शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

काजू खरेदी दरात घट, शेतकरी आर्थिक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 11:23 IST

दोडामार्ग आठवडा बाजारात काजू खरेदी करण्यासाठी तालुक्यातील तसेच तालुक्याबाहेरील व्यापारी हजेरी लावतात. मागील आठवड्यात रविवारी काजू खरेदी दर प्रति किलो १४० रुपये होता. मात्र, या रविवारी दरात घट होऊन प्रति किलो १३० रुपयेप्रमाणे काजू खरेदी केली जात होती. आठ दिवसांत प्रति किलोमागे दहा रुपयांची तफावत झाल्याने काजू बागायतदार आर्थिक संकटात सापडला आहे. अशाप्रकारे घट झाल्यास यावर्षी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.

ठळक मुद्देकाजू खरेदी दरात घट, शेतकरी आर्थिक संकटात आठ दिवसांत दहा रुपयांची तफावत

दोडामार्ग : दोडामार्ग आठवडा बाजारात काजू खरेदी करण्यासाठी तालुक्यातील तसेच तालुक्याबाहेरील व्यापारी हजेरी लावतात. मागील आठवड्यात रविवारी काजू खरेदी दर प्रति किलो १४० रुपये होता. मात्र, या रविवारी दरात घट होऊन प्रति किलो १३० रुपयेप्रमाणे काजू खरेदी केली जात होती. आठ दिवसांत प्रति किलोमागे दहा रुपयांची तफावत झाल्याने काजू बागायतदार आर्थिक संकटात सापडला आहे. अशाप्रकारे घट झाल्यास यावर्षी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.गतवर्षी झालेल्या दुष्काळी पावसामुळे व वातावरणातील बदलांमुळे काजू पिकावर मोठा परिणाम झाला आहे. डिसेंबर महिन्यात काजूच्या झाडांना पालवी फुटण्याच्या काळात पावसाने जोर धरल्याने पालवी फुटण्यास विलंब झाला. त्यात वातावरणात होणाऱ्या बदलामुळे काजूच्या झाडावर रोगराई पसरल्यामुळे किरकोळ आलेला मोहोरही गळून गेला.

शेतकऱ्याला काजू बागेतून वर्षाकाठी मिळणाऱ्या उत्पादनाच्या २० टक्के उत्पादन यावर्षी मिळणे कठीण झाले आहे. उत्पादन कमी झाले तर दर उंचावतील, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, परिस्थिती उलट असून, गतवर्षीच्या दरापेक्षा यंदाच्या दरात घट होत असल्याची चिन्हे दिसत आहेत.दोडामार्गच्या रविवार आठवडा बाजारात येणाऱ्या व्यापाऱ्यांकडून मागील आठवड्यात प्रति किलो १४० रुपये दराने काजू खरेदी केला जात होता. मात्र, या रविवारी प्रति किलो १३० रुपयांनी काजू खरेदी करण्यात आला. आठ दिवसात प्रति किलोमागे दरात १० रुपयाने घट झाल्याने शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे.शासनाने दर निश्चित करणे गरजेचेजिल्ह्यातील तसेच तालुक्यातील बहुतांशी लोक काजू पिकावर अवलंबून आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांच्या चरितार्थ काजू पिकावर चालतो. मात्र, यावर्षी काजू पीक कमी प्रमाणात आहे. उत्पादन कमी झाले असून व्यापाऱ्यांनी काजू खरेदी दरही ताणून धरला आहे.

दिवसेंदिवस दरात घट होताना दिसत आहे. परिणामी शेतकरी चिंताग्रस्त आहे. शासनाने काजू दर निश्चित करून शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे. 

टॅग्स :Marketबाजारsindhudurgसिंधुदुर्ग