शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

आंबोलीतील जैवविविधतेला वृक्षतोडीचे ग्रहण

By admin | Updated: May 15, 2016 00:03 IST

परिसर बनतोय उजाड : वनविभागाचे कारवाईकडे दुर्लक्ष, निसर्गप्रेमींचा न्यायालयात जाण्याचा इशारा

आंबोली : आंबोलीसह आंबोलीच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये प्रचंड प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरू असून, वणवेही मोठ्या प्रमाणावर लावले जात आहेत. सह्याद्रीच्या पट्ट्यातील जैवविविधतेचे महत्त्व पाहता हा प्रकार भयंकर व चिंताजनक आहे. या प्रकाराने निसर्गप्रेमींकडून संताप व्यक्त होत असून वनविभाग मात्र यावर कोणतीही कारवाई करत नसल्याचे चित्र आहे. वनविभागाच्या या बोटचेप्या धोरणामुळे आंबोली परिसरातील वृक्षसंपदा नामशेष होण्याचा धोका संभवतो आहे. देशाच्या पर्यटनातील मानबिंदू म्हणून आंबोलीची ओळख आहे. वर्षा पर्यटनात ओसंडून वाहणारा धबधबा, डोंगररांगातून येणारे पावसाचे तुषार आणि गार हवा यामुळे पर्यटकांच्या लोकप्रियतेच्या शिखरावर आंबोली हे गाव पोहचले आहे. चारही बाजूंनी वेढलेल्या झाडांनीही या पर्यटन स्थळाला चांगलाच बहर आला आहे. शिवाय यामध्ये निरनिराळे पक्षी, प्राणी, फुलपाखरे आणि विविध वन्यजीव आढळतात. तसेच या डोंगररांगामध्ये आढळणारी औषधी वनस्पती म्हणजे तर आयुर्वेदाची संपत्तीच मानली जाते. पण या संपत्तीचा दिवसेंदिवस विविध प्रकारांनी ऱ्हास केला जात आहे. यातील प्रमुख कारण म्हणजे येथे होणारी बेकायदेशीर वृक्षतोड होय. सावंतवाडीच्या वनसंज्ञेत व महाराष्ट्र शासनाच्या जमिनीत अवैध वृक्षतोडीचे प्रमाण वाढले असून, घाटउतार तसेच घाटाखालच्या गावांमधील वनसंज्ञेत व महाराष्ट्र शासनाच्या जमिनीत प्रचंड मोठ्या प्रमाणार अनधिकृतरित्या वृक्षतोड होत आहे. घाटात उभे राहिल्यानंतर उघड्या डोळ्यांनी हे दृश्य दिसत असून, या बेसुमार अवैध तोडीमागे कोण कारणीभूत आहे, हे शोधणे गरजेचे आहे. याबाबत जे सर्वसामान्यांना दिसते ते वनकर्मचाऱ्यांना माहीत नाही, असे समजणे चुकीचे ठरेल. शिवाय या तोडीला वाहतूक परवाने कोण देत आहे, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. संपूर्ण सावंतवाडीच्या वनसंज्ञेत व महाराष्ट्र शासनाच्या जमिनीत अवैध वृक्षतोडीचे प्रमाण वाढले असून, वनविभाग मात्र काहीही करत नसल्याचे चित्र आहे.शिवाय या जंगलसंपत्तीत लावले जाणारे वणवेही तितकेच कारणीभुत आहेत. सध्या आंबोली परिसरात या वणव्यांची वाढती संख्या चिंता वाढवणारी ठरत आहे. हे वणवे काही ठिकाणी मुद्दाम लावले जात आहेत तर काही ठिकाणी शिकारीसाठीही लावले जात आहेत. काही वणवे नैसर्गिक रित्या लागले जाऊन वनसंपत्तीची हानी होत आहे. बहुतांशी ठिकाणचे वणवे हे नैसर्गिक नसून लोकांकडून लावले जात असल्याचे निदर्शनास येत आहेत. वारंवार होणारी बेकायदा वृक्षतोड आणि वणवे यामुळे सह्याद्रीच्या पट्ट्यातील जैवविविधतेचा ऱ्हास होण्याचा धोका संभवतो आहे. या वनसंपत्तीचे महत्त्व पाहता हा प्रकार भयंकर व चिंताजनक असतानाही वनविभाग मात्र अजूनही तितकासा गंभीर दिसत नाही. परिणामी वन्य संपत्तीच्या रक्षणाचे वाली कोण, असा सवाल निसर्ग प्रेमींतून व्यक्त होत आहे. हा प्रकार असाच सुरू राहिल्यास निसर्गप्रेमींना न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा इशारा दिला आहे. (वार्ताहर)वनमंत्री, वनसंरक्षक उपवनसंरक्षकांना निवेदनदिवसेंदिवस होत असलेली बेकायदा वृक्षतोड व वणव्यांनी होत असलेल्या वनसंपत्तीचा ऱ्हास याची माहिती असूनही याविरोधात काहीच कारवाई होत नसल्याने निसर्गप्रेमी व वन्यजीव अभ्यासकांनी वनमंत्री, मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर, उपवनसरंक्षक यांना चौकशी व कारवाईचे निवेदन दिले आहे. दिवसेंदिवस होत असलेला वन्यसंपत्तीचा ऱ्हास भविष्यातील मानवी आरोग्याला धोका असून याची कोणीही दखल घेत नाही. त्यामुळे सर्व निसर्गप्रेमी न्यायालयाचे दरवाजे ठोठावतील, असा इशारा दिला आहे. निवेदनाची प्रत वनमंत्री व मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर यांना दिली आहे. याप्रकरणी संबंधित कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.