शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत आवळळ्या मुसक्या   
3
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
4
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
5
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
6
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
7
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
8
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन!
9
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
10
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
11
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
12
रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; एकाचा मृत्यू, २६ जण जखमी
13
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
14
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
15
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
16
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
17
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
18
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
19
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
20
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली

महत्त्वाच्या परीक्षांचे केंद्र सिंधुदुर्गात व्हावे : वैभव नाईक यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 19:39 IST

कुडाळ : सध्याच्या शिक्षण प्रणालीनुसार बारावीनंतर व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश मिळविण्यासाठी  विद्यार्थ्यांना नीट, जेईई आदी परीक्षा देणे आवश्यक आहे. मात्र, ...

ठळक मुद्दे उदय सामंत यांना निवेदन सादर

कुडाळ : सध्याच्या शिक्षण प्रणालीनुसार बारावीनंतर व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश मिळविण्यासाठी  विद्यार्थ्यांना नीट, जेईई आदी परीक्षा देणे आवश्यक आहे. मात्र, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षांची परीक्षा केंद्रे सिंधुदुर्ग जिल्ह्यात नसल्याने विद्यार्थी मागे पडत आहेत.

अशा महत्त्वाच्या परीक्षांचे केंद्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात होण्यासाठी  महाराष्ट्र शासनाने शिफारशीसह केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करावा, अशी मागणी कुडाळ-मालवण  मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

याबाबत  उदय सामंत यांनी सकारात्मक चर्चा करीत या परीक्षा केंद्रांबाबत केंद्रशासनाला शिफारस करण्याचे आदेश प्रधान सचिवांना दिले आहेत. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना या परीक्षा देण्यासाठी कोल्हापूर अथवा गोवा येथे जावे लागते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे हे परीक्षा  केंद्र मिळाल्यास जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नीट, जेईई परीक्षा देणे सोयीचे होईल. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने शिफारशीसह केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करावा, जेणेकरून केंद्र शासनाकडे  पाठपुरावा करणे सोयीचे होईल, अशी मागणी आमदार नाईक यांनी केली.त्याबाबत प्रधान सचिवांना या परीक्षा केंद्राबाबत केंद्रशासनाला शिफारस करण्याचे आदेश  उदय सामंत यांनी दिले असल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.अभ्यासकेंद्रे नसल्याने विद्यार्थी मागेसिंधुदुर्ग जिल्हा हा भारतातील शंभर टक्के साक्षर जिल्हा व पहिला पर्यटन जिल्हा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इयत्ता दहावी-बारावीमधील विद्यार्थी कोकण बोर्डात नेहमी अव्वल असतात. मात्र, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षांची परीक्षा केंद्रे सिंधुदुर्ग जिल्ह्यात नसल्याने व्यावसायिक अभ्यासक्रमात विद्यार्थी मागे पडतात. पुढील काळात शैक्षणिक विकास होण्यासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमास विद्यार्थी जाणे गरजेचे आहे. त्यासाठी अशा महत्त्वाच्या परीक्षांचे केंद्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात असणे आवश्यक आहे. याकडे आमदार वैभव नाईक यांनी  उदय सामंत यांचे लक्ष वेधले.

टॅग्स :konkanकोकणsindhudurgसिंधुदुर्ग