शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

भाजप येत्या सोमवारी 'या'साठी धरणे आंदोलन छेडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2021 19:13 IST

कणकवली: सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनधिकृत दारु विक्री, वाळू व्यवसायाजसह अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात प्रशासनाकडून पाठीशी घातले जात आहे. पालकमंत्र्यांच्या वरदहस्ताने ...

कणकवली: सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनधिकृत दारु विक्री, वाळू व्यवसायाजसह अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात प्रशासनाकडून पाठीशी घातले जात आहे. पालकमंत्र्यांच्या वरदहस्ताने हे अवैध धंदे सिंधुदुर्गात सुरु आहेत. प्रशासनाचा कोणालाच धाक राहिलेला नाही.

त्याचबरोबर त्रिपुरा येथील न घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यात दंगली झाल्या आहेत. त्यात विनाकारण भाजपच्या कार्यकर्त्यांना  पोलिसांमार्फत सत्ताधारी अडकवत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याबरोबरच अटकेचा निषेध व्यक्त करण्यासाठी येत्या सोमवारी, २२ नोव्हेंबरला जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालसमोर भाजपच्यावतीने धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे. अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली. कणकवली येथील भाजपा कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  

राजन तेली म्हणाले, त्रिपुरा घटनेच्यानंतर महाराष्ट्रात मालेगाव,नांदेड, अमरावती येथे दंगली घडल्या आहेत. दुकाने जाळली गेली आहेत. मात्र, कुठल्याही प्रकारची घटना घडली नसताना दंगली झाल्या आहेत. शासन सगळ्या गोष्टी बघत राहिले. दुकाने,गाड्या, कार्यालये  फोडण्यासाठी रस्त्यावर लोक आले. पोलीस गप्प का राहिले? आता पोलिसांनी फक्त अमरावती मध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांना वेठीस धरले आहे. भाजपला टार्गेट करण्याचे काम सत्ताधारी व पोलीस करत असल्याचा आरोप राजन तेली यांनी यावेळी केला.ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही. दंगली घडवणाऱ्या लोकांना सोडले जात आहे. मग पोलिसांचे गुप्तहेर खाते काय करत आहे? भाजप कार्यकर्त्यांना विनाकारण होत असलेल्या  अटकेच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्यावतीने राज्यात ४०० तहसीलदार कार्यालयात धरणे आंदोलन करण्याबरोबरच मुख्यमंत्र्यांना पाठविण्यासाठी  निवेदन सुपूर्द केले जाणार आहे.त्रिपुरा येथे न घडलेल्या घटनेची चौकशी निवृत्त न्यायाधीशामार्फत करावी. दंगल घडवणाऱ्या लोकांवर कारवाई करावी .रजा अकादमीवर बंदी घाला. सामान्य लोकांवर जे गुन्हे दाखल केले ते मागे घ्या,पूर्व ग्रह दुषितपणातून  भाजपच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली आहे ती थांबविण्यात यावी. अशा  मागणीचे निवेदन दिले जाणार आहे,असेही राजन तेली यांनी यावेळी सांगितले.       त्याचबरोबर, एसटी कर्मचारी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ज्या कामगारांचे निलंबन केले आहे ते तात्काळ मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.प्रशासनाच्या आशीर्वादानेच वाळू विक्री !सिंधुदुर्गात राजरोस अनधिकृतरित्या वाळू विकली जात आहे. तीन वर्षे वाळू लिलाव झाले नाहीत. तरीही वाळू मिळत आहे. सत्ताधारी पालकमंत्री व आमदार दरवेळी मुंबईत बैठक लावतात. पण लिलावाच्या दराबाबत निर्णय झाला नाही. प्रशासनाच्या आशीर्वादाने वाळू  बाजारात विकली जात आहे. त्यामागे कोण आहेत हे आता जनतेला दिसून येत असल्याचे तेली म्हणाले.अवैध दारू वाहतुकीवर वचक नाही !दारु किंवा वाळूची कधीतरी एक गाडी पकडली जाते. त्यामुळे त्यांना वचक बसत नाही. अवैध धंदे बंद होणार की नाही?प्रशासन नावाची यंत्रणा जिल्ह्यात राहिलेली नाही. याबाबत सविस्तर माहिती जिल्हाधिकारी यांना देऊनही कारवाई झालेली नाही. मात्र, शेतकऱ्यांने बैलगाडी तुन वाळू आणल्यास कारवाई होते. त्यामुळे भाजपच्या पुढील जिल्हा कार्यकारिणीत जिल्हा प्रशासनाविरोधात आंदोलन करण्याचे धोरण निश्चित केले जाईल,असा इशारा राजन तेली यांनी यावेळी दिला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRajan Teliराजन तेली