शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

कुडाळला बॅनरचा विळखा

By admin | Updated: September 22, 2015 00:12 IST

प्रशासनाचे दुर्लक्ष : जुने फलक कोसळण्याच्या अवस्थेत

रजनीकांत कदम -कुडाळ  कुडाळ शहरामधील रस्त्याच्या कडेला बॅनरबाजीचे प्रमाण वाढत असून, काही बॅनर तर गेले कित्येक महिने काढलेच गेले नसल्याने ते कमकुवत होऊन कोसळण्याच्या अवस्थेत आहेत. यामुळे वाहनचालक, पादचाऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. या वाढत्या धोकादायक बॅनरबाजीकडे प्रशासनानने जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.स्पर्धेच्या या वाढत्या युगात आता शुभेच्छा देण्यासाठी किंवा इतर मते व्यक्त करण्यासाठी स्पेलश मीडियाबरोबर डिजिटल बॅनरच वापर मोठ्या प्रमाणात हल्ली वाढत आहे. तत्काळ हवा तसा मजकूर छापून मिळत असल्याने सगळीकडे डिजिटल बॅनरचा वापर मोठ्या प्रमाणात होत असताना दिसत आहे. बहुतेक करून रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या या बॅनरबाजीचा ऊत आता कुडाळ शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. कुडाळ शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते कुडाळ पोलीस ठाणे येथील शहराच्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी वाढत आहे. या बॅनरबाजीमध्ये राजकीय पक्ष सामाजिक संघटना तसेच इतर छोट्यामोठ्या लोकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.शहरामध्ये लावण्यात आलेले काही बॅनर ज्या राजकारणासाठी लावण्यात आले आहेत. ते कारण होऊन कित्येक महिने लोटले, तरी नंतर मात्र तिथेच असतो. त्यामुळे अशा बॅनरच्या लाकडी चौकडी खराब झाल्याने हे बॅनर रस्त्यावर कोसळण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे एखादा अपघातही येथे घडू शकतो. शक्यतो शहरात लावण्यात येणाऱ्या बॅनरना प्रशासनाकडे परवानगी लागत असते. असा नियम आहे. ज्यावेळी जो बॅनर लावण्यासाठी परवानगी दिली जाते, तो बॅनर किती काळासाठी असेल, त्याचा कालावधीही प्रशासनाकडून नमूद केलेल्या असते. मात्र, येथे लावण्यात आलेले सर्वच बॅनर परवानगी घेऊन लावण्यात आले आहेत का? की नाहीत? याबाबत जनतेत मतभिन्नता आहे. त्यामुळे या परवानगीचे गौडबंगाल नेमके काय आहे? याची उत्सुकता जनतेला लागुन राहीली आहे. काहीवेळा आक्षेपार्ह बॅनर लावले जातात. मग त्यामुळे वातावरण तापण्यास सुरूवात होते. पोलीस प्रशासनामार्फत ही गोष्ट गेली की, पोलीस प्रशासन हे बॅनर काढतात व वातावरण शांत ठेवतात. त्यामुळे असे बॅनर लावायला परवानगी कोण देते? अशाप्रकारच्या अनेक घटना गेल्या वर्षभरापूर्वी घडल्या होत्या. काही बॅनर लावण्यात येतात. मात्र, ते जमिनीवर न बांधता ठेवलेले असतात. तर काही बॅनरांची लाकडी चौकड चांगली नसते. दोरीही चांगली बांधण्यात येत नाही. असे बॅनर धोकादायक स्थितीतील बॅनर वाद निर्माण करणारे ठरतात. वाढत्या बॅनरबाजीवर नियंत्रण मिळविण्यासाठी व धोकादायक स्थिती कमी करण्यासाठी प्रशासनाने प्रत्येक बॅनरवर हा प्रशासनाच्या परवानगीने लावण्यात यावा, बॅनरचा कालावधी निश्चित करावा, कालावधी संपल्यानंतर तो बॅनर काढून न नेणाऱ्यांवर तसेच परवानगी शिवाय ज्यांनी बॅनर लावले, अशांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, बॅनरमुळे धोका निर्माण होऊ नये, अशा पध्दतीत बॅनर लावण्याच्या सक्त सूचना देण्यात आली. भविष्यात या बॅनरमुळे एखादी दुर्घटना होऊ नये, वातावरण बिघडू नये, यासाठी प्रशासनाने येथील बॅनर लावण्यासंदर्भात योग्य ती नियमावली जाहीर केली पाहिजे. जेणेकरून बॅनर लावायचे असतील, त्यांना रितसर परवानगी मिळेलच, शिवाय बॅनरही चांगल्या स्थितीत राहील व धोकाही निर्माण होणार नाही. जसा लावतो तसा काढावाज्या पध्दतीने आपण बॅनर लावतो, त्या पध्दतीने तो बॅनर ठराविक कालावधी झाल्यानंतर काढणे हे प्रत्येक बॅनर लावणाऱ्याचे कर्तव्य आहे. अन्यथा बॅनर लावणाऱ्यांची व बॅनरवरील असणाऱ्या छब्या यांची पुरती हालत पाहण्याजोगी होत असते.बसस्थानकातील बॅनर कोसळताहेतकाही दिवसांपूर्वी कुडाळ बसस्थानकावरील लोखंडी चौकटीचा भलामोेठा बॅनर भरदिवसा गर्दीच्यावेळी कोसळला होता. मात्र, तो एसटी बसवर कोसळल्याने अडकला. नाही तर मोठे नुकसान झाले असते. अशाप्रकारे शहरात बऱ्याच ठिकाणी धोकादायक बॅनर रस्त्याच्या कडेला आहेत. मात्र, त्याकडे बॅनर लावणाऱ्यांचे व प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असून, हे धोकादायक बॅनरपैकी एखादा बॅनर चालत्या वाहनावर किंवा पादचाऱ्यांवर कोसळून दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण. हा प्रश्न अनुत्तरीतच राहत आहे.