शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
3
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
4
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
5
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
6
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
7
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
8
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
9
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
10
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
11
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
12
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
14
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
15
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
16
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
17
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
18
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
19
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
20
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

दाट धुक्यापासून सावधानता बाळगा!

By admin | Updated: November 6, 2014 21:59 IST

हीच धुक्याची लाट महामार्गावर अपघाताला कारणीभूत ठरते. या दाट धुक्यामुळे अस्पष्ट दिसत असल्याने अपघात होतात.

देवरुख : हिवाळा म्हटला की, कुडकुडायला लावणारी गुलाबी थंडी पडते. या गुलाबी थंडीच्या जोडीला दाट धुक्याची झालर दऱ्याखोऱ्यात दूरपर्यंत पसरलेली दिसते. मात्र, हीच धुक्याची लाट महामार्गावर अपघाताला कारणीभूत ठरते. या दाट धुक्यामुळे अस्पष्ट दिसत असल्याने अपघात होतात. त्यामुळे वाहनचालकांनो दाट धुक्यापासून सावधानता बाळगा, असा इशारा देण्याची वेळ आली आहे.खरेतर थंडीच्या दिवसांमधून नदीकाठच्या गावांमध्ये गडद धुक्याची छाया पसरलेली दिसते. हे धुके सायंकाळी उशिरा आणि पहाटे अधिक प्रमाणात पाहायला मिळते. कोल्हापूर मार्गावर आंबा घाटामध्ये, साखरपा मुर्शी, तसेच संगमेश्वर-देवरुख मार्गावर करंबेळे घाटीमध्ये, लोवले-बुरंबी तसेच देवरुख-रत्नागिरी मार्गावर तुळसणी, पांगरी याबरोबरच मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर तालुक्याचा विचार करता बावनदी, वांद्री, आंबेड, मानसकोंड, कुरधुंडा, गोळवली, तुरळ, आरवली या परिसरात धुक्याची मोठी लाट पसरलेली दिसते आणि हे धुके पहाटेच्या वेळी अधिक गडद होताना दिसते. सकाळी नऊ वाजेपर्यंत दाट धुके असते.गडद झालेल्या धुक्यातून मार्ग शोधणे कठीण होऊन बसते. त्यातच महामार्गावर अतिवेगाचा वापर केल्यास समोर अचानक आलेले वाहन न दिल्यास अपघात होतो. काही अंशी पहाटेच्या वेळी गाड्या मार्ग सोडून दरीत कोसळण्याचे अथवा झाडावर आदळण्याचे प्रसंग घडल्याचे दिसून येत आहेत.या साऱ्याचा विचार करुन वाहनचालकांनी आपल्या वेगावर नियंत्रण ठेवत दाट धुक्यामध्ये सावधानता बाळगून काळजी घेणे प्रवाशांच्या हिताचे आहे. धुक्यामुळे अपघात घडतात, अशा चर्चा अपघातस्थळी अथवा अपघातानंतर होताना ऐकायला मिळते. बुधवारी सकाळी ६.३०च्या दरम्यान स्वीफ्ट डिझायर आणि खासगी मिनी बस यांच्यात झालेला अपघातदेखील धुक्यामुळेच झाला असल्याच्या प्रतिक्रिया पुढे येत आहेत. या अपघातात दोघांना प्राण गमवावे लागले. सध्या होणाऱ्या अपघातामध्ये पहाटे चार ते सहा या काळात होणाऱ्या अपघाताचे प्रमाण अधिक आहे. याचाच अर्थ हे अपघात धुक्यात काळजी न घेतल्यामुळे चालकांच्या चुकीमुळे घडतात. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी चालकांनी सतर्कता बाळगावी व वेगावर नियंत्रण राखणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)दाट धुके ठरतेय अपघाताला कारणीभूत.दाट धुक्यामध्ये हवेय वेगावर नियंत्रण.अपघाताला कारण ठरणाऱ्या धुक्यातून वाहन नियंत्रित वेगाने हाकणे गरजेचे.चालकांनी सावधानता बाळगल्यास अपघात टळतील. सतर्कता बाळगल्यास मनुष्यहानी टळेल.सुरक्षितता बाळगा.