शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
5
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
6
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
7
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
8
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
9
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
10
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
11
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
12
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
13
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
14
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
15
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
16
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
17
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
18
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
19
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
20
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी

आंबोलीतील जैवविविधतेला वृक्षतोडीचे ग्रहण

By admin | Updated: May 15, 2016 00:03 IST

परिसर बनतोय उजाड : वनविभागाचे कारवाईकडे दुर्लक्ष, निसर्गप्रेमींचा न्यायालयात जाण्याचा इशारा

आंबोली : आंबोलीसह आंबोलीच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये प्रचंड प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरू असून, वणवेही मोठ्या प्रमाणावर लावले जात आहेत. सह्याद्रीच्या पट्ट्यातील जैवविविधतेचे महत्त्व पाहता हा प्रकार भयंकर व चिंताजनक आहे. या प्रकाराने निसर्गप्रेमींकडून संताप व्यक्त होत असून वनविभाग मात्र यावर कोणतीही कारवाई करत नसल्याचे चित्र आहे. वनविभागाच्या या बोटचेप्या धोरणामुळे आंबोली परिसरातील वृक्षसंपदा नामशेष होण्याचा धोका संभवतो आहे. देशाच्या पर्यटनातील मानबिंदू म्हणून आंबोलीची ओळख आहे. वर्षा पर्यटनात ओसंडून वाहणारा धबधबा, डोंगररांगातून येणारे पावसाचे तुषार आणि गार हवा यामुळे पर्यटकांच्या लोकप्रियतेच्या शिखरावर आंबोली हे गाव पोहचले आहे. चारही बाजूंनी वेढलेल्या झाडांनीही या पर्यटन स्थळाला चांगलाच बहर आला आहे. शिवाय यामध्ये निरनिराळे पक्षी, प्राणी, फुलपाखरे आणि विविध वन्यजीव आढळतात. तसेच या डोंगररांगामध्ये आढळणारी औषधी वनस्पती म्हणजे तर आयुर्वेदाची संपत्तीच मानली जाते. पण या संपत्तीचा दिवसेंदिवस विविध प्रकारांनी ऱ्हास केला जात आहे. यातील प्रमुख कारण म्हणजे येथे होणारी बेकायदेशीर वृक्षतोड होय. सावंतवाडीच्या वनसंज्ञेत व महाराष्ट्र शासनाच्या जमिनीत अवैध वृक्षतोडीचे प्रमाण वाढले असून, घाटउतार तसेच घाटाखालच्या गावांमधील वनसंज्ञेत व महाराष्ट्र शासनाच्या जमिनीत प्रचंड मोठ्या प्रमाणार अनधिकृतरित्या वृक्षतोड होत आहे. घाटात उभे राहिल्यानंतर उघड्या डोळ्यांनी हे दृश्य दिसत असून, या बेसुमार अवैध तोडीमागे कोण कारणीभूत आहे, हे शोधणे गरजेचे आहे. याबाबत जे सर्वसामान्यांना दिसते ते वनकर्मचाऱ्यांना माहीत नाही, असे समजणे चुकीचे ठरेल. शिवाय या तोडीला वाहतूक परवाने कोण देत आहे, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. संपूर्ण सावंतवाडीच्या वनसंज्ञेत व महाराष्ट्र शासनाच्या जमिनीत अवैध वृक्षतोडीचे प्रमाण वाढले असून, वनविभाग मात्र काहीही करत नसल्याचे चित्र आहे.शिवाय या जंगलसंपत्तीत लावले जाणारे वणवेही तितकेच कारणीभुत आहेत. सध्या आंबोली परिसरात या वणव्यांची वाढती संख्या चिंता वाढवणारी ठरत आहे. हे वणवे काही ठिकाणी मुद्दाम लावले जात आहेत तर काही ठिकाणी शिकारीसाठीही लावले जात आहेत. काही वणवे नैसर्गिक रित्या लागले जाऊन वनसंपत्तीची हानी होत आहे. बहुतांशी ठिकाणचे वणवे हे नैसर्गिक नसून लोकांकडून लावले जात असल्याचे निदर्शनास येत आहेत. वारंवार होणारी बेकायदा वृक्षतोड आणि वणवे यामुळे सह्याद्रीच्या पट्ट्यातील जैवविविधतेचा ऱ्हास होण्याचा धोका संभवतो आहे. या वनसंपत्तीचे महत्त्व पाहता हा प्रकार भयंकर व चिंताजनक असतानाही वनविभाग मात्र अजूनही तितकासा गंभीर दिसत नाही. परिणामी वन्य संपत्तीच्या रक्षणाचे वाली कोण, असा सवाल निसर्ग प्रेमींतून व्यक्त होत आहे. हा प्रकार असाच सुरू राहिल्यास निसर्गप्रेमींना न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा इशारा दिला आहे. (वार्ताहर)वनमंत्री, वनसंरक्षक उपवनसंरक्षकांना निवेदनदिवसेंदिवस होत असलेली बेकायदा वृक्षतोड व वणव्यांनी होत असलेल्या वनसंपत्तीचा ऱ्हास याची माहिती असूनही याविरोधात काहीच कारवाई होत नसल्याने निसर्गप्रेमी व वन्यजीव अभ्यासकांनी वनमंत्री, मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर, उपवनसरंक्षक यांना चौकशी व कारवाईचे निवेदन दिले आहे. दिवसेंदिवस होत असलेला वन्यसंपत्तीचा ऱ्हास भविष्यातील मानवी आरोग्याला धोका असून याची कोणीही दखल घेत नाही. त्यामुळे सर्व निसर्गप्रेमी न्यायालयाचे दरवाजे ठोठावतील, असा इशारा दिला आहे. निवेदनाची प्रत वनमंत्री व मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर यांना दिली आहे. याप्रकरणी संबंधित कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.