शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

भाजप येत्या सोमवारी 'या'साठी धरणे आंदोलन छेडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2021 19:13 IST

कणकवली: सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनधिकृत दारु विक्री, वाळू व्यवसायाजसह अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात प्रशासनाकडून पाठीशी घातले जात आहे. पालकमंत्र्यांच्या वरदहस्ताने ...

कणकवली: सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनधिकृत दारु विक्री, वाळू व्यवसायाजसह अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात प्रशासनाकडून पाठीशी घातले जात आहे. पालकमंत्र्यांच्या वरदहस्ताने हे अवैध धंदे सिंधुदुर्गात सुरु आहेत. प्रशासनाचा कोणालाच धाक राहिलेला नाही.

त्याचबरोबर त्रिपुरा येथील न घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यात दंगली झाल्या आहेत. त्यात विनाकारण भाजपच्या कार्यकर्त्यांना  पोलिसांमार्फत सत्ताधारी अडकवत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याबरोबरच अटकेचा निषेध व्यक्त करण्यासाठी येत्या सोमवारी, २२ नोव्हेंबरला जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालसमोर भाजपच्यावतीने धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे. अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली. कणकवली येथील भाजपा कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  

राजन तेली म्हणाले, त्रिपुरा घटनेच्यानंतर महाराष्ट्रात मालेगाव,नांदेड, अमरावती येथे दंगली घडल्या आहेत. दुकाने जाळली गेली आहेत. मात्र, कुठल्याही प्रकारची घटना घडली नसताना दंगली झाल्या आहेत. शासन सगळ्या गोष्टी बघत राहिले. दुकाने,गाड्या, कार्यालये  फोडण्यासाठी रस्त्यावर लोक आले. पोलीस गप्प का राहिले? आता पोलिसांनी फक्त अमरावती मध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांना वेठीस धरले आहे. भाजपला टार्गेट करण्याचे काम सत्ताधारी व पोलीस करत असल्याचा आरोप राजन तेली यांनी यावेळी केला.ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही. दंगली घडवणाऱ्या लोकांना सोडले जात आहे. मग पोलिसांचे गुप्तहेर खाते काय करत आहे? भाजप कार्यकर्त्यांना विनाकारण होत असलेल्या  अटकेच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्यावतीने राज्यात ४०० तहसीलदार कार्यालयात धरणे आंदोलन करण्याबरोबरच मुख्यमंत्र्यांना पाठविण्यासाठी  निवेदन सुपूर्द केले जाणार आहे.त्रिपुरा येथे न घडलेल्या घटनेची चौकशी निवृत्त न्यायाधीशामार्फत करावी. दंगल घडवणाऱ्या लोकांवर कारवाई करावी .रजा अकादमीवर बंदी घाला. सामान्य लोकांवर जे गुन्हे दाखल केले ते मागे घ्या,पूर्व ग्रह दुषितपणातून  भाजपच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली आहे ती थांबविण्यात यावी. अशा  मागणीचे निवेदन दिले जाणार आहे,असेही राजन तेली यांनी यावेळी सांगितले.       त्याचबरोबर, एसटी कर्मचारी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ज्या कामगारांचे निलंबन केले आहे ते तात्काळ मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.प्रशासनाच्या आशीर्वादानेच वाळू विक्री !सिंधुदुर्गात राजरोस अनधिकृतरित्या वाळू विकली जात आहे. तीन वर्षे वाळू लिलाव झाले नाहीत. तरीही वाळू मिळत आहे. सत्ताधारी पालकमंत्री व आमदार दरवेळी मुंबईत बैठक लावतात. पण लिलावाच्या दराबाबत निर्णय झाला नाही. प्रशासनाच्या आशीर्वादाने वाळू  बाजारात विकली जात आहे. त्यामागे कोण आहेत हे आता जनतेला दिसून येत असल्याचे तेली म्हणाले.अवैध दारू वाहतुकीवर वचक नाही !दारु किंवा वाळूची कधीतरी एक गाडी पकडली जाते. त्यामुळे त्यांना वचक बसत नाही. अवैध धंदे बंद होणार की नाही?प्रशासन नावाची यंत्रणा जिल्ह्यात राहिलेली नाही. याबाबत सविस्तर माहिती जिल्हाधिकारी यांना देऊनही कारवाई झालेली नाही. मात्र, शेतकऱ्यांने बैलगाडी तुन वाळू आणल्यास कारवाई होते. त्यामुळे भाजपच्या पुढील जिल्हा कार्यकारिणीत जिल्हा प्रशासनाविरोधात आंदोलन करण्याचे धोरण निश्चित केले जाईल,असा इशारा राजन तेली यांनी यावेळी दिला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRajan Teliराजन तेली