शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

काजू खरेदी दरात घट, शेतकरी आर्थिक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 11:23 IST

दोडामार्ग आठवडा बाजारात काजू खरेदी करण्यासाठी तालुक्यातील तसेच तालुक्याबाहेरील व्यापारी हजेरी लावतात. मागील आठवड्यात रविवारी काजू खरेदी दर प्रति किलो १४० रुपये होता. मात्र, या रविवारी दरात घट होऊन प्रति किलो १३० रुपयेप्रमाणे काजू खरेदी केली जात होती. आठ दिवसांत प्रति किलोमागे दहा रुपयांची तफावत झाल्याने काजू बागायतदार आर्थिक संकटात सापडला आहे. अशाप्रकारे घट झाल्यास यावर्षी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.

ठळक मुद्देकाजू खरेदी दरात घट, शेतकरी आर्थिक संकटात आठ दिवसांत दहा रुपयांची तफावत

दोडामार्ग : दोडामार्ग आठवडा बाजारात काजू खरेदी करण्यासाठी तालुक्यातील तसेच तालुक्याबाहेरील व्यापारी हजेरी लावतात. मागील आठवड्यात रविवारी काजू खरेदी दर प्रति किलो १४० रुपये होता. मात्र, या रविवारी दरात घट होऊन प्रति किलो १३० रुपयेप्रमाणे काजू खरेदी केली जात होती. आठ दिवसांत प्रति किलोमागे दहा रुपयांची तफावत झाल्याने काजू बागायतदार आर्थिक संकटात सापडला आहे. अशाप्रकारे घट झाल्यास यावर्षी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.गतवर्षी झालेल्या दुष्काळी पावसामुळे व वातावरणातील बदलांमुळे काजू पिकावर मोठा परिणाम झाला आहे. डिसेंबर महिन्यात काजूच्या झाडांना पालवी फुटण्याच्या काळात पावसाने जोर धरल्याने पालवी फुटण्यास विलंब झाला. त्यात वातावरणात होणाऱ्या बदलामुळे काजूच्या झाडावर रोगराई पसरल्यामुळे किरकोळ आलेला मोहोरही गळून गेला.

शेतकऱ्याला काजू बागेतून वर्षाकाठी मिळणाऱ्या उत्पादनाच्या २० टक्के उत्पादन यावर्षी मिळणे कठीण झाले आहे. उत्पादन कमी झाले तर दर उंचावतील, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, परिस्थिती उलट असून, गतवर्षीच्या दरापेक्षा यंदाच्या दरात घट होत असल्याची चिन्हे दिसत आहेत.दोडामार्गच्या रविवार आठवडा बाजारात येणाऱ्या व्यापाऱ्यांकडून मागील आठवड्यात प्रति किलो १४० रुपये दराने काजू खरेदी केला जात होता. मात्र, या रविवारी प्रति किलो १३० रुपयांनी काजू खरेदी करण्यात आला. आठ दिवसात प्रति किलोमागे दरात १० रुपयाने घट झाल्याने शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे.शासनाने दर निश्चित करणे गरजेचेजिल्ह्यातील तसेच तालुक्यातील बहुतांशी लोक काजू पिकावर अवलंबून आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांच्या चरितार्थ काजू पिकावर चालतो. मात्र, यावर्षी काजू पीक कमी प्रमाणात आहे. उत्पादन कमी झाले असून व्यापाऱ्यांनी काजू खरेदी दरही ताणून धरला आहे.

दिवसेंदिवस दरात घट होताना दिसत आहे. परिणामी शेतकरी चिंताग्रस्त आहे. शासनाने काजू दर निश्चित करून शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे. 

टॅग्स :Marketबाजारsindhudurgसिंधुदुर्ग