शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

दाट धुक्यापासून सावधानता बाळगा!

By admin | Updated: November 6, 2014 21:59 IST

हीच धुक्याची लाट महामार्गावर अपघाताला कारणीभूत ठरते. या दाट धुक्यामुळे अस्पष्ट दिसत असल्याने अपघात होतात.

देवरुख : हिवाळा म्हटला की, कुडकुडायला लावणारी गुलाबी थंडी पडते. या गुलाबी थंडीच्या जोडीला दाट धुक्याची झालर दऱ्याखोऱ्यात दूरपर्यंत पसरलेली दिसते. मात्र, हीच धुक्याची लाट महामार्गावर अपघाताला कारणीभूत ठरते. या दाट धुक्यामुळे अस्पष्ट दिसत असल्याने अपघात होतात. त्यामुळे वाहनचालकांनो दाट धुक्यापासून सावधानता बाळगा, असा इशारा देण्याची वेळ आली आहे.खरेतर थंडीच्या दिवसांमधून नदीकाठच्या गावांमध्ये गडद धुक्याची छाया पसरलेली दिसते. हे धुके सायंकाळी उशिरा आणि पहाटे अधिक प्रमाणात पाहायला मिळते. कोल्हापूर मार्गावर आंबा घाटामध्ये, साखरपा मुर्शी, तसेच संगमेश्वर-देवरुख मार्गावर करंबेळे घाटीमध्ये, लोवले-बुरंबी तसेच देवरुख-रत्नागिरी मार्गावर तुळसणी, पांगरी याबरोबरच मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर तालुक्याचा विचार करता बावनदी, वांद्री, आंबेड, मानसकोंड, कुरधुंडा, गोळवली, तुरळ, आरवली या परिसरात धुक्याची मोठी लाट पसरलेली दिसते आणि हे धुके पहाटेच्या वेळी अधिक गडद होताना दिसते. सकाळी नऊ वाजेपर्यंत दाट धुके असते.गडद झालेल्या धुक्यातून मार्ग शोधणे कठीण होऊन बसते. त्यातच महामार्गावर अतिवेगाचा वापर केल्यास समोर अचानक आलेले वाहन न दिल्यास अपघात होतो. काही अंशी पहाटेच्या वेळी गाड्या मार्ग सोडून दरीत कोसळण्याचे अथवा झाडावर आदळण्याचे प्रसंग घडल्याचे दिसून येत आहेत.या साऱ्याचा विचार करुन वाहनचालकांनी आपल्या वेगावर नियंत्रण ठेवत दाट धुक्यामध्ये सावधानता बाळगून काळजी घेणे प्रवाशांच्या हिताचे आहे. धुक्यामुळे अपघात घडतात, अशा चर्चा अपघातस्थळी अथवा अपघातानंतर होताना ऐकायला मिळते. बुधवारी सकाळी ६.३०च्या दरम्यान स्वीफ्ट डिझायर आणि खासगी मिनी बस यांच्यात झालेला अपघातदेखील धुक्यामुळेच झाला असल्याच्या प्रतिक्रिया पुढे येत आहेत. या अपघातात दोघांना प्राण गमवावे लागले. सध्या होणाऱ्या अपघातामध्ये पहाटे चार ते सहा या काळात होणाऱ्या अपघाताचे प्रमाण अधिक आहे. याचाच अर्थ हे अपघात धुक्यात काळजी न घेतल्यामुळे चालकांच्या चुकीमुळे घडतात. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी चालकांनी सतर्कता बाळगावी व वेगावर नियंत्रण राखणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)दाट धुके ठरतेय अपघाताला कारणीभूत.दाट धुक्यामध्ये हवेय वेगावर नियंत्रण.अपघाताला कारण ठरणाऱ्या धुक्यातून वाहन नियंत्रित वेगाने हाकणे गरजेचे.चालकांनी सावधानता बाळगल्यास अपघात टळतील. सतर्कता बाळगल्यास मनुष्यहानी टळेल.सुरक्षितता बाळगा.