शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
3
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
4
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
5
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
6
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
7
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
8
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
9
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
10
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
11
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
12
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
13
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
14
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
15
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
16
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
17
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
18
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
19
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
20
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

भेंडाई धनगरवाड्यावर विकासाची पहाट कधी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2015 00:13 IST

मूलभूत सुविधांपासून वंचित : लोकसंख्या २५०; पाण्यासाठी डोंगरात वणवण; एक गाव दोन तालुके, रस्ताच नाही

मच्छिंद्र मगदूम -सांगरूळकोल्हापूरपासून केवळ पन्नास किलोमीटरवर डोंगरात एक वाडा आहे. हा वाडा म्हणजे राजवाडा नव्हे, तर तो भेंडाई धनगरवाडा. तिथे २६ कुटुंबे राहतात. त्यांची लोकसंख्या २५० इतकी आहे. ते आजतागायत कुडाच्या आणि दगडमातीच्या घरातच राहतात. राहणे असो वा उदरनिर्वाह, रस्ता असो वा पाणी, या प्रश्नांना ते कधी भिडलेच नाहीत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही मूलभूत सुविधांपासून हा वाडा वंचितच आहे. यामुळे या धनगरवाड्यावर विकासाची पहाट कधी उगवणार, याची वाट पाहत आहेत.मूलभूत सुविधांच्या समस्यांसह उदरनिर्वाहाच्या गर्तेत तो सापडला आहे, याची जाणीव तेथे पोहोचल्यानंतर होते. या धनगरवाड्यावर विकासाचा प्रकाश कधी पडेल, असा प्रश्न उपस्थित होतो. एकीकडे शहरापाठोपाठ ग्रामीण भागात आता ‘विकास’ या गोंडस संकल्पनेतून रो-बंगलो, अपार्टमेंट संस्कृती जोपासली जात आहे. प्रत्येक कुटुंब आता किमान हक्काचं घर असावं, यासाठी झटत आहे. यामुळे घराची जागा निवडताना किंवा घर बांधताना प्रत्येक कुटुंब घरापर्यंत रस्ता, पाणी, वीज, शाळा, रुग्णालय, दुकाने यांसारख्या अनेक मूलभूत गरजांची पूर्तता होईल, असे ठिकाण आहे काय, याचा विचार करीत आहे.याउलट भेंडाई धनगरवाड्यावरचा नागरिक अनेक समस्यांच्या गर्तेत जीवन जगतो आहे. तरीही त्यांनी कधीच हार मानली नाही. जिथे ते राहतात, तिथे ये-जा करण्यासाठी सरळ रस्ताही नाही. धनगरवाड्यावर एकूण २६ कुटुंबे वास्तव्य करतात. त्यापैकी १६ कुटुंबे पन्हाळा तालुक्यातील वेतवडे ग्रामपंचायतीला जोडली आहेत, तर राहिलेली दहा कुटुंबे करवीर तालुक्यातील उपवडे ग्रामपंचायतीला जोडली आहेत. त्यामुळे हा धनगरवाडा दोन ग्रामपंचायती व दोन तालुक्यांना जोडला आहे. त्यामुळे गावात विकासकामे करायची कुणी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. उदरनिर्वाहासाठी जमीन नाही. घरापर्यंत पिण्याचे पाणी नाही. विजेचा लपंडाव नेहमी सुरू असतो. पुरेसे पाणी नाही. डोंगरात झऱ्यावर विहीर बांधली आहे. मात्र, पाणीपुरवठा करण्यासाठी मोटार किंवा इंजिनची व्यवस्था नाही. आजही विहिरीवर दोराने खेचून पाणी काढावे लागते. पाण्यासाठी डोंगरातून पायपीट करावी लागते. दवाखाना इथपर्यंत पोहोचला नाही, असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर नेहमीच ‘आ’ वासून उभे आहेत.हा धनगरवाडा वसला आहे, तो उंच डोंगरात, जंगलामध्ये. करवंद, जांभूळ, लाकूडमोळ्या, वनऔषधी वनस्पती विकून पैसे मिळविणे हाच त्यांचा उदरनिर्वाहाचा मुख्य मार्ग. याला जोड मिळते ती गाय, म्हैस, शेळ्यांची. इथला पुरुष जगण्यासाठी दिवसभर गावोगावी भटकतो अन् महिलांची दिवसभर भटकंती पाण्यासाठी. एक किलोमीटरची पायपीट केल्यानंतर पाणी मिळते, तेही झऱ्याचे. कडक उन्हाळ्यात त्याचाही तुटवडा जाणवतो. धनगरवाडा डोंगरात, जंगलात वसल्याने येथे गवा, बिबट्या व वन्यप्राण्यांची भीती आहे. मात्र, ते या भीतीला कधीच भीक घालत नाहीत.धनगरवाड्यावर नवीन शाळेची इमारत बांधली आहे. मात्र, दिवसभर पाण्यासाठी भटकणाऱ्या मुलांची शाळेकडे नेहमी पाठ असते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अनेक निवडणुका झाल्या. या काळातील लोकप्रतिनिधी इथपर्यंत कधी स्वत: पोहोचले असतील का? असा प्रश्न इथे आल्यावर पडतो. वेतवडे ग्रामपंचायतीने रस्ता करण्याचा प्रयत्न केला; पण तेही काम अर्धवट थांबले. यामुळे भेंडाई धनगरवाड्यावर विकासाची पहाट उगवणार कधी? असा प्रश्न येथील ग्रामस्थांसमोर उभा ठाकला आहे.भेंडाईचा धनगरवाडा एकत्रित एका ग्रामपंचायतीला जोडून संपूर्ण गाव पासार्डे पैकी पाचाकटेवाडीला जोडण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच रस्ताही पाचाकटेवाडीला जोडण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पाण्याची योजनाही तत्काळ पूर्ण करून पाणी उपलब्ध करण्यासाठी प्रशासनासमोर आपली भूमिका मांडणार असून, भेंडाईच्या धनगरवाड्यावर विकासकामे पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. - राजेंद्र सूर्यवंशी, पंचायत समिती सदस्यधनगरवाड्यावर काय हवेये-जा करण्यासाठी पक्का रस्तारस्ता पाचाकटेवाडीला जोडावाधनगरवाडा पासार्डे पैकी पाचाकटेवाडी ग्रामपंचायतीशी जोडावा व करवीर तालुक्यात समावेश व्हावापिण्याच्या पाण्याची सोय व्हावीउदरनिर्वाहासाठी शेतजमीन मिळावी