शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

भाजप येत्या सोमवारी 'या'साठी धरणे आंदोलन छेडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2021 19:13 IST

कणकवली: सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनधिकृत दारु विक्री, वाळू व्यवसायाजसह अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात प्रशासनाकडून पाठीशी घातले जात आहे. पालकमंत्र्यांच्या वरदहस्ताने ...

कणकवली: सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनधिकृत दारु विक्री, वाळू व्यवसायाजसह अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात प्रशासनाकडून पाठीशी घातले जात आहे. पालकमंत्र्यांच्या वरदहस्ताने हे अवैध धंदे सिंधुदुर्गात सुरु आहेत. प्रशासनाचा कोणालाच धाक राहिलेला नाही.

त्याचबरोबर त्रिपुरा येथील न घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यात दंगली झाल्या आहेत. त्यात विनाकारण भाजपच्या कार्यकर्त्यांना  पोलिसांमार्फत सत्ताधारी अडकवत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याबरोबरच अटकेचा निषेध व्यक्त करण्यासाठी येत्या सोमवारी, २२ नोव्हेंबरला जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालसमोर भाजपच्यावतीने धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे. अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली. कणकवली येथील भाजपा कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  

राजन तेली म्हणाले, त्रिपुरा घटनेच्यानंतर महाराष्ट्रात मालेगाव,नांदेड, अमरावती येथे दंगली घडल्या आहेत. दुकाने जाळली गेली आहेत. मात्र, कुठल्याही प्रकारची घटना घडली नसताना दंगली झाल्या आहेत. शासन सगळ्या गोष्टी बघत राहिले. दुकाने,गाड्या, कार्यालये  फोडण्यासाठी रस्त्यावर लोक आले. पोलीस गप्प का राहिले? आता पोलिसांनी फक्त अमरावती मध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांना वेठीस धरले आहे. भाजपला टार्गेट करण्याचे काम सत्ताधारी व पोलीस करत असल्याचा आरोप राजन तेली यांनी यावेळी केला.ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही. दंगली घडवणाऱ्या लोकांना सोडले जात आहे. मग पोलिसांचे गुप्तहेर खाते काय करत आहे? भाजप कार्यकर्त्यांना विनाकारण होत असलेल्या  अटकेच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्यावतीने राज्यात ४०० तहसीलदार कार्यालयात धरणे आंदोलन करण्याबरोबरच मुख्यमंत्र्यांना पाठविण्यासाठी  निवेदन सुपूर्द केले जाणार आहे.त्रिपुरा येथे न घडलेल्या घटनेची चौकशी निवृत्त न्यायाधीशामार्फत करावी. दंगल घडवणाऱ्या लोकांवर कारवाई करावी .रजा अकादमीवर बंदी घाला. सामान्य लोकांवर जे गुन्हे दाखल केले ते मागे घ्या,पूर्व ग्रह दुषितपणातून  भाजपच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली आहे ती थांबविण्यात यावी. अशा  मागणीचे निवेदन दिले जाणार आहे,असेही राजन तेली यांनी यावेळी सांगितले.       त्याचबरोबर, एसटी कर्मचारी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ज्या कामगारांचे निलंबन केले आहे ते तात्काळ मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.प्रशासनाच्या आशीर्वादानेच वाळू विक्री !सिंधुदुर्गात राजरोस अनधिकृतरित्या वाळू विकली जात आहे. तीन वर्षे वाळू लिलाव झाले नाहीत. तरीही वाळू मिळत आहे. सत्ताधारी पालकमंत्री व आमदार दरवेळी मुंबईत बैठक लावतात. पण लिलावाच्या दराबाबत निर्णय झाला नाही. प्रशासनाच्या आशीर्वादाने वाळू  बाजारात विकली जात आहे. त्यामागे कोण आहेत हे आता जनतेला दिसून येत असल्याचे तेली म्हणाले.अवैध दारू वाहतुकीवर वचक नाही !दारु किंवा वाळूची कधीतरी एक गाडी पकडली जाते. त्यामुळे त्यांना वचक बसत नाही. अवैध धंदे बंद होणार की नाही?प्रशासन नावाची यंत्रणा जिल्ह्यात राहिलेली नाही. याबाबत सविस्तर माहिती जिल्हाधिकारी यांना देऊनही कारवाई झालेली नाही. मात्र, शेतकऱ्यांने बैलगाडी तुन वाळू आणल्यास कारवाई होते. त्यामुळे भाजपच्या पुढील जिल्हा कार्यकारिणीत जिल्हा प्रशासनाविरोधात आंदोलन करण्याचे धोरण निश्चित केले जाईल,असा इशारा राजन तेली यांनी यावेळी दिला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRajan Teliराजन तेली