शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

विस्तृतीकरणाचे मोठे आव्हान

By admin | Updated: June 14, 2015 01:50 IST

कसई दोडामार्ग : बाजारपेठेत मोक्याच्या ठिकाणी स्वमालकीची जागाच नाही

वैभव साळकर / दोडामार्ग बाजारपेठेतील अरुंद रस्ते, बेशिस्तपणे उभ्या करून ठेवल्या जाणाऱ्या दुचाकी, त्यामुळे वारंवार निर्माण होणारी वाहतूक कोंडी या समस्यांवर मात करण्यासाठी प्रथमत: बाजारपेठेचे विस्तृतीकरण करण्याची गरज आहे. मात्र, मागील काही वर्षात ग्रामपंचायतीचा कारभार हाकणाऱ्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांकडे दूरदृष्टीचा अभाव राहिल्याने शहरातील मोक्याच्या जागा अनेक शासकीय इमारतींसाठी हस्तांतरीत करण्यात आल्या. परिणामत: आजच्या घडीला नगर पंचायतीकडे मोक्याच्या ठिकाणी अशी स्वमालकीची जागाच उपलब्ध नाही. त्यामुळे बाजारपेठेचे विस्तृतीकरण करताना नव्याने निवडून येणाऱ्या नगरसेवकांसमोर अनेक आव्हाने उभी राहणार आहेत. भाजी विक्रे ते, मच्छिमार्केट आदीसाठी स्वतंत्र इमारती बांधण्यासाठी जागा निवडताना पदाधिकाऱ्यांचा कस लागणार आहे. दोडामार्ग शहरातच बाजारपेठ वसली आहे. शहरातील दोडामार्ग, बांदा, आयी, तिलारी या हमरस्त्यांच्या दोन्ही बाजूला दुकाने आहेत. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला बाजारपेठ व्यापली आहे. या दुकानात खरेदीसाठी जाताना वाहनचालक रस्त्याच्या कडेलाच वाहने उभी करतात. शिवाय दुचाकीदेखील बेशिस्तपणे उभ्या केल्या जातात आणि खरेदीसाठी दुकानांमध्ये शिरतात. मात्र, बाजारपेठेतून जाणारे रस्ते हे मुळातच अरुंद असल्याने नेहमीच वाहतूक कोंडी होते. परिणामत: त्याचा त्रास बाजारपेठेतील नागरिक, वाहनचालक आणि व्यापाऱ्यांना सहन करावा लागतो. त्यामुळे एकाच ठिकाणी व्यापाऱ्यांना बसविण्याची गरज आहे. जेणेकरून वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल. मात्र, बाजारपेठ वसवायची कोठे, हा प्रश्न आहे. शिवाय बाजारपेठ विस्तृतीकरणाची समस्यादेखील आहेच. या सर्वांवर मात करायची कशी, असा प्रश्न नव्याने निवडून येणाऱ्या पदाधिकाऱ्यांसमोर उभा आहे. शहरात ग्रामपंचायतीच्या ताब्यात अनेक ठिकाणच्या जमिनी होत्या. मात्र, तत्कालीन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडे दूरदृष्टीचा अभाव असल्याने त्यांनी स्वत:च्या ताब्यातील जमिनी या आयटीआय, पंचायत समिती, तहसीलदार निवासस्थान अशा कार्यालयांसाठी हस्तांतरीत केली. त्यामुळे आजच्या घडीला नगर पंचायतीत रुपांतर होताना ग्रामपंचायतीकडे स्वमालकीची जागा उपलब्ध नाही. परिणामत: भविष्यात दोडामार्ग शहरातील बाजारपेठ एकाच छताखाली आणावयाची झाल्यास तशी जागा नसल्याने बाजारपेठ विस्तृतीकरणाची समस्या निर्माण होणार आहे.