शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

फुलपाखरू महोत्सव वर्षभर भरविण्यात यावा - पालकमंत्री रविंद्र चव्हाण 

By अनंत खं.जाधव | Updated: October 20, 2023 16:27 IST

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हयाला पर्यटनाची एक नवीन ओळख निर्माण झाली आहे.त्यामुळेच पारपोली गावात पर्यटक आले पाहिजेत यासाठी ठराविक हंगामात ...

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हयाला पर्यटनाची एक नवीन ओळख निर्माण झाली आहे.त्यामुळेच पारपोली गावात पर्यटक आले पाहिजेत यासाठी ठराविक हंगामात महोत्सव न भरवता वर्षभर असे महोत्सव व्हावेत यातून  पारपोली गावला एक नवीन दिशा मिळेल हा भाग पर्यटनाचे एक नवीन स्थळ म्हणून विकसित होईल असे मत राज्याचे सार्वजनिक बांधकाम तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी मांडले. तर भविष्यात पारपोली फुलपाखरांचे गाव जगाच्या नकाशावर येईल असे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.पारपोली येथे वनविभाग तसेच सिंधुरत्न व पारपोली वनव्यवस्थापन समिती याच्या सहकार्यातून फुलपाखरू महोत्सव भरविण्यात आला असून त्याचे उद्घाटन शुक्रवारी मंत्री चव्हाण शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर याच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, उपवनसंरक्षक एस. नवकिशोर रेड्डी, सहाय्यक उपवनसंरक्षक डॉ. सुनिल लाड, माजी आमदार राजन तेली, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसिलदार श्रीधर पाटील, सरपंच कृष्णा नाईक आदी. उपस्थित होते.मंत्री चव्हाण म्हणाले, मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अपघाताने पालकमंत्री झालो. तरी जिल्ह्याचा सुपुत्र या नात्याने  जे करता येईल त्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहील. पर्यटनाच्या वाढीसाठी सिंधुरत्न योजनेतून मंत्री दीपक केसरकर यांनी भरवलेला हा महोत्सव खरोखरच येणाऱ्या काळासाठी फार महत्त्वाचा आहे. मात्र हा महोत्सव ठराविक हंगामासाठी न होता वर्षभर होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे असे मत मांडले.मंत्री केसरकर म्हणाले,  पारपोली या गावात आढळणारी विविध प्रकारचे फुलपाखरू लक्षात घेता हे गाव  फुलपाखरांचे गाव म्हणून घोषित करण्यात येत आहे. आंबोलीची ओळख ज्याप्रमाणे आज जगाच्या नकाशावर झाली आहे तीच ओळख भविष्यात पारपोली गावची झाली पाहिजे यासाठी माझे प्रयत्न आहेत आणि याचाच भाग म्हणून रत्नसिंधू योजनेच्या माध्यमातून फुलपाखरू महोत्सव या ठिकाणी घेण्यात आला मात्र एखादा महोत्सव घेऊन गावाचा विकास होत नाही तर त्या ठिकाणी बारमाही पर्यटन चालले पाहिजे. यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. सगळ्या गावाने पुढे येऊन राजकारण बाजूला ठेवून आपले गाव फुलपाखराचे गाव म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले.तसेच काका भिसे व हेमंत ओगले यांच्या पावलावर पाऊल टाकून गावातील तरुणांना फुलपाखरू प्रशिक्षक म्हणून निर्माण करावेत असे आवाहन केले. उपवनसंरक्षक रेड्डी यांनी महोत्सव घेण्यामागे फुलपाखरू संवर्धन आणि संरक्षण हा या मागचा उद्देश असून भविष्यात पर्यटकांना याठिकाणी फुलपाखरू निरिक्षण व अभ्यासकांना अभ्यास दौरे उपलब्ध करुन देण्यात येईल. हा महोत्सव ठराविक हंगामासाठी न चालविता जास्तीत जास्त कसा चालविता येईल यासाठी प्रयत्न केला जाईल. असे स्पष्ट केले. यावेळी पारपोली सरपंच कृष्णा नाईक, उपसरपंच संदेश गुरव, सहाय्यक उपवनसंरक्षक डाॅ.सुनिल लाड यांची भाषणे झाली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग