शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

मुख्यमंत्र्यांची दलाली दोन दिवसांत उघड करणार

By admin | Updated: February 15, 2016 01:15 IST

नारायण राणे : मुख्यमंत्र्याशी ‘पालघर’च्या प्रचारातील भाषा असंस्कृत

लांजा : मुख्यमंत्र्यांनी पालघर पोटनिवडणुकीच्या प्रचारात माझा ‘दलाल’ असा उल्लेख केला होता. ही भाषा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शोभणारी नाही. परंतु, येत्या दोन दिवसांत मी मुंबईत जाऊन यांची दलाली दाखवून देणार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, त्यावेळी नागपूरच्या काही लोकांनी येऊन मोठमोठी कार्यालये थाटली, काम करून द्यायला! देवेंद्रजी, याला दलाली म्हणतात. मुंबईत जाहीर पत्रकार परिषद घेऊन मी ही सर्व दलाली दाखवून देईन, असा स्पष्ट इशारा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिला.लांजा येथे सुमित्रा देसाई नागरी महिला पतसंस्था व कोकण किंग अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनी या दोन संस्थांच्या उद्घाटन समारंभासाठी लांजा येथे आले असता राणे बोलत होते. राणे पुढे म्हणाले की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काय भाषा वापरावी, ही त्यांना संस्कृतीच राहिली नाही. काही दिवसांपूर्वी मी पालघर येथील पोटनिवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराला गेलो होतो. त्या ठिकाणी मुख्यमंत्री गेले असता त्यांनी माझ्यावर टीका केली. ते म्हणाले होते की, इथे प्रचाराला कोकणचे नेते आले होते. हे नेते नाहीत, दलाल आहेत. मुख्यमंत्र्यांच्या तोंडात अशी भाषा शोभते का? पण मीसुद्धा ‘यांची’ दलाली दाखवून देईन. दोन दिवसांतच मुंबईला जाऊन त्यांनी काय काय दलाली दिली, हे दाखवून देणार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, तेव्हा नागपूरच्या काही लोकांनी मुंबईत येऊन मोठमोठी कार्यालये थाटली, काम करून द्यायला! जाहीर पत्रकार परिषद घेऊन हे सर्व उघड करणार असल्याचे ते म्हणाले.मुख्यमंत्री आता राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्याचा कांगावा करत आहेत. परंतु, एका वर्षात राज्य सक्षम होत नाही. काँग्रेसने गेल्या ५० वर्षांत केलेल्या कामाचे हे मुख्यमंत्री आता सादरीकरण करत आहेत व स्वत:ची पाठ थोपटून घेत आहेत. हे सर्व श्रेय काँग्रेसचे आहे, असे राणे म्हणाले.यावेळी नीलेश राणे उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, विरोधक आमच्या ‘स्टाईल’ची कॉपी करू शकतात. परंतु, विकास करू शकत नाहीत. जैतापूर आयलॉग प्रकल्पाला विरोध, आता चौपदरीकरणालाही त्यांचा विरोध! यांचा सर्वच गोष्टीला विरोध. मग कोकणचा विकास कसा साधणार? शौचालय व पाणी वाटपात मोठा भ्रष्टाचार होत आहे. लोकांना मिळालेले अनुदान जोपर्यंत लोकांपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही. वेळ पडल्यास रस्त्यावर उतरू आणि निकृष्ट दर्जाची शौचालये तोडून टाकू, असा इशारा माजी खासदार राणे यांनी दिला. अनघा निकम यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा चारुलता डोळस, अशी भाषा शोभते का? पण मीसुद्धा ‘यांची’ दलाली दाखवून देईन. दोन दिवसांतच मुंबईला जाऊन त्यांनी काय काय दलाली दिली, हे दाखवून देणार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, तेव्हा नागपूरच्या काही लोकांनी मुंबईत येऊन मोठमोठी कार्यालये थाटली, काम करून द्यायला! जाहीर पत्रकार परिषद घेऊन हे सर्व उघड करणार असल्याचे ते म्हणाले.मुख्यमंत्री आता राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्याचा कांगावा करत आहेत. परंतु, एका वर्षात राज्य सक्षम होत नाही. काँग्रेसने गेल्या ५० वर्षांत केलेल्या कामाचे हे मुख्यमंत्री आता सादरीकरण करत आहेत व स्वत:ची पाठ थोपटून घेत आहेत. हे सर्व श्रेय काँग्रेसचे आहे, असे राणे म्हणाले.यावेळी नीलेश राणे उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, विरोधक आमच्या ‘स्टाईल’ची कॉपी करू शकतात. परंतु, विकास करू शकत नाहीत. जैतापूर आयलॉग प्रकल्पाला विरोध, आता चौपदरीकरणालाही त्यांचा विरोध! यांचा सर्वच गोष्टीला विरोध. मग कोकणचा विकास कसा साधणार? शौचालय व पाणी वाटपात मोठा भ्रष्टाचार होत आहे. लोकांना मिळालेले अनुदान जोपर्यंत लोकांपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही. वेळ पडल्यास रस्त्यावर उतरू आणि निकृष्ट दर्जाची शौचालये तोडून टाकू, असा इशारा माजी खासदार राणे यांनी दिला. अनघा निकम यांनी सूत्रसंचालन केले.यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा चारुलता डोळस, माजी खासदार नीलेश राणे, नीलम राणे, नगराध्यक्षा संपदा वाघधरे, राजापूर नगराध्यक्षा मीना मालपेकर, दत्ताराम चाळके, सुहास बने, सुरेश साळुंखे, विजय भोसले, किरण नाईक, रिलायन्स एजन्सी मुंबईचे भारतभूषण शर्मा, संजीव भान, किशोर मोरे, महेंद्र चव्हाण, शांताराम गाडे, सुमित्रा देसाई, महिला नागरी पतसंस्था संस्थापक राजन देसाई, कोकण किंग अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष ऋषिनाथ पत्याणे, पतसंस्थेच्या अध्यक्षा अनुराधा राणे, रवींद्र नागरेकर, अनामिका जाधव, संभाजी काजरेकर, सुरेश बाईत, प्रसन्न शेट्ये, प्रकाश लांजेकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)