शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

कुडाळला बॅनरचा विळखा

By admin | Updated: September 22, 2015 00:12 IST

प्रशासनाचे दुर्लक्ष : जुने फलक कोसळण्याच्या अवस्थेत

रजनीकांत कदम -कुडाळ  कुडाळ शहरामधील रस्त्याच्या कडेला बॅनरबाजीचे प्रमाण वाढत असून, काही बॅनर तर गेले कित्येक महिने काढलेच गेले नसल्याने ते कमकुवत होऊन कोसळण्याच्या अवस्थेत आहेत. यामुळे वाहनचालक, पादचाऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. या वाढत्या धोकादायक बॅनरबाजीकडे प्रशासनानने जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.स्पर्धेच्या या वाढत्या युगात आता शुभेच्छा देण्यासाठी किंवा इतर मते व्यक्त करण्यासाठी स्पेलश मीडियाबरोबर डिजिटल बॅनरच वापर मोठ्या प्रमाणात हल्ली वाढत आहे. तत्काळ हवा तसा मजकूर छापून मिळत असल्याने सगळीकडे डिजिटल बॅनरचा वापर मोठ्या प्रमाणात होत असताना दिसत आहे. बहुतेक करून रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या या बॅनरबाजीचा ऊत आता कुडाळ शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. कुडाळ शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते कुडाळ पोलीस ठाणे येथील शहराच्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी वाढत आहे. या बॅनरबाजीमध्ये राजकीय पक्ष सामाजिक संघटना तसेच इतर छोट्यामोठ्या लोकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.शहरामध्ये लावण्यात आलेले काही बॅनर ज्या राजकारणासाठी लावण्यात आले आहेत. ते कारण होऊन कित्येक महिने लोटले, तरी नंतर मात्र तिथेच असतो. त्यामुळे अशा बॅनरच्या लाकडी चौकडी खराब झाल्याने हे बॅनर रस्त्यावर कोसळण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे एखादा अपघातही येथे घडू शकतो. शक्यतो शहरात लावण्यात येणाऱ्या बॅनरना प्रशासनाकडे परवानगी लागत असते. असा नियम आहे. ज्यावेळी जो बॅनर लावण्यासाठी परवानगी दिली जाते, तो बॅनर किती काळासाठी असेल, त्याचा कालावधीही प्रशासनाकडून नमूद केलेल्या असते. मात्र, येथे लावण्यात आलेले सर्वच बॅनर परवानगी घेऊन लावण्यात आले आहेत का? की नाहीत? याबाबत जनतेत मतभिन्नता आहे. त्यामुळे या परवानगीचे गौडबंगाल नेमके काय आहे? याची उत्सुकता जनतेला लागुन राहीली आहे. काहीवेळा आक्षेपार्ह बॅनर लावले जातात. मग त्यामुळे वातावरण तापण्यास सुरूवात होते. पोलीस प्रशासनामार्फत ही गोष्ट गेली की, पोलीस प्रशासन हे बॅनर काढतात व वातावरण शांत ठेवतात. त्यामुळे असे बॅनर लावायला परवानगी कोण देते? अशाप्रकारच्या अनेक घटना गेल्या वर्षभरापूर्वी घडल्या होत्या. काही बॅनर लावण्यात येतात. मात्र, ते जमिनीवर न बांधता ठेवलेले असतात. तर काही बॅनरांची लाकडी चौकड चांगली नसते. दोरीही चांगली बांधण्यात येत नाही. असे बॅनर धोकादायक स्थितीतील बॅनर वाद निर्माण करणारे ठरतात. वाढत्या बॅनरबाजीवर नियंत्रण मिळविण्यासाठी व धोकादायक स्थिती कमी करण्यासाठी प्रशासनाने प्रत्येक बॅनरवर हा प्रशासनाच्या परवानगीने लावण्यात यावा, बॅनरचा कालावधी निश्चित करावा, कालावधी संपल्यानंतर तो बॅनर काढून न नेणाऱ्यांवर तसेच परवानगी शिवाय ज्यांनी बॅनर लावले, अशांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, बॅनरमुळे धोका निर्माण होऊ नये, अशा पध्दतीत बॅनर लावण्याच्या सक्त सूचना देण्यात आली. भविष्यात या बॅनरमुळे एखादी दुर्घटना होऊ नये, वातावरण बिघडू नये, यासाठी प्रशासनाने येथील बॅनर लावण्यासंदर्भात योग्य ती नियमावली जाहीर केली पाहिजे. जेणेकरून बॅनर लावायचे असतील, त्यांना रितसर परवानगी मिळेलच, शिवाय बॅनरही चांगल्या स्थितीत राहील व धोकाही निर्माण होणार नाही. जसा लावतो तसा काढावाज्या पध्दतीने आपण बॅनर लावतो, त्या पध्दतीने तो बॅनर ठराविक कालावधी झाल्यानंतर काढणे हे प्रत्येक बॅनर लावणाऱ्याचे कर्तव्य आहे. अन्यथा बॅनर लावणाऱ्यांची व बॅनरवरील असणाऱ्या छब्या यांची पुरती हालत पाहण्याजोगी होत असते.बसस्थानकातील बॅनर कोसळताहेतकाही दिवसांपूर्वी कुडाळ बसस्थानकावरील लोखंडी चौकटीचा भलामोेठा बॅनर भरदिवसा गर्दीच्यावेळी कोसळला होता. मात्र, तो एसटी बसवर कोसळल्याने अडकला. नाही तर मोठे नुकसान झाले असते. अशाप्रकारे शहरात बऱ्याच ठिकाणी धोकादायक बॅनर रस्त्याच्या कडेला आहेत. मात्र, त्याकडे बॅनर लावणाऱ्यांचे व प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असून, हे धोकादायक बॅनरपैकी एखादा बॅनर चालत्या वाहनावर किंवा पादचाऱ्यांवर कोसळून दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण. हा प्रश्न अनुत्तरीतच राहत आहे.