शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

चाकरमानी निघाले परतीच्या प्रवासाला! कणकवलीत एसटी, रेल्वे गाड्यांना गर्दी

By सुधीर राणे | Updated: September 6, 2022 17:36 IST

चाकरमान्यांनी केलेल्या गर्दीमुळे बसस्थानक व रेल्वे स्टेशनचा परिसर गजबजून गेला होता.

कणकवली : गणेशोत्सवासाठीसिंधुदुर्गात आलेले चाकरमानी आता मोठ्या संख्येने परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. मुंबईला जाण्यासाठी चाकरमान्यांनी कणकवली बसस्थानक व रेल्वे स्टेशनवर मंगळवारी मोठी गर्दी केली होती. चाकरमान्यांनी केलेल्या गर्दीमुळे बऱ्याच कालावधीनंतर बसस्थानक व रेल्वे स्टेशनचा परिसर गजबजून गेला होता.गौरी - गणपतीचे विसर्जन केल्यानंतर चाकरमानी मुंबईकडे निघाले आहेत. कोरोनाच्या महामारी नंतर निर्बन्ध शिथिल झाल्यानंतर मुंबईतून हजारोच्या संख्येने चाकरमानी सिंधुदुर्गातगणेशोत्सवासाठी दाखल झाले होते. खासगी गाड्या, एसटी व त्यानंतर रेल्वे गाड्यांमधून गणेशोत्सवापूर्वी हे चाकरमानी सिंधुदुर्गातील आपल्या गावी पोहोचले होते.        दरवर्षीप्रमाणेच आरती, भजने गणरायासमोर करण्यात आली. विविध पारंपरिक कार्यक्रमांमध्ये हे चाकरमानी भक्तिभावाने सहभागी झाले होते. चाकरमान्यांना गणेशोत्सवाच्या निमित्ताने गावी आल्यावर एकप्रकारे मोकळा श्वास घेता आला होता. गणेशोत्सवात दीड, पाच  तसेच सहाव्या दिवशी गौरी - गणपती व पुन्हा सातव्या दिवशी गणरायांना निरोप दिल्यानंतर चाकरमानी पुन्हा एकदा आपल्या नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईला परतू लागले आहेत.  गणरायाच्या चरणी सर्व संकटे लवकर टळू दे, असे साकडे घालतानाच 'पुढच्या वर्षी लवकर या' असे म्हणत हे चाकरमानी मुंबईला निघाले आहेत. बसस्थानक व रेल्वे स्टेशन परिसरात मंगळवारी दुपारनंतर चाकरमान्यांची मोठी गर्दी झाली होती. एसटी अथवा रेल्वे गाडी मुंबईच्या दिशेने रवाना होत असतानाच 'गणपती बाप्पा मोरया' असा जयघोष चाकरमानी करताना दिसत होते.   

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गGanesh Mahotsavगणेशोत्सव