शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
5
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
6
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
7
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
8
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
9
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
10
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
11
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
12
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
13
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
14
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
15
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
16
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
17
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
18
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
19
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
20
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य

स्वयंरोजगारासाठी उत्तम पर्याय

By admin | Updated: July 25, 2014 22:54 IST

पोल्ट्री व्यावसायिकांसाठी अनुदान : पशुसंवर्धन खात्याचा विशेष कार्यक्रम

रहिम दलाल- रत्नागिरीजिल्ह्यात पोल्ट्री व्यवसायाला चालना मिळून स्वयंरोजगार निर्माण व्हावा, यासाठी परिसरातील कुक्कुटपालन व्यवसायाला चालना देणे, या योजनेअंतर्गत जिल्ह्यात ९०० लोकांना पक्षी वाटप करण्यात येणार असून, खुराड्यांसाठीही साडेतेरा लाख रुपये देण्यात येणार आहेत. त्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून पाठविण्यात आला आहे.जिल्ह्यात शेळी पालनासह कुक्कुट पालनातूनही मोठ्या प्रमाणात स्वयंरोजगार निर्मिती करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने पावले उचलली आहेत. त्यासाठी राज्य शासनाने सुरु केलेल्या परसातील कुक्कुटपालन चालना देणे या योजनेचा आधार घेण्यात आला आहे.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मांसाहार करण्यात येत असल्याने शेळ्या, कोंबड्यांचा मोठा व्यवसाय सुरु आहे. त्यासाठी हे व्यावसायिक परजिल्ह्यावरच अवलंबून अजूनपर्यंत अवलंबून आहेत. मात्र, गेल्यावर्षी शेळीपालन या व्यवसायाला चालना देण्यासाठी १५० लाभार्थींना शेळीवाटप करण्यात आले होते. पशुसंवर्धन विभागाने राबविलेल्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेकजण पुढे येत आहेत. ग्रामीण भागातील अनेकजण आजही मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये रोजगारासाठी जात असताना त्यांच्यासाठी गावातच स्वयंरोजगार निर्माण झाल्यास शेतीला हा जोडधंदा पुढे येईल. त्यासाठी शेळीपालनासह आता कुक्कुट पालनाही चालना देण्यात येत आहे. परसातील कुक्कुटपालन चालना देणे या योजनेअंतर्गत पशुसंवर्धन विभागाने जिल्हाभरातून प्रस्ताव मागविले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून ९०० लोकांचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. या प्रत्येक लाभार्थीला ४५ पक्षी देण्यात येणार आहेत. तसेच कोंबड्यांना खुराड्याची सोय व्हावी, यासाठी प्रत्येक लाभार्थीला १५०० रुपये असे एकूण साडेतेरा लाख रुपये या लाभार्थींच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ९०० लोक स्वत:च्या पायावर उभे राहण्यास यामुळे मदत होणार आहे.जिल्ह्यात दुग्ध व्यवसायासह शेळीपालन, कुक्कुटपालन या व्यवसायाला मोठी संधी आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाच्या योजना ग्रामीण भागातील अगदी खेड्यापाड्यात राबवून स्वयंरोजगार निर्मितीवर भर देण्यासाठी ही धडपड सुरु आहे. आज जिल्ह्यात ३००० लीटर्सपर्यंत प्रतिदिन दुधाचे उत्पादन सुरु झाले आहे. त्यातच कुक्कुट पालनातून वर्षभरातच पोल्ट्री व्यवसातून स्वयंरोजगार निर्मिती होणार आहे. त्यातून अनेक कुटुंब स्वत:च्या पायावर उभी राहणार आहेत. - डॉ. एस. सी. म्हस्के, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद