शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

दाट धुक्यापासून सावधानता बाळगा!

By admin | Updated: November 6, 2014 21:59 IST

हीच धुक्याची लाट महामार्गावर अपघाताला कारणीभूत ठरते. या दाट धुक्यामुळे अस्पष्ट दिसत असल्याने अपघात होतात.

देवरुख : हिवाळा म्हटला की, कुडकुडायला लावणारी गुलाबी थंडी पडते. या गुलाबी थंडीच्या जोडीला दाट धुक्याची झालर दऱ्याखोऱ्यात दूरपर्यंत पसरलेली दिसते. मात्र, हीच धुक्याची लाट महामार्गावर अपघाताला कारणीभूत ठरते. या दाट धुक्यामुळे अस्पष्ट दिसत असल्याने अपघात होतात. त्यामुळे वाहनचालकांनो दाट धुक्यापासून सावधानता बाळगा, असा इशारा देण्याची वेळ आली आहे.खरेतर थंडीच्या दिवसांमधून नदीकाठच्या गावांमध्ये गडद धुक्याची छाया पसरलेली दिसते. हे धुके सायंकाळी उशिरा आणि पहाटे अधिक प्रमाणात पाहायला मिळते. कोल्हापूर मार्गावर आंबा घाटामध्ये, साखरपा मुर्शी, तसेच संगमेश्वर-देवरुख मार्गावर करंबेळे घाटीमध्ये, लोवले-बुरंबी तसेच देवरुख-रत्नागिरी मार्गावर तुळसणी, पांगरी याबरोबरच मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर तालुक्याचा विचार करता बावनदी, वांद्री, आंबेड, मानसकोंड, कुरधुंडा, गोळवली, तुरळ, आरवली या परिसरात धुक्याची मोठी लाट पसरलेली दिसते आणि हे धुके पहाटेच्या वेळी अधिक गडद होताना दिसते. सकाळी नऊ वाजेपर्यंत दाट धुके असते.गडद झालेल्या धुक्यातून मार्ग शोधणे कठीण होऊन बसते. त्यातच महामार्गावर अतिवेगाचा वापर केल्यास समोर अचानक आलेले वाहन न दिल्यास अपघात होतो. काही अंशी पहाटेच्या वेळी गाड्या मार्ग सोडून दरीत कोसळण्याचे अथवा झाडावर आदळण्याचे प्रसंग घडल्याचे दिसून येत आहेत.या साऱ्याचा विचार करुन वाहनचालकांनी आपल्या वेगावर नियंत्रण ठेवत दाट धुक्यामध्ये सावधानता बाळगून काळजी घेणे प्रवाशांच्या हिताचे आहे. धुक्यामुळे अपघात घडतात, अशा चर्चा अपघातस्थळी अथवा अपघातानंतर होताना ऐकायला मिळते. बुधवारी सकाळी ६.३०च्या दरम्यान स्वीफ्ट डिझायर आणि खासगी मिनी बस यांच्यात झालेला अपघातदेखील धुक्यामुळेच झाला असल्याच्या प्रतिक्रिया पुढे येत आहेत. या अपघातात दोघांना प्राण गमवावे लागले. सध्या होणाऱ्या अपघातामध्ये पहाटे चार ते सहा या काळात होणाऱ्या अपघाताचे प्रमाण अधिक आहे. याचाच अर्थ हे अपघात धुक्यात काळजी न घेतल्यामुळे चालकांच्या चुकीमुळे घडतात. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी चालकांनी सतर्कता बाळगावी व वेगावर नियंत्रण राखणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)दाट धुके ठरतेय अपघाताला कारणीभूत.दाट धुक्यामध्ये हवेय वेगावर नियंत्रण.अपघाताला कारण ठरणाऱ्या धुक्यातून वाहन नियंत्रित वेगाने हाकणे गरजेचे.चालकांनी सावधानता बाळगल्यास अपघात टळतील. सतर्कता बाळगल्यास मनुष्यहानी टळेल.सुरक्षितता बाळगा.