शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

चौपदरीकरणाचे ५ जूनला भूमिपूजन

By admin | Updated: April 15, 2017 00:06 IST

प्रमोद जठार यांची माहिती : अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेस मंजुरी

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अखिल भारतीय आयुर्वेद संस्था स्थापन करण्यास केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी मंजुरी दिली आहे. तर सिंधुदुर्ग विकासात महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन कणकवली येथे ५ जून रोजी होणार आहे. हे भूमिपूजन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष, माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिली.येथील भाजप संपर्क कार्यालयात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्षा राजश्री धुमाळे, प्रज्ञा ढवण, महिला आघाडी तालुकाध्यक्षा गीतांजली कामत उपस्थित होत्या.प्रमोद जठार म्हणाले, मुंबई -गोवा महामार्गावरील सावित्री नदीवरील पुलाचे काम प्रगतीपथावर असून त्याचे उद्घाटन ५ जून रोजी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याच दिवशी महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन कणकवलीत करण्यात येईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या कार्यक्रमाला उपस्थित रहाणार असून त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी निसर्गरम्य अशा सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘अखिल भारतीय आयुर्वेद संस्था’ स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. आयुर्वेद शिक्षणासाठी तसेच अनुसंघनासाठी व जनसामान्यांना दर्जेदार आरोग्य सेवा देता येण्यासाठी ही संस्था स्थापन करण्यात येणार आहे.या आयुर्वेद संस्थेसाठी ५० एकर जागेची गरज आहे. या जागेची निश्चिती करून परिपूर्ण प्रस्ताव पाठविण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले आहे. वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण व आपण याबाबत पाठपुरावा करीत असल्याचे जठार यांनी यावेळी सांगितले. जठार म्हणाले, दोडामार्ग तालुक्यातील आडाळी येथे एमआयडीसीसाठी ७०० एकर जागा घेण्यात आली आहे. त्यापैकी १०० एकर जागा या आयुर्वेद संस्थेसाठी द्यावी अशी मागणी भाजपच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. तसेच दोडामार्ग परिसरात औषधी वनस्पती लागवडीसाठी पूरक वातावरण आहे.मुंबई- गोवा महामार्गही जवळच आहे. त्यामुळे ही जागा सुचविण्यात आली आहे. भाजप पक्षाच्यावतीने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्याकडे आमचे लक्ष आहे. स्वत:ची मालमत्ता वाढविण्यापेक्षा जनतेसाठी सार्वजनिक मालमत्ता तसेच मुलभुत सोयी सुविधा निर्माण करण्याच्यादृष्टीने भाजपचे प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)राणेंची नौका वादळात भरकटलीनारायण राणेंची नौका कधी शिवसेनेच्या किनाऱ्याला तर कधी भाजपच्या किनाऱ्याला लागत असते. ही नौका वादळात भरकटली आहे. नागपूर, दिल्ली असा प्रवास ही नौका करीत आहे. ही नौका आणखीन कुठे वळते ते आता पहायचे आहे. राजकारण हा संयमाचा खेळ आहे. राजकारणात जास्त काळ टिकायचे असेल तर संयम आवश्यक आहे. राणेंचा पक्ष प्रवेशापेक्षा हेतू वेगळा आहे. त्यांचे व्यक्तिमत्व पहाता पक्ष प्रवेशासाठी ते एवढे उतावीळ होतील असे वाटत नाही. भाजप हा पक्ष कुठल्याही न्यायालयीन गोष्टीत हस्तक्षेप करीत नाही. तसेच कुणाचेही अहित चिंतीत नाही. जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणार हे निश्चितच आहे. यामागे राणेंची राजकीय कोंडी करण्याचा उद्देश नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजप पक्ष सक्षम आहे. त्यामुळे पक्षात कोणाला घ्यायचे अथवा नाही हे पक्षश्रेष्ठी ठरवतील. ताकद द्यायचीच असेल तर जिल्हा भाजपल द्या, असे आम्ही पक्ष श्रेष्ठींना सांगितले आहे. असे नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाविषयी प्रमोद जठार म्हणाले.