शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
6
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
7
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
8
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
9
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
10
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
11
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
12
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
13
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
14
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
15
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
16
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
17
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
18
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
19
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
20
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान

कालव्याची स्थिती ‘ना घर का’

By admin | Updated: May 22, 2015 00:13 IST

स्थानिक शेतकरी भरडले : तिलारी कालव्याची कामे संथगतीने

महेश चव्हाण - ओटवणे -तिलारी मध्यम पाटबंधारे प्रकल्प कालव्याची स्थिती ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली असून, यात स्थानिक शेतकरी भरडले जात आहेत. गेल्या पावसाळ्यात शेतीत तसेच घरांमध्ये कालव्याचे पाणी गेले होते.२५ वर्षांपासून गोवा आणि महाराष्ट्र या दोन राज्यांचा संयुक्तिक प्रकल्प असलेल्या तिलारी कालवा प्रकल्पाने शेतकऱ्यांना पाणी देणे तर सोडाच विविध समस्या माथी लादल्या आहेत. सावंतवाडी तालुक्यातील बाढा शाखा कालवा माध्यमातून ओटवणेत आलेल्या या कालव्याच्या कामकाजामुळे ओटवणे (मांडवफातरवाडी) ग्रामस्थांना नुकसानाला सामोरे जावे लागले. या ठिकाणी कालव्याच्या मुख्य हौदाच्या खोदाईसाठी वारंवार केलेल्या सुरुंग स्फोटामुळे भरवस्तीतील घरांना तडे जाऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. परंतु नुकसानाकडे कानाडोळा करीत प्रकल्प अधिकारी व ठेकेदाराने सुरुंग स्फोट सुरुच ठेवले होते. वेळोवेळी स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत तक्रार देऊनसुद्धा अधिकारीवर्गाने कोणतीच कारवाई न केल्याने अखेरीस ग्रामस्थांनी काम बंद पाडले. जोपर्यंत घरांना झालेल्या नुकसानाची भरपाई मिळत नाही तोपर्यंत काम सुरू करू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला.गेले वर्षभर नुकसान भरपाईच्या नावाखाली पंचनामे केले गेले, कागदपत्र रंगवली गेली. मात्र, शेतकऱ्यांच्या हातात अजून दमडीही पडलेली नाही. वारंवार मोठ्या प्रमाणात केल्या गेलेल्या सुरुंग स्फोटामुळे भिंतींना मोठमोठी भगदाडे पडली आहेत. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात घरात राहणे असुरक्षित बनले आहे. भेगांमधून पाणी पाझरुन घरात ओल निर्माण होत असल्याने राहायचे कोठे, असा प्रश्न येथील ग्रामस्थांसमोर आहे.पुरेशी नुकसान भरपाई नाहीनुकसानग्रस्त घरांचा सर्व्हे करुन पंचनामा करण्यात आला. त्यामध्ये काही स्थानिक ग्रामस्थांना ६०० रुपये ते ११०० रुपये अशी अत्यल्प नुकसान भरपाई नमूद आहे. त्यामुळे शासन जनतेची चेष्टा करीत असल्याचा राग ग्रामस्थांनी व्यक्त केला.पाण्याचा निचरा नाहीभरवस्तीतून गेलेल्या या कालव्यातून येणारे पाणी पलिकडे जाण्यासाठी मार्ग नसल्याने पावसात लोकांच्या घरात पाणी शिरत आहे. तसेच विहिरींचे पाणी गढूळ होत आहे. त्यामुळे पाण्याचाही योग्य निचरा होणे गरजेचे आहे. गेले वर्षभर स्थानिक ग्रामस्थ नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत असून, हरितक्रांतीच्या दृष्टीने उभारण्यात येणारा हा प्रकल्प ग्रामस्थांच्या जीवावर बेतत असेल, तर हा प्रकल्प बंद करा, असा संताप ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.