शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आंबोलीतील जैवविविधतेला वृक्षतोडीचे ग्रहण

By admin | Updated: May 15, 2016 00:03 IST

परिसर बनतोय उजाड : वनविभागाचे कारवाईकडे दुर्लक्ष, निसर्गप्रेमींचा न्यायालयात जाण्याचा इशारा

आंबोली : आंबोलीसह आंबोलीच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये प्रचंड प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरू असून, वणवेही मोठ्या प्रमाणावर लावले जात आहेत. सह्याद्रीच्या पट्ट्यातील जैवविविधतेचे महत्त्व पाहता हा प्रकार भयंकर व चिंताजनक आहे. या प्रकाराने निसर्गप्रेमींकडून संताप व्यक्त होत असून वनविभाग मात्र यावर कोणतीही कारवाई करत नसल्याचे चित्र आहे. वनविभागाच्या या बोटचेप्या धोरणामुळे आंबोली परिसरातील वृक्षसंपदा नामशेष होण्याचा धोका संभवतो आहे. देशाच्या पर्यटनातील मानबिंदू म्हणून आंबोलीची ओळख आहे. वर्षा पर्यटनात ओसंडून वाहणारा धबधबा, डोंगररांगातून येणारे पावसाचे तुषार आणि गार हवा यामुळे पर्यटकांच्या लोकप्रियतेच्या शिखरावर आंबोली हे गाव पोहचले आहे. चारही बाजूंनी वेढलेल्या झाडांनीही या पर्यटन स्थळाला चांगलाच बहर आला आहे. शिवाय यामध्ये निरनिराळे पक्षी, प्राणी, फुलपाखरे आणि विविध वन्यजीव आढळतात. तसेच या डोंगररांगामध्ये आढळणारी औषधी वनस्पती म्हणजे तर आयुर्वेदाची संपत्तीच मानली जाते. पण या संपत्तीचा दिवसेंदिवस विविध प्रकारांनी ऱ्हास केला जात आहे. यातील प्रमुख कारण म्हणजे येथे होणारी बेकायदेशीर वृक्षतोड होय. सावंतवाडीच्या वनसंज्ञेत व महाराष्ट्र शासनाच्या जमिनीत अवैध वृक्षतोडीचे प्रमाण वाढले असून, घाटउतार तसेच घाटाखालच्या गावांमधील वनसंज्ञेत व महाराष्ट्र शासनाच्या जमिनीत प्रचंड मोठ्या प्रमाणार अनधिकृतरित्या वृक्षतोड होत आहे. घाटात उभे राहिल्यानंतर उघड्या डोळ्यांनी हे दृश्य दिसत असून, या बेसुमार अवैध तोडीमागे कोण कारणीभूत आहे, हे शोधणे गरजेचे आहे. याबाबत जे सर्वसामान्यांना दिसते ते वनकर्मचाऱ्यांना माहीत नाही, असे समजणे चुकीचे ठरेल. शिवाय या तोडीला वाहतूक परवाने कोण देत आहे, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. संपूर्ण सावंतवाडीच्या वनसंज्ञेत व महाराष्ट्र शासनाच्या जमिनीत अवैध वृक्षतोडीचे प्रमाण वाढले असून, वनविभाग मात्र काहीही करत नसल्याचे चित्र आहे.शिवाय या जंगलसंपत्तीत लावले जाणारे वणवेही तितकेच कारणीभुत आहेत. सध्या आंबोली परिसरात या वणव्यांची वाढती संख्या चिंता वाढवणारी ठरत आहे. हे वणवे काही ठिकाणी मुद्दाम लावले जात आहेत तर काही ठिकाणी शिकारीसाठीही लावले जात आहेत. काही वणवे नैसर्गिक रित्या लागले जाऊन वनसंपत्तीची हानी होत आहे. बहुतांशी ठिकाणचे वणवे हे नैसर्गिक नसून लोकांकडून लावले जात असल्याचे निदर्शनास येत आहेत. वारंवार होणारी बेकायदा वृक्षतोड आणि वणवे यामुळे सह्याद्रीच्या पट्ट्यातील जैवविविधतेचा ऱ्हास होण्याचा धोका संभवतो आहे. या वनसंपत्तीचे महत्त्व पाहता हा प्रकार भयंकर व चिंताजनक असतानाही वनविभाग मात्र अजूनही तितकासा गंभीर दिसत नाही. परिणामी वन्य संपत्तीच्या रक्षणाचे वाली कोण, असा सवाल निसर्ग प्रेमींतून व्यक्त होत आहे. हा प्रकार असाच सुरू राहिल्यास निसर्गप्रेमींना न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा इशारा दिला आहे. (वार्ताहर)वनमंत्री, वनसंरक्षक उपवनसंरक्षकांना निवेदनदिवसेंदिवस होत असलेली बेकायदा वृक्षतोड व वणव्यांनी होत असलेल्या वनसंपत्तीचा ऱ्हास याची माहिती असूनही याविरोधात काहीच कारवाई होत नसल्याने निसर्गप्रेमी व वन्यजीव अभ्यासकांनी वनमंत्री, मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर, उपवनसरंक्षक यांना चौकशी व कारवाईचे निवेदन दिले आहे. दिवसेंदिवस होत असलेला वन्यसंपत्तीचा ऱ्हास भविष्यातील मानवी आरोग्याला धोका असून याची कोणीही दखल घेत नाही. त्यामुळे सर्व निसर्गप्रेमी न्यायालयाचे दरवाजे ठोठावतील, असा इशारा दिला आहे. निवेदनाची प्रत वनमंत्री व मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर यांना दिली आहे. याप्रकरणी संबंधित कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.