शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
5
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
6
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
7
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
8
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
9
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
10
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
11
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
12
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
13
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
14
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
15
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
16
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
17
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
18
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
19
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
20
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा

जातनिहाय सर्वेक्षणात बौद्धांचा स्वतंत्र समावेश व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2015 00:10 IST

रिपब्लिकन पार्टी : जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणीचे निवेदन केले सादर

रत्नागिरी : सामाजिक, आर्थिक व जातनिहाय सर्वेक्षण २०११ च्या प्रारूप यादीमध्ये बौद्ध बाधवांचा स्वतंत्र समावेश व्हावा, अशी मागणी येथील रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियातर्फे करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाध्यक्ष जे. पी. जाधव यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना देऊन त्यांच्याशी चर्चा केली.भारताच्या २०११ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार रत्नागिरी जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे १७ लाख इतकी आहे. त्यापैकी अनुसुचित जातीची लोकसंख्या ६६,९४८ इतकी नोंदवली गेलेली आहे. वास्तविक जिल्ह्यात २ लाख ४५ हजार इतकी लोकसंख्या असून त्यापैकी बौद्ध समाजाची २ लाख २५ हजार इतकी आहे. जातनिहाय सर्वेक्षणच्या प्रारूप याद्यांबाबत चौकशी केली असता रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे ९० टक्के बौद्धांची नोंद हिंदू म्हणून करण्यात आल्याचे दिसून आले आहे.या तफावतीमुळे जिल्ह्यातील सर्व बौद्ध बांधवांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय विकासात्मक बाबींवर दूरगामी गंभीर परिणाम होणार आहेत. त्यामुळे बौद्ध बांधवांचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करून तशी सुधारित नोंद या जातनिहाय सर्वेक्षणाच्या प्रारूप यादीमध्ये करण्यात यावी, तसेच दावे व आक्षेप दाखल करण्यासाठी एक महिन्याची मुदत वाढवून मिळावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियातर्फे करण्यात आली आहे. याप्रकरणी संघटनेने जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याशी चर्चा केली. संघटनेच्या निवेदनावर सकारात्मकरित्या विचार करून शासनाकडून मार्गदर्शन मागवून पुढील कार्यवाही करू, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. या शिष्टमंडळात जे. पी. जाधव यांच्यासह रत्नागिरी तालुक्याचे अध्यक्ष रजत पवार, सरचिटणीस दीपक जाधव, सहसचिव सुजित चवेकर, तालुका युवाध्यक्ष उमेश कदम, युवा संघटक नरेश कांबळे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील बौद्ध धर्मियांनी संबंधित ग्रामपंचायतींमध्ये जावून सुधारित माहिती तत्काळ नमूद करावी, असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)