकृष्ट दर्जाची शौचालये तोडून टाकू, असा इशारा माजी खासदार राणे यांनी दिला. अनघा निकम यांनी सूत्रसंचालन केले.यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा चारुलता डोळस, माजी खासदार नीलेश राणे, नीलम राणे, नगराध्यक्षा संपदा वाघधरे, राजापूर नगराध्यक्षा मीना मालपेकर, दत्ताराम चाळके, सुहास बने, सुरेश साळुंखे, विजय भोसले, किरण नाईक, रिलायन्स एजन्सी मुंबईचे भारतभूषण शर्मा, संजीव भान, किशोर मोरे, महेंद्र चव्हाण, शांताराम गाडे, सुमित्रा देसाई, महिला नागरी पतसंस्था संस्थापक राजन देसाई, कोकण किंग अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष ऋषिनाथ पत्याणे, पतसंस्थेच्या अध्यक्षा अनुराधा राणे, रवींद्र नागरेकर, अनामिका जाधव, संभाजी काजरेकर, सुरेश बाईत, प्रसन्न शेट्ये, प्रकाश लांजेकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)