शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प

By admin | Updated: March 22, 2017 23:39 IST

सिंधुदुर्गनगरी येथील चर्चासत्रातील सूर : तरतुदींचे सकारात्मक परिवर्तन झाले पाहिजे; शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल

सिंधुदुर्गनगरी : पर्यटन वृद्धीसाठी चालना मिळण्याबरोबरच सिंधुदुर्गच्या विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प आहे. याचबरोबर अर्थसंकल्पातील विकास योजनांवर केलेल्या तरतुदींचे सकारात्मक परिवर्तन व्हावे, अस मत राज्याच्या अर्थसंकल्पावर येथे आयोजित चर्चासत्रामध्ये आज व्यक्त करण्यात आले.जिल्हा माहिती कार्यालय व सिंधुदुर्ग व सिंधुदुर्गनगरी मुख्यालय पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने येथील पत्रकार कक्षात ‘राज्याच्या अर्थसंकल्पावर’ चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य जान्हवी सावंत, उद्योजक नितीन वाळके, अतुल हुले व ग्राहक संरक्षण मंचाचे अध्यक्ष राजस रेगे यांनी सहभाग घेतला होता.चर्चासत्राची सुरूवात अतुल हुले यांनी केली. कोकण व सिंधुदुर्गसाठी अत्यंत आशादायक व सकारात्मक असा हा अर्थसंकल्प असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मात्र, या योजना तेवढ्याच वेगाने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत असेही ते म्हणाले. कोकणसाठी स्वतंत्र महामंडळ, जलवाहतूक या बाबतची प्रक्रिया तातडीने कार्यान्वित होणे आवश्यक आहे व स्थानिक प्रशासनाकडून यासाठीची कामे करुन घेणे आवश्यक आहे.नितीन वाळके यांनी सिंधुदुर्गसाठी उत्कृष्ट असा अर्थसंकल्प असल्याचे मत व्यक्त केले. पर्यटनवृद्धी कोकणातील शेतमालाला योग्य हमी भाव, तिलारी प्रकल्पासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद, नारळ व कोकमावरील कमी केलेला कर यामुळे सिंधुदुर्गातील नागरिकांना चांगले दिवस येतील यात शंका नाही. सिंचनासाठी भरीव तरतूद केल्यामुळे शेतकऱ्यांमधील क्रयशक्तीला चालना मिळेल व उत्पन्नातही वाढ होईल अशी आशाही त्यांनतर व्यक्त केली.या अर्थसंकल्पात राज्य महिला आयोगाला ७ कोटी रुपयांचे अनुदान दिल्यामुळे महिलांसाठी ही चांगली बाब आहे. अ‍ॅसिड टाकून चेहरा विद्रुप झालेल्या महिलांना सक्षम करण्यासाठी यातून चालना मिळेल असेही जान्हवी सांवत म्हणाल्या. या अर्थसंकल्पात माकडताप संशोधन केंद्र, किशोरवयीन मुलींसाठी उत्कर्षा या योजनेप्रमाणे अस्मिता, कांदळवन संरक्षण, जिल्हा रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त देण्यात येणारे २५ कोटी रुपये हे सिंधुदुर्ग जिल्ह्याला भविष्यातील विकासाचे द्योतक आहे असेही त्या म्हणाल्या.राजस रेगे यांनी सिंधुदुर्गात मत्स्य शेतीला चालना मिळावी म्हणून मत्स्यबीज निर्मिती केंद्र उभारणे, बांबू लागवड, जेटी सुधारणा करणे या महत्त्वाच्या बाबींचा समावेश अर्थसंकल्पात करण्यात आल्याने सिंधुदुर्गातील जनतेला याचा मोठा फायदा होणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. थोर पुरुषांच्या स्मारकासाठी व हुतात्मा स्मारकांसाठी यावेळी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. तेही चांगलेच आहे. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर येथे खंडपीठ व्हावे म्हणून विशेष लक्ष देऊन अर्थसंकल्पात किमान जागेसाठी तरतूद करुन चालना देणे आवश्यक होते. ते झालेले नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.या चर्चासत्रात जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर, मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संदिप गावडे, बाळ खडपकर, देवयानी वरसकर यांनी सहभाग घेतला. चर्चासत्राचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर यांनी, स्वागत संदिप गावडे यांनी तर आभार बाळ खडपकर यांनी मानले. (प्रतिनिधी)