शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

ओसरगाव येथील टोलनाका सुरू करण्यामागे मोठे आर्थिक गणित, संदेश पारकरांचा गंभीर आरोप

By सुधीर राणे | Updated: June 1, 2023 11:57 IST

सिंधुदुर्गवासीयांना टोलमाफी मिळावी यासाठी तीव्र संघर्ष करणार

कणकवली: मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगाव येथील टोल नाका लवकरच सुरू होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, सिंधुदुर्गवासीयांना टोलमाफी मिळाली पाहिजे ही शिवसेनेची भूमिका आहे. एम.एच.०७ च्या गाड्यांना टोलमाफी द्या किंवा ओसरगाव येथील टोलनाका जिल्ह्याबाहेर हलवा अशी जनतेची मागणी असून त्यासाठी प्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरून संघर्ष करु. असे सांगतानाच  हा  टोल नाका सुरू करण्यामागे मोठे आर्थिक गणित आहे. असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केला आहे.कणकवली येथील विजयभवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पारकर म्हणाले, ओसरगाव येथे १ जूनपासून टोलवसुली सुरू करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. टोल वसुलीचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराने ७ ते ७.५ लाख रुपये सरकारला प्रत्येक दिवशी भरायचे असून दिवसाची वसूली ११ ते ११.५० लाख होणार असल्याचा अंदाज आहे. जे सध्या सत्तेत आहेत, त्यांना दीड लाख द्यायचे व ठेकेदाराला ३ लाख मिळतील असे हे टोल वसुलीमागे आर्थिक गणित आहे.     आतापर्यंत जिल्ह्यातील ८० टक्के काम पूर्ण झालेले आहे. यासाठी जिल्हावासीयांनी सहकार्य केले. पण अनेकांना अजून जमिनीचा व त्यांच्या मालमत्तेचा मोबदला मिळालेला नाही. कणकवलीमध्ये आरओडब्ल्यू लाईन नुसार काम झालेले नाही. ड्रेनेज सिस्टीम अपूर्ण आहे. पुलावरून धबधब्याप्रमाणे पाणी कोसळते, सर्व्हिस रोड अरुंद आहेत. यासमस्यांबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. मात्र, तरीही टोल वसूलीसाठी प्रयत्न केला जात आहे. खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्त्वाखाली आम्ही टोलवसुलीला विरोध करत आहोत. एमएच ०७ च्या गाडयांना माफी मिळायला हवी, ही आमची मागणी आहे.

ओसरगांव टोलमुळे जिल्हयाचे विभाजन होत आहे. न्यायालय, प्रशासकीय कार्यालये,  जिल्हा परिषद, जिल्हा रुग्णालय ,वैद्यकीय महाविद्यालय आदीसाठी चार तालुक्यांतील लोकांना टोलचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.  टोलमुक्त सिंधुदुर्ग समितीच्या माध्यमातूनही जिल्हावासीयांचा यासाठी प्रयत्न सुरू आहे. या लढ्यासाठी जिल्ह्यातील जनतेचेही सहकार्य हवे आहे. जनतेने टोल भरण्यास विरोध केला तरच हे आंदोलन यशस्वी होणार आहे, असेही संदेश पारकर म्हणाले.टोलबाबत सर्वपक्षीयांनी एकत्रित येत जिल्हाधिकारी पातळीवर बैठक होऊन निर्णय घेण्याची गरज होती. मात्र, सर्वजण गप्प आहेत. शिवसेनेच्या माध्यमातून आमचा लढा सुरू असणार आहे. याच प्रश्नांच्या अनुषंगाने आपण बांधकामंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट घेतली व त्यांचे या प्रश्नांकडे लक्षही वेधल्याचे संदेश पारकर यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गtollplazaटोलनाका