शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
3
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
4
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
5
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
6
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
7
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
8
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
9
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
10
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
11
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
12
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
13
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
14
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
15
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
16
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
17
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
18
Jasprit Bumrah: आयपीएलदरम्यान जसप्रीत बुमराहनं पत्नी संजनाला नेलं डेटवर, शेअर केला खास फोटो
19
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
20
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!

मुख्यमंत्र्यांना कोल्हापुरात येऊ देणार नाही

By admin | Updated: August 25, 2014 00:13 IST

लक्ष्मण माने : ‘बंद’मध्ये सहभाग घेऊन शासनाचा निषेध करणार

कोल्हापूर : काँग्रेस सरकारने भटक्या विमुक्तांसारख्या दुर्बल घटकांना गेली अनेक वर्षे फसविले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना कोल्हापुरात पाय ठेवू दिला जाणार नाही तसेच कोल्हापूरच्या टोलविरोधी बंदमध्ये सहभाग घेऊन शासनाचा निषेध करणार, असा इशारा भटक्या विमुक्त जमाती संघटना अध्यक्ष पद्मश्री लक्ष्मण माने यांनी आज, रविवारी पत्रकार परिषदेत दिला. माने म्हणाले, हजारो एकर जमीन सरकारकडे पडून आहे. ती गरीब लोकांना मिळावी. आमच्याबरोबर भूमिहीन शेतमजुरांना जमीन द्या, बेघरांना घरासाठी जागा द्या, अशी हजारो निवेदने शासनाला गेली ५० ते ६० वर्षे आम्ही देत आहोत. भटक्या विमुक्त्यांच्या बेचाळीस जमातींचा समावेश अनुसूचित जमातीत करा, आदिवासींना सवलती द्या, अशी शिफारस न्यायमूर्ती बापट आयोगाने दिल्या. त्या शासनाने धुडकावून नवीन आयोग नेमला. त्यामुळे भटक्या विमुक्तांना वाऱ्यावर सोडले आहे, राज्यकर्त्यांना याची जाण नाही. सरकार धनदांडग्यांना खाऊ घालत आहे. आता दिसेल त्या सरकारी जागेवर मोकळ्या पडलेल्या शेतजमिनींवर कब्जा मिळवण्यासाठी भूमी मुक्ती आंदोलन सुरू केलेले आहे. आता सरकारला हिसका दाखविल्याशिवाय गप्प बसणार नाही. पक्षाच्यावतीने सतेज पाटील व हसन मुश्रीफ यांच्याविरोधात उमेदवार उभे केले जाणार आहेत. त्याचबरोबर टोलविरोधी प्रश्नातही सहभागी होणार असून मुख्यमंत्र्यांना कोल्हापूरमध्ये पाय ठेवू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी भारतीय समाजवादी रिपब्लिकन पार्टीचे जगन्नाथ जाधव, शाबू दुधाळे, महाराष्ट्र विकास आघाडीचे अनिल म्हमाणे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)