शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

विस्थापन होत असेल तर बायपास करा

By admin | Updated: January 12, 2016 00:24 IST

विनायक राऊत : कणकवलीतील बाधित व्यापाऱ्यांची मागणी

कणकवली : चौपदरीकरणामुळे कणकवली शहरातील बाजारपेठ उद्ध्वस्त होणार आहे. यासाठी उड्डाणपूल करताना ४५ ऐवजी ३० मीटर जागेचेच संपादन व्हावे. बाजारपेठेचे विस्थापन होत असेल तर शहरातून महामार्ग नेण्याऐवजी बायपास मार्ग काढावा, अशी मागणी खासदार विनायक राऊत यांच्याकडे शहरातील विस्थापित व्यापारी समितीच्यावतीने सोमवारी करण्यात आली. कणकवलीतील अपंग सहाय्यता तपासणी शिबिराच्या उद्घाटनाला आलेल्या खासदार राऊत यांची चौपदरीकरण बाधितांनी भेट घेऊन निवेदन सादर केले. चौपदरीकरणामध्ये पंधराशे कुटुंबे बाधित होणार आहेत. कणकवली शहरातून महामार्गासाठी ३ किलोमीटर अंतराचा बायपास व्हावा यासाठी २०१२ साली सर्वेक्षण झाले आहे. महामार्गासाठी चौपदरीकरणाचे संपादन झालेले असताना आता सहा पदरी संपादन कशासाठी? असा प्रश्न यावेळी करण्यात आला. याबाबत एकही अधिकारी स्पष्ट माहिती देत नाही. कोल्हापूर शहरातील महामार्गाला बाहेरून बायपास मार्ग दिल्यानंतर त्या ठिकाणी शहर वसले. कणकवलीला हा पर्याय उपलब्ध असताना निष्कारण विस्थापन करु नये.३० मीटरमध्ये सिंगल पिलर उड्डाणपूल होत असेल तर त्याला कणकवलीवासीयांचा विरोध नाही. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना बाधितांच्यावतीने निवेदन देण्यात आले आहे. गडकरी यांनी बाजारपेठ उद्ध्वस्त होणार नाही, असे आश्वासनही दिले होते. खासदार राऊत म्हणाले की, १४ जानेवारी रोजी चौपदरीकरणाशी संबंधित वरिष्ठ अधिकारी जिल्ह्यात येत आहेत. कणकवली शहरातून उड्डाणपूल व्हावा, असाच प्रस्ताव आम्ही मांडला आहे. कणकवलीतील अधिकारी सध्या कोणतीही माहिती देऊ शकत नाहीत. हरकतींच्या सुनावणीनंतर ‘३ डी’ची नोटीस निघणार आहे. त्यानंतर वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक होईल. चौपदरीकरणातील बाधितांसाठी नुकसानभरपाईचे प्रमाण ठरलेले असून, होणाऱ्या बैठकीत यावर चर्चा होईल. फेबु्रवारीअखेर चिपळूण येथील महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू होईल तर एप्रिलअखेर कणकवलीत महामार्ग चौपदरीकरण सहा पॅचमध्ये काम सुरू होणार आहे, असे राऊत म्हणाले. (प्रतिनिधी)व्यापाऱ्यांचा इशारा : आंदोलन छेडणारसध्या आरक्षित असलेल्या ३० मीटर क्षेत्रातच सर्व्हिस रोडसह चौपदरीकरणाचे काम व्हावे. अन्यथा शांततेच्या मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कणकवलीतील व्यापाऱ्यांनी यावेळी बोलताना दिला आहे. जास्तीत जास्त मोबदलाकमीतकमी विस्थापन आणि जास्तीत जास्त मोबदला असे केंद्राचे धोरण असल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले.