शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प

By admin | Updated: March 22, 2017 23:39 IST

सिंधुदुर्गनगरी येथील चर्चासत्रातील सूर : तरतुदींचे सकारात्मक परिवर्तन झाले पाहिजे; शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल

सिंधुदुर्गनगरी : पर्यटन वृद्धीसाठी चालना मिळण्याबरोबरच सिंधुदुर्गच्या विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प आहे. याचबरोबर अर्थसंकल्पातील विकास योजनांवर केलेल्या तरतुदींचे सकारात्मक परिवर्तन व्हावे, अस मत राज्याच्या अर्थसंकल्पावर येथे आयोजित चर्चासत्रामध्ये आज व्यक्त करण्यात आले.जिल्हा माहिती कार्यालय व सिंधुदुर्ग व सिंधुदुर्गनगरी मुख्यालय पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने येथील पत्रकार कक्षात ‘राज्याच्या अर्थसंकल्पावर’ चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य जान्हवी सावंत, उद्योजक नितीन वाळके, अतुल हुले व ग्राहक संरक्षण मंचाचे अध्यक्ष राजस रेगे यांनी सहभाग घेतला होता.चर्चासत्राची सुरूवात अतुल हुले यांनी केली. कोकण व सिंधुदुर्गसाठी अत्यंत आशादायक व सकारात्मक असा हा अर्थसंकल्प असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मात्र, या योजना तेवढ्याच वेगाने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत असेही ते म्हणाले. कोकणसाठी स्वतंत्र महामंडळ, जलवाहतूक या बाबतची प्रक्रिया तातडीने कार्यान्वित होणे आवश्यक आहे व स्थानिक प्रशासनाकडून यासाठीची कामे करुन घेणे आवश्यक आहे.नितीन वाळके यांनी सिंधुदुर्गसाठी उत्कृष्ट असा अर्थसंकल्प असल्याचे मत व्यक्त केले. पर्यटनवृद्धी कोकणातील शेतमालाला योग्य हमी भाव, तिलारी प्रकल्पासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद, नारळ व कोकमावरील कमी केलेला कर यामुळे सिंधुदुर्गातील नागरिकांना चांगले दिवस येतील यात शंका नाही. सिंचनासाठी भरीव तरतूद केल्यामुळे शेतकऱ्यांमधील क्रयशक्तीला चालना मिळेल व उत्पन्नातही वाढ होईल अशी आशाही त्यांनतर व्यक्त केली.या अर्थसंकल्पात राज्य महिला आयोगाला ७ कोटी रुपयांचे अनुदान दिल्यामुळे महिलांसाठी ही चांगली बाब आहे. अ‍ॅसिड टाकून चेहरा विद्रुप झालेल्या महिलांना सक्षम करण्यासाठी यातून चालना मिळेल असेही जान्हवी सांवत म्हणाल्या. या अर्थसंकल्पात माकडताप संशोधन केंद्र, किशोरवयीन मुलींसाठी उत्कर्षा या योजनेप्रमाणे अस्मिता, कांदळवन संरक्षण, जिल्हा रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त देण्यात येणारे २५ कोटी रुपये हे सिंधुदुर्ग जिल्ह्याला भविष्यातील विकासाचे द्योतक आहे असेही त्या म्हणाल्या.राजस रेगे यांनी सिंधुदुर्गात मत्स्य शेतीला चालना मिळावी म्हणून मत्स्यबीज निर्मिती केंद्र उभारणे, बांबू लागवड, जेटी सुधारणा करणे या महत्त्वाच्या बाबींचा समावेश अर्थसंकल्पात करण्यात आल्याने सिंधुदुर्गातील जनतेला याचा मोठा फायदा होणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. थोर पुरुषांच्या स्मारकासाठी व हुतात्मा स्मारकांसाठी यावेळी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. तेही चांगलेच आहे. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर येथे खंडपीठ व्हावे म्हणून विशेष लक्ष देऊन अर्थसंकल्पात किमान जागेसाठी तरतूद करुन चालना देणे आवश्यक होते. ते झालेले नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.या चर्चासत्रात जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर, मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संदिप गावडे, बाळ खडपकर, देवयानी वरसकर यांनी सहभाग घेतला. चर्चासत्राचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर यांनी, स्वागत संदिप गावडे यांनी तर आभार बाळ खडपकर यांनी मानले. (प्रतिनिधी)