शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

कायदा, सुव्यवस्थेबाबत काळजी घ्या

By admin | Updated: September 2, 2015 23:24 IST

संतोष भिसे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीच्या बैठकीत आवाहन

कणकवली : गणेशोत्सवाच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच कोणती अप्रिय घटना घडू नये यासाठी सर्वांनी सतर्क राहावे. जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या भाविकांची तसेच वाहनचालकांची गैरसोय होऊ नये, यासाठी कणकवली तालुक्यातील प्रत्येक शासकीय विभागाने योग्य पद्धतीने काळजी घ्यावी, असे आवाहन प्रांताधिकारी संतोष भिसे यांनी केले.येथील तहसील कार्यालयात प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी शांतता समितीची आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मजा चव्हाण, नगराध्यक्षा अ‍ॅड. प्रज्ञा खोत, तहसीलदार समीर घारे, गटविकास अधिकारी चंद्रसेन मकेश्वर, नायब तहसीलदार आर. जे. पवार, सहायक पोलीस निरीक्षक गीताराम शेवाळे, उमेश वाळके, तीन आसनी रिक्षा संघटनेचे प्रतिनिधी अण्णा कोदे, सहा आसनी रिक्षाचालकांचे प्रतिनिधी राजू पवार, फोंडाघाट सरपंच आशा परब, वीज वितरणचे अभियंता अनंत जोगदंड, संतोष सावंत, रमेश आमडोसकर, सचिन सरंगले, व्ही. आर. शिंदे, पी. व्ही. कांबळे उपस्थित होते. पोलीस, तीनआसनी रिक्षाचालक यांची याबाबत बैठक घेण्यात येईल, असे पोलीस उपविभागीय अधिकारी पद्मजा चव्हाण यांनी सांगितले. भाडे नाकारणाऱ्या चालकांवर कारवाई करावी अशी मागणी केली. तालुक्यात तीन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून त्यांनी ध्वनिप्रदूषणाचे नियम पाळावेत अशी सूचना केली. एसटीने सर्व बसस्थानकांवर विशेष व्यवस्था केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. रेल्वे स्थानकात एस.टी.च्या जादा गाड्या उपलब्ध करण्याबाबत कणकवली रेल्वेस्थानकात स्वतंत्र नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार आहे. आरोग्य विभागातर्फे महामार्ग, रेल्वे व एस.टी. बसस्थानकावर विशेष आरोग्य पथके तैनात ठेवण्यात येणार आहेत. शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केल्याची माहिती दिली. वीज वितरणने वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याबरोबर सार्वजनिक ठिकाणी किंवा नागरी वस्तीत असलेल्या पेट्या वा वीजवाहिन्यांचा धोका नागरिकांना होणार नाही याबाबतची सूचना करण्यात आली. (वार्ताहर)परवानगीशिवाय फलक लावू नयेतगणेशोत्सव काळात मुंबई-गोवा महामार्गाच्या दुतर्फा किंवा बाजारपेठेमध्ये वाहनचालकांना त्रास होऊ नये, अशा ठिकाणी डिजिटल फलक उभारण्यात येऊ नयेत. फलक लावण्यासाठी परवानगी घेतली नसल्यास तो तत्काळ काढण्यात यावा. तशी सूचना तालुक्यातील ग्रामपंचायतींबरोबर नगरपंचायतीलाही करण्यात आली आहे. फोंडाघाट तसेच करुळ घाटातील खड्डे भरण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण करावेत, अशी सूचना करण्यात आली. रेल्वेस्थानकांवर वाहनांची व्यवस्था करण्यात यावी.