शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

ब्रिटिशकालीन पूल होणार इतिहासजमा - मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 17:36 IST

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे  काम प्रगतीपथावर असून कोकणच्या दळणवळण क्रांतीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे ब्रिटिशकालीन पूल पुढील वर्षअखेरपर्यंत इतिहासजमा होणार आहेत.

ठळक मुद्दे चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावरब्रिटीश शासनाने १९३० मध्ये नदीपात्रांवर पुलांची उभारणी सुरू केली. तर १९३४ ते १९४३ पर्यंत या पुलांची कामे पूर्ण

कणकवली : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे  काम प्रगतीपथावर असून कोकणच्या दळणवळण क्रांतीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे ब्रिटिशकालीन पूल पुढील वर्षअखेरपर्यंत इतिहासजमा होणार आहेत. त्याजागी नवीन सिमेंट काँक्रीटच्या पुलांची उभारणी होणार आहे. सन १९३४ मध्ये मुंबई-गोवा महामार्गावरील अनेक पूल वाहतुकीस खुले झाले होते. त्यानंतर गेली ८४ वर्षे या पुलांवरून कित्येक टन अवजड वाहतूक सुरू आहे. ब्रिटिशकाळात उभारलेले हे पूल समर्थपणे सेवा बजावत आहेत.

मुंबई ते गोव्यापर्यंत दळणवळणाच्या मूलभूत सुविधांची उभारणी करताना तत्कालीन ब्रिटीश शासनाने १९३० मध्ये नदीपात्रांवर पुलांची उभारणी सुरू केली. तर १९३४ ते १९४३ पर्यंत या पुलांची कामे पूर्ण झाली. या पुलांमुळे रस्तामार्गे वाहतुकीला चालना मिळाली. त्याचबरोबर समुद्र किनारी असलेल्या बंदरातून बोट तसेच अन्य मार्गाने होणारी वाहतूक बंद झाली.

रस्ते तसेच पूल उभारले गेल्यामुळे  मुंबई-गोवा महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात  नांदगाव, तळेरे, कणकवली, ओरोस, कसाल आदी छोट्या मोठ्या नव्या बाजारपेठा उदयास आल्या. तसेच कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या शहरांचेही महत्त्व वाढले.कणकवली शहरालगत  गडनदी आणि जानवली नदीवरील पुलांची कामे १९३० मध्ये सुरू झाली. यातील जानवली पुलाला त्यावेळी १ लाख ३७ हजार ६६९ रुपये खर्च आला होता. तर गडनदी पुलाचे बांधकाम १ लाख २६ हजार रुपयांमध्ये पूर्ण झाले. दोन्ही पुलांवरून १९३४ मध्ये वाहतूक सुरू झाली. महत्त्वाची बाब म्हणजे महाड तालुक्यातील सावित्री नदीवरील पुलाचा अपवाद वगळता गडनदी आणि जानवली नदीसह महामार्गावरील इतर ब्रिटिशकालीन पूल मागील ८४ वर्षात अवजड वाहने आणि अनेक पूर झेलूनही मजबूत राहिले आहेत.उत्कृष्ट स्थापत्य कलेचा नमुनाआॅगस्ट २०१६ मध्ये पुरात सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाचा काही भाग वाहून गेल्यानंतर महामार्गावरील सर्वच ब्रिटिशकालीन पूल पाडून तेथे नवीन पूल बांधण्याचे शासनाने निश्चित केले. त्यानुसार मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात नवीन पुलांची कामे झाल्यानंतर जुने ब्रिटिशकालीन पूल पाडले जाणार आहेत. महामार्ग चौपदरीकरणातील अपूर्ण पुलांची कामे डिसेंबरअखेर पूर्ण केल्यानंतर कणकवली शहरालगत गडनदी, जानवली, कसाल येथील जुने ब्रिटिशकालीन पूल पाडले जाणार आहेत. त्यामुळे  उत्कृष्ट स्थापत्य कलेचा नमुना असलेले हे पूल इतिहासजमा होणार आहेत.चौकटकाळाच्या ओघात आठवणी नष्ट होणारसिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणाºया मुंबई-गोवा महामार्गावरील ब्रिटिशकालीन खारेपाटण पुलाचे बांधकाम सन १९४६ ते ४७,  पियाळी पुलाचे बांधकाम सन १९४१,  जानवली पुलाचे बांधकाम १९३४, कणकवली गडनदी पूल सन १९३४,  कसाल पूल १९३४, पीठढवळ पूल १९५७,  बांबर्डे पूल बांधकाम १९३८ साली करण्यात आले आहे. या पुलांशी निगडीत अनेक आठवणी असून जुन्या जाणत्या लोकांकडून त्या ऐकायला मिळतात. हे पूल पाडल्यानंतर काळाच्या ओघात या आठवणी नष्ट होणार असल्याची हुरहूर अनेक नागरिकांना लागून राहिली आहे. तशी प्रतिक्रिया ते व्यक्त करताना दिसत आहेत.

 

टॅग्स :highwayमहामार्गpwdसार्वजनिक बांधकाम विभाग