शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
3
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
5
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
6
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
7
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
8
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
9
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
10
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
11
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
12
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
13
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
14
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
15
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
16
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
17
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
18
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
19
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
20
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
Daily Top 2Weekly Top 5

आंबोलीतील जैवविविधतेला वृक्षतोडीचे ग्रहण

By admin | Updated: May 15, 2016 00:03 IST

परिसर बनतोय उजाड : वनविभागाचे कारवाईकडे दुर्लक्ष, निसर्गप्रेमींचा न्यायालयात जाण्याचा इशारा

आंबोली : आंबोलीसह आंबोलीच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये प्रचंड प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरू असून, वणवेही मोठ्या प्रमाणावर लावले जात आहेत. सह्याद्रीच्या पट्ट्यातील जैवविविधतेचे महत्त्व पाहता हा प्रकार भयंकर व चिंताजनक आहे. या प्रकाराने निसर्गप्रेमींकडून संताप व्यक्त होत असून वनविभाग मात्र यावर कोणतीही कारवाई करत नसल्याचे चित्र आहे. वनविभागाच्या या बोटचेप्या धोरणामुळे आंबोली परिसरातील वृक्षसंपदा नामशेष होण्याचा धोका संभवतो आहे. देशाच्या पर्यटनातील मानबिंदू म्हणून आंबोलीची ओळख आहे. वर्षा पर्यटनात ओसंडून वाहणारा धबधबा, डोंगररांगातून येणारे पावसाचे तुषार आणि गार हवा यामुळे पर्यटकांच्या लोकप्रियतेच्या शिखरावर आंबोली हे गाव पोहचले आहे. चारही बाजूंनी वेढलेल्या झाडांनीही या पर्यटन स्थळाला चांगलाच बहर आला आहे. शिवाय यामध्ये निरनिराळे पक्षी, प्राणी, फुलपाखरे आणि विविध वन्यजीव आढळतात. तसेच या डोंगररांगामध्ये आढळणारी औषधी वनस्पती म्हणजे तर आयुर्वेदाची संपत्तीच मानली जाते. पण या संपत्तीचा दिवसेंदिवस विविध प्रकारांनी ऱ्हास केला जात आहे. यातील प्रमुख कारण म्हणजे येथे होणारी बेकायदेशीर वृक्षतोड होय. सावंतवाडीच्या वनसंज्ञेत व महाराष्ट्र शासनाच्या जमिनीत अवैध वृक्षतोडीचे प्रमाण वाढले असून, घाटउतार तसेच घाटाखालच्या गावांमधील वनसंज्ञेत व महाराष्ट्र शासनाच्या जमिनीत प्रचंड मोठ्या प्रमाणार अनधिकृतरित्या वृक्षतोड होत आहे. घाटात उभे राहिल्यानंतर उघड्या डोळ्यांनी हे दृश्य दिसत असून, या बेसुमार अवैध तोडीमागे कोण कारणीभूत आहे, हे शोधणे गरजेचे आहे. याबाबत जे सर्वसामान्यांना दिसते ते वनकर्मचाऱ्यांना माहीत नाही, असे समजणे चुकीचे ठरेल. शिवाय या तोडीला वाहतूक परवाने कोण देत आहे, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. संपूर्ण सावंतवाडीच्या वनसंज्ञेत व महाराष्ट्र शासनाच्या जमिनीत अवैध वृक्षतोडीचे प्रमाण वाढले असून, वनविभाग मात्र काहीही करत नसल्याचे चित्र आहे.शिवाय या जंगलसंपत्तीत लावले जाणारे वणवेही तितकेच कारणीभुत आहेत. सध्या आंबोली परिसरात या वणव्यांची वाढती संख्या चिंता वाढवणारी ठरत आहे. हे वणवे काही ठिकाणी मुद्दाम लावले जात आहेत तर काही ठिकाणी शिकारीसाठीही लावले जात आहेत. काही वणवे नैसर्गिक रित्या लागले जाऊन वनसंपत्तीची हानी होत आहे. बहुतांशी ठिकाणचे वणवे हे नैसर्गिक नसून लोकांकडून लावले जात असल्याचे निदर्शनास येत आहेत. वारंवार होणारी बेकायदा वृक्षतोड आणि वणवे यामुळे सह्याद्रीच्या पट्ट्यातील जैवविविधतेचा ऱ्हास होण्याचा धोका संभवतो आहे. या वनसंपत्तीचे महत्त्व पाहता हा प्रकार भयंकर व चिंताजनक असतानाही वनविभाग मात्र अजूनही तितकासा गंभीर दिसत नाही. परिणामी वन्य संपत्तीच्या रक्षणाचे वाली कोण, असा सवाल निसर्ग प्रेमींतून व्यक्त होत आहे. हा प्रकार असाच सुरू राहिल्यास निसर्गप्रेमींना न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा इशारा दिला आहे. (वार्ताहर)वनमंत्री, वनसंरक्षक उपवनसंरक्षकांना निवेदनदिवसेंदिवस होत असलेली बेकायदा वृक्षतोड व वणव्यांनी होत असलेल्या वनसंपत्तीचा ऱ्हास याची माहिती असूनही याविरोधात काहीच कारवाई होत नसल्याने निसर्गप्रेमी व वन्यजीव अभ्यासकांनी वनमंत्री, मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर, उपवनसरंक्षक यांना चौकशी व कारवाईचे निवेदन दिले आहे. दिवसेंदिवस होत असलेला वन्यसंपत्तीचा ऱ्हास भविष्यातील मानवी आरोग्याला धोका असून याची कोणीही दखल घेत नाही. त्यामुळे सर्व निसर्गप्रेमी न्यायालयाचे दरवाजे ठोठावतील, असा इशारा दिला आहे. निवेदनाची प्रत वनमंत्री व मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर यांना दिली आहे. याप्रकरणी संबंधित कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.