शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

मुले वळताहेत इंग्रजी माध्यमांकडे...

By admin | Updated: November 7, 2014 23:42 IST

धोक्याची घंटा : इंग्रजीच्या वर्चस्वामुळे मराठी शाळांना धोक्याची घंटा

राजापूर : इंग्रजी माध्यम शाळांच्या वर्चस्वाचा फटका मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषद शाळांना बसत आहे. घसरणाऱ्या पटसंख्येमुळे मागील दोन वर्षात शून्य पटसंख्येच्या चार शाळा बंद करण्याची वेळ शिक्षण विभागावर आली आहे. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ३६७ शाळा असून, त्यामध्ये ३४९ मराठी, तर १८ उर्दु माध्यमाच्या आहेत. मागील काही वर्षे इंग्रजी माध्यमांचे वर्चस्व निर्माण होत असल्याने त्याचा फटका जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांना बसू लागला आहे. त्यातूनच घसरत जाणारी पटसंख्या शुन्यावर आलेल्या चार शाळा चक्क बंद करण्याची वेळ शिक्षण विभागावर येऊन ठेपली आहे. वाटूळ, करक नं. ४, बागकाझी उर्दु शाळा व तिथवली धनगरवाडी या शाळांचा त्यामध्ये समावेश आहे. इंग्रजी माध्यमाकडे कल वाढल्याने चालू वर्षी जिल्हा परिषदेचा तालुक्यातील शाळांची एकूण पटसंख्या १ हजार ९३२ घटली. ती १३ आता हजार ५९४ एवढी झाली आहे. शाळांची ही घसरण कायम राहिली, तर यापुढे मराठी शाळांचे भवितव्य अधांतरी बनेल. त्यामुळे घसरणारी पटसंख्या थोपवण्याची मोठी जबाबदारी शिक्षण विभागावर आली आहे. तालुक्यातील मराठी शाळांसाठी ही धोक्याची घंटा आहे. सध्या पटसंख्येअभावी जिल्हा परिषद मराठी शाळांची स्थिती अधिकच खालावत चालल्याचे चित्र असतानाच इंग्रजी माध्यमाच्या शाळांना सुगीचे दिवस आले आहेत. विशेषकरून पालकांचाच इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे अधिक कल असलेला दिसून येतो. त्यामुळे जिल्हा परिषद मराठी शाळांच्या भवितव्याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे.पूर्वी मराठी माध्यमाच्या शाळा अधिक व सोयीच्या असल्याने त्या भागातील पालक आपली मुले या शाळांमध्ये दाखल करत होते. सध्या अशा शाळांमध्ये इंग्रजीचे आक्रमण सुरु झाल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)घसरणाऱ्या पटसंख्येमुळे मागील दोन वर्षात शून्य पटसंख्येच्या चार शाळा बंद करण्याची वेळ.इंग्रजी माध्यमाचे वर्चस्व निर्माण होत असल्याने जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांना बसतोय फटका. शाळांची ही घसरण कायम राहिली तर यापुढे मराठी शाळांचे भवितव्य अधांतरी.पटसंख्या थोपवण्याची गरज.