शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय! सनाई ताकाईची बनल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान
2
'स्वत:ला सरकार समजू नका'; मेधा कुलकर्णींच्या 'शुद्धीकरणा'मुळे महायुतीत फूट; मित्रपक्षांकडून 'धार्मिक तेढ' वाढवल्याचा आरोप
3
पाकिस्तान-अफगाणिस्तान शस्त्रसंधी संकटात! एका ओळीवर अवलंबून, पाक संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान
4
Muhurat Trading: शेअर बाजारात आज फक्त १ तास! जाणून घ्या 'मुहूर्त ट्रेडिंग'ची अचूक वेळ 
5
बुद्धिबळ जगताला मोठा धक्का! अमेरिकेचा 'ग्रँडमास्टर' डॅनियल नरोडित्स्की याचे २९ व्या वर्षी निधन
6
टोल कंपनीने ११०० रुपये बोनस दिला; टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांनी असा बदला घेतला, १० हजार गाड्या फ्रीमध्ये सोडल्या...
7
नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील आगीत ६ वर्षांच्या मुलीसह ४ जणांचा मृत्यू, १० जण जखमी
8
असरानी यांच्या निधनानंतर अक्षय कुमार भावुक; म्हणाला, "दोन आठवड्यांपूर्वीच..."
9
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
10
नवी मुंबईत भीषण आगीत होरपळून माय-लेकीचा मृत्यू; सिलिंडर स्फोटानंतर इतर बाहेर पडले पण दोघी अडकल्या
11
आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२५ : धनप्राप्ती होईल, लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कोणाच्या राशीत काय लिहिलेय...
12
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
13
रात्री पार्टी, बहिणीला व्हिडीओ कॉल अन् पहाटे पत्नीचा मृत्यू; मृतदेह सोडून विधानसभा अध्यक्षांचा पुतण्या फरार
14
भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
15
आता उद्धव ठाकरे म्हणाले... मी पुन्हा येईन, महापालिकेवर भगवा फडकवीन; मतांची चोरी पकडली
16
'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश
17
महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
18
महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली
19
बिहार निवडणूक २०२५: काँग्रेसची विचित्र स्थिती, उमेदवारी वाटपात गोंधळ; जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...

काजू खरेदी दरात घट, शेतकरी आर्थिक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 11:23 IST

दोडामार्ग आठवडा बाजारात काजू खरेदी करण्यासाठी तालुक्यातील तसेच तालुक्याबाहेरील व्यापारी हजेरी लावतात. मागील आठवड्यात रविवारी काजू खरेदी दर प्रति किलो १४० रुपये होता. मात्र, या रविवारी दरात घट होऊन प्रति किलो १३० रुपयेप्रमाणे काजू खरेदी केली जात होती. आठ दिवसांत प्रति किलोमागे दहा रुपयांची तफावत झाल्याने काजू बागायतदार आर्थिक संकटात सापडला आहे. अशाप्रकारे घट झाल्यास यावर्षी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.

ठळक मुद्देकाजू खरेदी दरात घट, शेतकरी आर्थिक संकटात आठ दिवसांत दहा रुपयांची तफावत

दोडामार्ग : दोडामार्ग आठवडा बाजारात काजू खरेदी करण्यासाठी तालुक्यातील तसेच तालुक्याबाहेरील व्यापारी हजेरी लावतात. मागील आठवड्यात रविवारी काजू खरेदी दर प्रति किलो १४० रुपये होता. मात्र, या रविवारी दरात घट होऊन प्रति किलो १३० रुपयेप्रमाणे काजू खरेदी केली जात होती. आठ दिवसांत प्रति किलोमागे दहा रुपयांची तफावत झाल्याने काजू बागायतदार आर्थिक संकटात सापडला आहे. अशाप्रकारे घट झाल्यास यावर्षी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.गतवर्षी झालेल्या दुष्काळी पावसामुळे व वातावरणातील बदलांमुळे काजू पिकावर मोठा परिणाम झाला आहे. डिसेंबर महिन्यात काजूच्या झाडांना पालवी फुटण्याच्या काळात पावसाने जोर धरल्याने पालवी फुटण्यास विलंब झाला. त्यात वातावरणात होणाऱ्या बदलामुळे काजूच्या झाडावर रोगराई पसरल्यामुळे किरकोळ आलेला मोहोरही गळून गेला.

शेतकऱ्याला काजू बागेतून वर्षाकाठी मिळणाऱ्या उत्पादनाच्या २० टक्के उत्पादन यावर्षी मिळणे कठीण झाले आहे. उत्पादन कमी झाले तर दर उंचावतील, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, परिस्थिती उलट असून, गतवर्षीच्या दरापेक्षा यंदाच्या दरात घट होत असल्याची चिन्हे दिसत आहेत.दोडामार्गच्या रविवार आठवडा बाजारात येणाऱ्या व्यापाऱ्यांकडून मागील आठवड्यात प्रति किलो १४० रुपये दराने काजू खरेदी केला जात होता. मात्र, या रविवारी प्रति किलो १३० रुपयांनी काजू खरेदी करण्यात आला. आठ दिवसात प्रति किलोमागे दरात १० रुपयाने घट झाल्याने शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे.शासनाने दर निश्चित करणे गरजेचेजिल्ह्यातील तसेच तालुक्यातील बहुतांशी लोक काजू पिकावर अवलंबून आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांच्या चरितार्थ काजू पिकावर चालतो. मात्र, यावर्षी काजू पीक कमी प्रमाणात आहे. उत्पादन कमी झाले असून व्यापाऱ्यांनी काजू खरेदी दरही ताणून धरला आहे.

दिवसेंदिवस दरात घट होताना दिसत आहे. परिणामी शेतकरी चिंताग्रस्त आहे. शासनाने काजू दर निश्चित करून शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे. 

टॅग्स :Marketबाजारsindhudurgसिंधुदुर्ग