शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

कायदा, सुव्यवस्थेबाबत काळजी घ्या

By admin | Updated: September 2, 2015 23:24 IST

संतोष भिसे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीच्या बैठकीत आवाहन

कणकवली : गणेशोत्सवाच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच कोणती अप्रिय घटना घडू नये यासाठी सर्वांनी सतर्क राहावे. जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या भाविकांची तसेच वाहनचालकांची गैरसोय होऊ नये, यासाठी कणकवली तालुक्यातील प्रत्येक शासकीय विभागाने योग्य पद्धतीने काळजी घ्यावी, असे आवाहन प्रांताधिकारी संतोष भिसे यांनी केले.येथील तहसील कार्यालयात प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी शांतता समितीची आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मजा चव्हाण, नगराध्यक्षा अ‍ॅड. प्रज्ञा खोत, तहसीलदार समीर घारे, गटविकास अधिकारी चंद्रसेन मकेश्वर, नायब तहसीलदार आर. जे. पवार, सहायक पोलीस निरीक्षक गीताराम शेवाळे, उमेश वाळके, तीन आसनी रिक्षा संघटनेचे प्रतिनिधी अण्णा कोदे, सहा आसनी रिक्षाचालकांचे प्रतिनिधी राजू पवार, फोंडाघाट सरपंच आशा परब, वीज वितरणचे अभियंता अनंत जोगदंड, संतोष सावंत, रमेश आमडोसकर, सचिन सरंगले, व्ही. आर. शिंदे, पी. व्ही. कांबळे उपस्थित होते. पोलीस, तीनआसनी रिक्षाचालक यांची याबाबत बैठक घेण्यात येईल, असे पोलीस उपविभागीय अधिकारी पद्मजा चव्हाण यांनी सांगितले. भाडे नाकारणाऱ्या चालकांवर कारवाई करावी अशी मागणी केली. तालुक्यात तीन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून त्यांनी ध्वनिप्रदूषणाचे नियम पाळावेत अशी सूचना केली. एसटीने सर्व बसस्थानकांवर विशेष व्यवस्था केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. रेल्वे स्थानकात एस.टी.च्या जादा गाड्या उपलब्ध करण्याबाबत कणकवली रेल्वेस्थानकात स्वतंत्र नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार आहे. आरोग्य विभागातर्फे महामार्ग, रेल्वे व एस.टी. बसस्थानकावर विशेष आरोग्य पथके तैनात ठेवण्यात येणार आहेत. शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केल्याची माहिती दिली. वीज वितरणने वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याबरोबर सार्वजनिक ठिकाणी किंवा नागरी वस्तीत असलेल्या पेट्या वा वीजवाहिन्यांचा धोका नागरिकांना होणार नाही याबाबतची सूचना करण्यात आली. (वार्ताहर)परवानगीशिवाय फलक लावू नयेतगणेशोत्सव काळात मुंबई-गोवा महामार्गाच्या दुतर्फा किंवा बाजारपेठेमध्ये वाहनचालकांना त्रास होऊ नये, अशा ठिकाणी डिजिटल फलक उभारण्यात येऊ नयेत. फलक लावण्यासाठी परवानगी घेतली नसल्यास तो तत्काळ काढण्यात यावा. तशी सूचना तालुक्यातील ग्रामपंचायतींबरोबर नगरपंचायतीलाही करण्यात आली आहे. फोंडाघाट तसेच करुळ घाटातील खड्डे भरण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण करावेत, अशी सूचना करण्यात आली. रेल्वेस्थानकांवर वाहनांची व्यवस्था करण्यात यावी.