शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
6
रामललाच्या अयोध्येत दिसणार रामायणातील आणखी २ व्यक्तिरेखा; ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण!
7
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
8
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
9
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
10
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
11
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
12
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
13
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
14
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
15
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
16
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
17
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
18
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
19
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
20
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!

भाजप मित्रपक्ष; आमची लढाई काँग्रेसविरोधातच

By admin | Updated: July 3, 2016 23:10 IST

वैभव नाईक : हळवल येथील मेळाव्यात प्रतिपादन ; शिवसेना गावागावात पोहोचविणार

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याशी शिवसेनेची नाळ स्थापनेपासून जुळलेली आहे. सिंधुुदुर्गातील अनेक शिवसैनिक स्थापनेपासून कार्यरत होते़. त्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे खासकरून सिंधुदुर्गवर प्रेम होते़. सिंधुदुर्गात पुन्हा नव्या जोमाने शिवसेना कणखरपणे उभी रहात आहे़. आमदार, खासदार निवडून आल्यानंतर शिवसेना गावात पोहोचविण्याची जबाबदारी आमची आहे़ भाजप आपला मित्रपक्ष असल्याने आपली लढाई त्यांच्या सोबत नाही़ तर काँग्रेस विरोधातच असल्याचा निर्वाळा आमदार वैभव नाईक यांनी दिला़. शिवबंधन पंधरवड्याच्या निमित्ताने कळसुली विभागीय मेळाव्याचे आयोजन हळवल येथे शुक्रवारी करण्यात आले होते़. यावेळी आमदार वैभव नाईक बोलत होत़े. यावेळी एस. टी़ कामगार संघटना जिल्हाध्यक्ष संजय पडते, सिध्दीविनायक ट्रस्टचे माजी अध्यक्ष सुभाष मयेकर, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, तालुका संपर्कप्रमुख शंकर पार्सेकर, तालुकाप्रमुख सचिन सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख अ‍ॅड. हर्षद गावडे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, कणकवली शहरप्रमुख शेखर राणे, उपशहरप्रमुख प्रमोद मसुरकर, नगरसेवक सुशांत नाईक, सरपंच शर्वरी राणे, उपतालुकाप्रमुख राजू राणे, राजू राठोड, अनिल शेट्ये, भास्कर राणे, उपसरपंच निलेश ठाकूर, विभागप्रमुख नितीन हरमलकर, युवा सेना विभागप्रमुख रोहित राणे, सुदर्शन राणे, गणेश राणे आदी पदाधिकारी उपस्थित होते़ आमदार नाईक म्हणाले, कणकवली विधानसभेवर पुढचा आमदार शिवसेनेचाच गेलेला असेल़ त्यासाठी आतापासून जिल्हापरिषद व पंचायत समितीवर भगवा फडकविण्यासाठी तयार रहा. ज्या ठिकाणी अन्याय त्या ठिकाणी शिवसेना, ज्या ठिकाणी सामाजिक प्रश्न त्या ठिकाणी शिवसेना हा विचार घेऊन प्रत्येक शिवसैनिकाने काम केले पाहिजे़. राज्यात स्वबळावर लढून देखील ६३ आमदार निवडून आले़. शिवसेना हा सर्वसामान्याचा पक्ष आहे़. त्यामुळे तुमच्यामधील सामान्य कार्यकर्ता आमदार बनू शकला़. आंदोलन करत असताना हळवल, शिरवल, ओसरगाव येथील कार्यकर्ते घेऊनच शिवसेनेची आंदोलन यशस्वी केली. कणकवली मतदारसंघात शिवसेनेचा आमदार असला पाहिजे. त्यासाठी आतापासूनच कामाला लागा. येत्या काळात जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुका जिंकण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे. काँग्रेसने केलेल्या भ्रष्टाचाराविरोधता ठिकठिकाणी आवाज उठवला पाहिजे. अनेक ठिकाणी कोट्यवधींचा निधी देऊन सुध्दा मोठ्या प्रमाणात ठेकेदारांनी लूट केली आहे़ मंत्री युती सरकारचे आहेत. त्यांनी सिंधुदुर्गातील वीजप्रश्नांसाठी ८३ कोटी मंजूर केले आहेत़ हळवल उड्डानपूलप्रश्नी एक महिन्यात मार्ग मोकळा न झाल्यास प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल़ येथील दशक्रोशीतील जनतेला न्याय मिळवून दिला जाईल. कार्यक्रमात सिध्दीविनायक ट्रस्टचे माजी अध्यक्ष सुभाष मयेकर, महिला आघाडी प्रमुख जान्हवी सावंत, अनिल शेट्ये, राजू शेटये, संजय पडते यांनी मार्गदर्शन केले़ सूत्रसंचालन राजू राणे यांनी केले. (वार्ताहर)