शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
4
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
5
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
6
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
7
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
8
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
9
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
10
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
11
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
12
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
13
SBI केवळ या नंबर्सवरुन करतं ग्राहकांना फोन; अन्य कोणत्याही क्रमांवरुन कॉल आल्यास व्हा सावध, काय आहे प्रकरण?
14
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
15
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
16
'किंग कोहली' परत येतोय... ऑस्ट्रेलियाची धुलाई करण्यासाठी विराटची 'लॉर्ड्स'वर नेट प्रॅक्टिस
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
२ शेअर्सवर मिळणार २५ मोफत! 'या' ८ कंपन्या देणार बोनस शेअर्स, वाचा रेकॉर्ड डेटची माहिती
19
Share Market Opening 25 August, 2025: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
20
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा

कालव्याची स्थिती ‘ना घर का’

By admin | Updated: May 22, 2015 00:13 IST

स्थानिक शेतकरी भरडले : तिलारी कालव्याची कामे संथगतीने

महेश चव्हाण - ओटवणे -तिलारी मध्यम पाटबंधारे प्रकल्प कालव्याची स्थिती ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली असून, यात स्थानिक शेतकरी भरडले जात आहेत. गेल्या पावसाळ्यात शेतीत तसेच घरांमध्ये कालव्याचे पाणी गेले होते.२५ वर्षांपासून गोवा आणि महाराष्ट्र या दोन राज्यांचा संयुक्तिक प्रकल्प असलेल्या तिलारी कालवा प्रकल्पाने शेतकऱ्यांना पाणी देणे तर सोडाच विविध समस्या माथी लादल्या आहेत. सावंतवाडी तालुक्यातील बाढा शाखा कालवा माध्यमातून ओटवणेत आलेल्या या कालव्याच्या कामकाजामुळे ओटवणे (मांडवफातरवाडी) ग्रामस्थांना नुकसानाला सामोरे जावे लागले. या ठिकाणी कालव्याच्या मुख्य हौदाच्या खोदाईसाठी वारंवार केलेल्या सुरुंग स्फोटामुळे भरवस्तीतील घरांना तडे जाऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. परंतु नुकसानाकडे कानाडोळा करीत प्रकल्प अधिकारी व ठेकेदाराने सुरुंग स्फोट सुरुच ठेवले होते. वेळोवेळी स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत तक्रार देऊनसुद्धा अधिकारीवर्गाने कोणतीच कारवाई न केल्याने अखेरीस ग्रामस्थांनी काम बंद पाडले. जोपर्यंत घरांना झालेल्या नुकसानाची भरपाई मिळत नाही तोपर्यंत काम सुरू करू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला.गेले वर्षभर नुकसान भरपाईच्या नावाखाली पंचनामे केले गेले, कागदपत्र रंगवली गेली. मात्र, शेतकऱ्यांच्या हातात अजून दमडीही पडलेली नाही. वारंवार मोठ्या प्रमाणात केल्या गेलेल्या सुरुंग स्फोटामुळे भिंतींना मोठमोठी भगदाडे पडली आहेत. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात घरात राहणे असुरक्षित बनले आहे. भेगांमधून पाणी पाझरुन घरात ओल निर्माण होत असल्याने राहायचे कोठे, असा प्रश्न येथील ग्रामस्थांसमोर आहे.पुरेशी नुकसान भरपाई नाहीनुकसानग्रस्त घरांचा सर्व्हे करुन पंचनामा करण्यात आला. त्यामध्ये काही स्थानिक ग्रामस्थांना ६०० रुपये ते ११०० रुपये अशी अत्यल्प नुकसान भरपाई नमूद आहे. त्यामुळे शासन जनतेची चेष्टा करीत असल्याचा राग ग्रामस्थांनी व्यक्त केला.पाण्याचा निचरा नाहीभरवस्तीतून गेलेल्या या कालव्यातून येणारे पाणी पलिकडे जाण्यासाठी मार्ग नसल्याने पावसात लोकांच्या घरात पाणी शिरत आहे. तसेच विहिरींचे पाणी गढूळ होत आहे. त्यामुळे पाण्याचाही योग्य निचरा होणे गरजेचे आहे. गेले वर्षभर स्थानिक ग्रामस्थ नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत असून, हरितक्रांतीच्या दृष्टीने उभारण्यात येणारा हा प्रकल्प ग्रामस्थांच्या जीवावर बेतत असेल, तर हा प्रकल्प बंद करा, असा संताप ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.