शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

फुलपाखरू महोत्सव वर्षभर भरविण्यात यावा - पालकमंत्री रविंद्र चव्हाण 

By अनंत खं.जाधव | Updated: October 20, 2023 16:27 IST

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हयाला पर्यटनाची एक नवीन ओळख निर्माण झाली आहे.त्यामुळेच पारपोली गावात पर्यटक आले पाहिजेत यासाठी ठराविक हंगामात ...

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हयाला पर्यटनाची एक नवीन ओळख निर्माण झाली आहे.त्यामुळेच पारपोली गावात पर्यटक आले पाहिजेत यासाठी ठराविक हंगामात महोत्सव न भरवता वर्षभर असे महोत्सव व्हावेत यातून  पारपोली गावला एक नवीन दिशा मिळेल हा भाग पर्यटनाचे एक नवीन स्थळ म्हणून विकसित होईल असे मत राज्याचे सार्वजनिक बांधकाम तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी मांडले. तर भविष्यात पारपोली फुलपाखरांचे गाव जगाच्या नकाशावर येईल असे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.पारपोली येथे वनविभाग तसेच सिंधुरत्न व पारपोली वनव्यवस्थापन समिती याच्या सहकार्यातून फुलपाखरू महोत्सव भरविण्यात आला असून त्याचे उद्घाटन शुक्रवारी मंत्री चव्हाण शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर याच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, उपवनसंरक्षक एस. नवकिशोर रेड्डी, सहाय्यक उपवनसंरक्षक डॉ. सुनिल लाड, माजी आमदार राजन तेली, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसिलदार श्रीधर पाटील, सरपंच कृष्णा नाईक आदी. उपस्थित होते.मंत्री चव्हाण म्हणाले, मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अपघाताने पालकमंत्री झालो. तरी जिल्ह्याचा सुपुत्र या नात्याने  जे करता येईल त्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहील. पर्यटनाच्या वाढीसाठी सिंधुरत्न योजनेतून मंत्री दीपक केसरकर यांनी भरवलेला हा महोत्सव खरोखरच येणाऱ्या काळासाठी फार महत्त्वाचा आहे. मात्र हा महोत्सव ठराविक हंगामासाठी न होता वर्षभर होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे असे मत मांडले.मंत्री केसरकर म्हणाले,  पारपोली या गावात आढळणारी विविध प्रकारचे फुलपाखरू लक्षात घेता हे गाव  फुलपाखरांचे गाव म्हणून घोषित करण्यात येत आहे. आंबोलीची ओळख ज्याप्रमाणे आज जगाच्या नकाशावर झाली आहे तीच ओळख भविष्यात पारपोली गावची झाली पाहिजे यासाठी माझे प्रयत्न आहेत आणि याचाच भाग म्हणून रत्नसिंधू योजनेच्या माध्यमातून फुलपाखरू महोत्सव या ठिकाणी घेण्यात आला मात्र एखादा महोत्सव घेऊन गावाचा विकास होत नाही तर त्या ठिकाणी बारमाही पर्यटन चालले पाहिजे. यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. सगळ्या गावाने पुढे येऊन राजकारण बाजूला ठेवून आपले गाव फुलपाखराचे गाव म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले.तसेच काका भिसे व हेमंत ओगले यांच्या पावलावर पाऊल टाकून गावातील तरुणांना फुलपाखरू प्रशिक्षक म्हणून निर्माण करावेत असे आवाहन केले. उपवनसंरक्षक रेड्डी यांनी महोत्सव घेण्यामागे फुलपाखरू संवर्धन आणि संरक्षण हा या मागचा उद्देश असून भविष्यात पर्यटकांना याठिकाणी फुलपाखरू निरिक्षण व अभ्यासकांना अभ्यास दौरे उपलब्ध करुन देण्यात येईल. हा महोत्सव ठराविक हंगामासाठी न चालविता जास्तीत जास्त कसा चालविता येईल यासाठी प्रयत्न केला जाईल. असे स्पष्ट केले. यावेळी पारपोली सरपंच कृष्णा नाईक, उपसरपंच संदेश गुरव, सहाय्यक उपवनसंरक्षक डाॅ.सुनिल लाड यांची भाषणे झाली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग