शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

भुईबावडा, करुळ घाटात बाजूपट्ट्या खचल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 17:31 IST

सह्याद्री पट्ट्यात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे भुईबावडा घाटात तीन तर करुळ घाटात एका ठिकाणी रस्त्याची बाजूपट्टी खचून संरक्षक भिंती ढासळल्या आहेत. त्यामुळे भुईबावडा घाटात सद्या तीन ठिकाणांवरुन एकेरी वाहतूक सुरु ठेवली आहे.

ठळक मुद्देभगदाडं पडून रस्ता खचण्याची शक्यतादोन्ही घाटमार्गांची सुरक्षितता धोक्यातसंरक्षण भिंतीही ढासळू लागल्या करुळ आणि भुईबावडा दोन्ही घाटमार्ग तासभर बंद

वैभववाडी, 2 :सह्याद्री पट्ट्यात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे भुईबावडा घाटात तीन तर करुळ घाटात एका ठिकाणी रस्त्याची बाजूपट्टी खचून संरक्षक भिंती ढासळल्या आहेत. त्यामुळे भुईबावडा घाटात सद्या तीन ठिकाणांवरुन एकेरी वाहतूक सुरु ठेवली आहे.

बाजूपट्ट्या खचलेल्या ठिकाणी भगदाडं पडून अतिवृष्टीत रस्ता खचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे दोन्ही घाटमार्गांची सुरक्षितता धोक्यात आल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

      करुळ आणि भुईबावडा घाटांच्या परिसरात गेला आठवडाभर दररोज दुपारनंतर ढगफूटी सुरु आहे. त्याचा सर्वाधिक फटका दोन्ही घाटमार्गांना बसत आहे. आठवडाभरात दोन्ही घाटात चारवेळा दरडी कोसळून वाहतूक टप्प झाली आहे. रविवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे दरडी कोसळून करुळ आणि भुईबावडा हे दोन्ही घाटमार्ग तासभर बंद होते.

     रविवारच्या अतिवृष्टीमुळे भुईबावडा घाटात तीन ठिकाणी रस्त्याच्या बाजूपट्या खचून संरक्षण भिंतीही खचल्या आहेत. तसेच करुळ घाटाच्या मध्यावरील विश्रांती स्थळानजिक रस्त्याची बाजूपट्टी खचून अगदी रस्त्यालगतच भगदाड पडले आहे. त्यामुळेच रात्रीच्या वेळी हे भगदाड अपघातास कारणीभूत ठरणार आहे. दोन्ही घाटातील गटारे मोकळी नसल्याने पाण्याचा प्रवाह वेगाने रस्त्यावरुन वाहतो. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाच्या तीव्रतेने घाटातील रस्त्याच्या बाजूपट्ट्या खचून संरक्षण भिंतीही ढासळू लागल्या आहेत.

     रविवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसात दोन्ही घाटमार्गांच्या बाजूपट्ट्या खचून रस्त्यालगत भगदाडं पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे घाटमार्गांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. गेला आठवडाभर सह्याद्री पट्ट्यात वाढलेला पावसाचा जोर आणखीन काही दिवस कायम राहिला तर पावसाच्या कालावधीत दोन्ही घाटातून प्रवास करणे जीवघेणे ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.