शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

फुलपाखरू महोत्सव वर्षभर भरविण्यात यावा - पालकमंत्री रविंद्र चव्हाण 

By अनंत खं.जाधव | Updated: October 20, 2023 16:27 IST

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हयाला पर्यटनाची एक नवीन ओळख निर्माण झाली आहे.त्यामुळेच पारपोली गावात पर्यटक आले पाहिजेत यासाठी ठराविक हंगामात ...

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हयाला पर्यटनाची एक नवीन ओळख निर्माण झाली आहे.त्यामुळेच पारपोली गावात पर्यटक आले पाहिजेत यासाठी ठराविक हंगामात महोत्सव न भरवता वर्षभर असे महोत्सव व्हावेत यातून  पारपोली गावला एक नवीन दिशा मिळेल हा भाग पर्यटनाचे एक नवीन स्थळ म्हणून विकसित होईल असे मत राज्याचे सार्वजनिक बांधकाम तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी मांडले. तर भविष्यात पारपोली फुलपाखरांचे गाव जगाच्या नकाशावर येईल असे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.पारपोली येथे वनविभाग तसेच सिंधुरत्न व पारपोली वनव्यवस्थापन समिती याच्या सहकार्यातून फुलपाखरू महोत्सव भरविण्यात आला असून त्याचे उद्घाटन शुक्रवारी मंत्री चव्हाण शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर याच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, उपवनसंरक्षक एस. नवकिशोर रेड्डी, सहाय्यक उपवनसंरक्षक डॉ. सुनिल लाड, माजी आमदार राजन तेली, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसिलदार श्रीधर पाटील, सरपंच कृष्णा नाईक आदी. उपस्थित होते.मंत्री चव्हाण म्हणाले, मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अपघाताने पालकमंत्री झालो. तरी जिल्ह्याचा सुपुत्र या नात्याने  जे करता येईल त्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहील. पर्यटनाच्या वाढीसाठी सिंधुरत्न योजनेतून मंत्री दीपक केसरकर यांनी भरवलेला हा महोत्सव खरोखरच येणाऱ्या काळासाठी फार महत्त्वाचा आहे. मात्र हा महोत्सव ठराविक हंगामासाठी न होता वर्षभर होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे असे मत मांडले.मंत्री केसरकर म्हणाले,  पारपोली या गावात आढळणारी विविध प्रकारचे फुलपाखरू लक्षात घेता हे गाव  फुलपाखरांचे गाव म्हणून घोषित करण्यात येत आहे. आंबोलीची ओळख ज्याप्रमाणे आज जगाच्या नकाशावर झाली आहे तीच ओळख भविष्यात पारपोली गावची झाली पाहिजे यासाठी माझे प्रयत्न आहेत आणि याचाच भाग म्हणून रत्नसिंधू योजनेच्या माध्यमातून फुलपाखरू महोत्सव या ठिकाणी घेण्यात आला मात्र एखादा महोत्सव घेऊन गावाचा विकास होत नाही तर त्या ठिकाणी बारमाही पर्यटन चालले पाहिजे. यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. सगळ्या गावाने पुढे येऊन राजकारण बाजूला ठेवून आपले गाव फुलपाखराचे गाव म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले.तसेच काका भिसे व हेमंत ओगले यांच्या पावलावर पाऊल टाकून गावातील तरुणांना फुलपाखरू प्रशिक्षक म्हणून निर्माण करावेत असे आवाहन केले. उपवनसंरक्षक रेड्डी यांनी महोत्सव घेण्यामागे फुलपाखरू संवर्धन आणि संरक्षण हा या मागचा उद्देश असून भविष्यात पर्यटकांना याठिकाणी फुलपाखरू निरिक्षण व अभ्यासकांना अभ्यास दौरे उपलब्ध करुन देण्यात येईल. हा महोत्सव ठराविक हंगामासाठी न चालविता जास्तीत जास्त कसा चालविता येईल यासाठी प्रयत्न केला जाईल. असे स्पष्ट केले. यावेळी पारपोली सरपंच कृष्णा नाईक, उपसरपंच संदेश गुरव, सहाय्यक उपवनसंरक्षक डाॅ.सुनिल लाड यांची भाषणे झाली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग