शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १०५ ग्रामपंचायतींमध्ये चावडी वाचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 15:43 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र ठरणाºया  लाभार्थ्यांच्या यादीचा संबंधित ग्रामपंचायतींच्या ग्रामसभांमध्ये चावडी वाचन कार्यक्रम होणार आहे. त्यानुसार ग्रामपंचायत निवडणूक नसलेल्या १०५ ग्रामपंचायतींमध्ये १ व २ आॅक्टोबर रोजी चावडी वाचन करण्याचे आदेश तहसीलदार स्तरावरून देण्यात आल्याची माहिती सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक डॉ. मेधा वाके यांनी दिली.

ठळक मुद्दे१, २ आॅक्टोबरला कार्यक्रम सहकारी संस्था उपनिबंधकांची माहितीआदेश तहसीलदार स्तरावरून : डॉ. मेधा वाकेकर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील ७२ हजार शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी नोंदणीमधून शासनाने ३६ हजार कर्जदार शेतकºयांची निश्चिती

सिंधुदुर्गनगरी 28 :  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र ठरणाºया  लाभार्थ्यांच्या यादीचा संबंधित ग्रामपंचायतींच्या ग्रामसभांमध्ये चावडी वाचन कार्यक्रम होणार आहे. त्यानुसार ग्रामपंचायत निवडणूक नसलेल्या १०५ ग्रामपंचायतींमध्ये १ व २ आॅक्टोबर रोजी चावडी वाचन करण्याचे आदेश तहसीलदार स्तरावरून देण्यात आल्याची माहिती सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक डॉ. मेधा वाके यांनी दिली.

शासनाच्या कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील ७२ हजार शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. या आॅनलाईन नोंदणीमधून शासनाने ३६ हजार कर्जदार शेतकºयांची निश्चिती केली आहे.

शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत पात्र ठरणाºया कर्जदार लाभार्थ्यांच्या याद्यांचे ग्रामसभांमध्ये चावडी वाचन करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. यात कोणत्या कुटुंबातील शेतकºयांनी कर्ज घेतले आहे. त्यात किती शेतकरी आहेत? कोणाच्या नावावर कर्ज आहे? तो आयकर भरतो का? कर्ज माफी होणारी व्यक्ती शासकीय सेवेत आहे का? याबाबतची माहिती ग्रामसभेत दिली जाणार आहे.

यावेळी कोणाचा आक्षेप असल्यास तो यावेळी नमूद करून घेण्यात येणार आहे. तसा शेरा संबंधित शेतकºयांच्या नावासमोर मारण्याच्या सूचना तालुका समितीने चावडी वाचन करणाºया कर्मचाºयांना दिल्या आहेत. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या ३२५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत. त्यामुळे निवडणुका असलेल्या ग्रामपंचायती वगळून उर्वरित १०५ ग्रामपंचायतींमध्ये १ व २ आॅक्टोबर रोजी ग्रामसभांमध्ये चावडी वाचन करण्यात येणार आहे. याबाबतचे नियोजन जिल्हा सहकार उपनिबंधक विभागाने केले आहे. त्यामुळे या चावडी वाचन कार्यक्रमाला शेतकºयांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक डॉ. मेधा वाके यांनी केले आहे.