शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

बीच शॅकमुळे रोजगाराचे नवे दालन खुले होणार : हरी खोबरेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 12:45 IST

कोकण किनारपट्टीवर गोव्याच्या धर्तीवर बीच शॅक धोरणास मंजुरी देताना ८ ठिकाणी पायलट प्रकल्प साकारले जाणार आहेत. त्यात मालवण किनारपट्टीवरील तारकर्लीचा समावेश आहे.

ठळक मुद्देहरी खोबरेकर यांनी व्यक्त केला विश्वास कोकणच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांचे नेहमीच झुकते माप

मालवण : सागरी पर्यटनाचे प्रमुख केंद्र म्हणून वेगाने विकसित होत असलेल्या तारकर्लीसह कोकण किनारपट्टीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह राज्य शासनाने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.

कोकण किनारपट्टीवर गोव्याच्या धर्तीवर बीच शॅक धोरणास मंजुरी देताना ८ ठिकाणी पायलट प्रकल्प साकारले जाणार आहेत. त्यात मालवण किनारपट्टीवरील तारकर्लीचा समावेश आहे. ही बाब आमच्यासाठी आनंदाची व अभिमानाची असून पर्यटन वाढीबरोबर रोजगाराचे नवे दालन खुली करणारी आहे, असा विश्वास शिवसेना तालुकाप्रमुख तथा तारकर्ली जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांनी व्यक्त केला आहे.स्थानिक लोकप्रतिनिधी या नात्याने येथील पर्यटन विकासासाठी ज्या मागण्या आम्ही आमदार वैभव नाईक, पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे पोहोचविल्या त्यात बीच शॅक ही मागणीही प्रामुख्याने होती. या मागणीला पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने मान्यता दिली. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व मंत्रिमंडळाचे आभार व्यक्त करीत असल्याचे खोबरेकर यांनी स्पष्ट केले.कोकणच्या विकासासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे झुकते माप नेहमीच राहिले आहे. कोकणवर असलेले विशेष प्रेम पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेही आपल्या कामातून दाखवून देत आहेत. मच्छिमारांसह शेतकरीवर्गाला फायदेशीर ठरणारी चांदा ते बांदा योजना माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून यापूर्वी राबविण्यात आली. यापुढे नव्या योजनेतून शेतकरी, मच्छिमार यांच्यासह पर्यटन व्यावसायिक व अन्य छोट्या मोठ्या व्यावसायिकांना महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी आपले प्रयत्न असतील, असेही खोबरेकर म्हणाले.स्थानिकांना रोजगाराचे नवे दालनबीचवर शॅक धोरणास मंजुरी मिळावी यासाठी स्थानिकांच्या मागणीनुसार आपण पर्यटन मंत्र्यांकडे पाठपुरावा केला असल्याचे खोबरेकर यांनी स्पष्ट केले. बीच शॅक धोरणास मान्यता मिळाल्यामुळे भविष्यात देशी-विदेशी पर्यटकांना समुद्रकिनारी एक मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.कोकणच्या विकासाला चालना देणाऱ्या बीच शॅक धोरणास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या धोरणांतर्गत राज्यातील ८ समुद्र किनाऱ्यांना इको फ्रेंडली बीच शॅकसाठी मंजुरी देण्यात आली आहे. पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी सागरी किनाऱ्यांवर बीच शॅक्स उभारण्यात येणार आहेत.

टॅग्स :tourismपर्यटनsindhudurgसिंधुदुर्गgoaगोवा