शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

मुलभूत सुविधा, विकासामध्ये कुडाळ शहर पिछाडीवर

By admin | Updated: March 28, 2016 00:07 IST

सध्याची स्थिती : जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण ; ७४ वर्षांची ग्रामपंचायत; अनेक पदे भोगूनही विकासाकडे दुर्लक्ष

रजनीकांत कदम -- कुडाळ  --जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या व एकेकाळी जिल्हा केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुडाळ शहराचा राज्यभरात नावलौकीक आहे. मात्र, त्यामानाने आजपर्यंतच्या राजकीय, सामाजिक व औद्योगिक वाटचालीत कुडाळ शहराचा हवा तसा विकास झालेला नाही. वास्तविक पाहता ७४ वर्षाच्या ग्रामपंचायतीच्या इतिहासात सध्या निवडणूक रिंगणात असलेल्या सर्वच राजकीय पक्षांनी पदे उपभोगली आहेत. मात्र, विकासाबाबत कुणीच पुढाकार घेतलेला दिसत नाही. त्यामुळे नगरपंचायत निवडणुकीत राजकीय पक्षांची आश्वासने मतदारांना कितपत वळवणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. जिल्हा निर्मितीपासून जिल्ह्यासह राज्यात चर्चेत असलेल्या कुडाळ शहराला राज्याच्या राजकीय पटलावर विशेष महत्त्व आहे. त्यामुळे कोकणात येणाऱ्या प्रत्येक घटकाचा कुडाळ शहराला टचअप करावाच लागतो. जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथे राज्यातील अनेक नामवंत मंत्री, अनेक वरिष्ठ अधिकारी यांचा कायमच संपर्क येत असतो. त्यामुळे या शहराचा नावलौकीक राज्यात सर्वदूर पोहचला आहे. पण इथल्या मुलभूत सोयी सुविधा ग्रामपंचायतीच्या ७४ वर्षाच्या इतिहासात अजूनही अपूर्णावस्थेतच दिसत आहेत. त्यामुळे याचा फटका स्थानिकांसह, व्यापारीवर्ग, पर्यटक यांना मोठ्या प्रमाणात बसत आहेत. जिल्ह्याची बाजारपेठ म्हणूनही कुडाळची ओळख आहे. पण याचे गांभिर्य इथल्या प्रशासनाने तर घेतले नाहीच पण लोकप्रतिनिधींनीही घेतले नाही. याशिवाय गंभीर बाब म्हणजे ग्रामपंचायतीच्या इतिहासात पदे भोगलेल्या कार्यकर्त्यांचा सध्याच्या नगरपंचायतीतही सहभाग आहे. त्यामुळे कुणाचेच कौतुक करणे वा कुणाला नावे ठेवणे योग्य ठरणार नाही. सर्वांनीच पदे भोगली पण विकासाला बगल दिल्याचेच चित्र शहराच्या सध्याच्या स्थितीवरुन दिसत असल्याचे नागरिकांचे मत आहे. मच्छीमार्केट, बसस्थानक यांच्या इमारती नादुरुस्त झाल्या आहेत. भाजी मार्केटमध्ये कोणीही बसत नाही, शहरात कशाही पद्धतीने वाढत असलेली मोठमोठी बांधकामे मात्र कोणत्या सुविधा कशा ठेवल्या पाहिजेत याचे योग्य नियोजन नाही, त्यामुळे भविष्यात शहरासमोर भेडसावणारे अनेक प्रश्न यांच्यावर योग्य ती उपाययोजना करणारी यंत्रणा असणे गरजेचे आहे. त्यामुळे सजग कार्यकर्ता आणि जागृत नेते यांनाच या निवडणुकीत संधी मिळण्याची शक्यता नागरिकांतून वर्तविण्यात येत आहे. सांडपाणी, कचरा, उद्यानाचा अभाव मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असलेल्या कुडाळ शहरात लहान मुले यांना खेळण्यासाठी एकही प्रशस्त उद्यान नाही. याठिकाणी मोठे उद्यान बांधण्यात येणार आहे, अशी फक्त सरकार व प्रशासन यांच्याकडून घोषणा केली जाते. तसेच ग्रामपंचायतीने छोट्या पद्धतीत बांधलेल्या उद्यानाचे तीनतेरा वाजले आहेत. शहरातील कचरा टाकायचा कुठे? हा मोठा प्रश्न प्रत्येकवेळी कुडाळ ग्रामपंचायतीसमोर उभा राहत आहे. कारण कुडाळ शहरात नियोजित असे डंपिंग ग्राऊंड नाही. सध्या भंगसाळ नदी किनाऱ्यालगतच्या एका जमिनीत कचरा टाकला जातो. मात्र, या कचऱ्यामुळे नदी प्रदूषित होऊन आजूबाजूच्या रहिवाशांनाही त्रास होतो. त्यामुळे तेथील डंपिंग ग्राऊंडला ग्रामस्थांनी विरोध केला आहे. कुडाळ शहराला पाणी पुरवठा करणारी नळपाणी योजना ही जुनी झाली असून तेथील पाणी साठवणुकीच्या विहिरी टाक्या याही जीर्ण होत चालल्या आहेत. तसेच एप्रिल, मे च्या उत्तरार्धात शहरातील काही भागात पाणी टंचाईचे प्रमाण हल्ली वाढत आहे. शहरातील बऱ्याचशा विहिरी दुरूस्तीच्या प्रतीक्षेत आहेत.कुडाळ शहरात मुलांना खेळण्यासाठी एकही प्रशस्त उद्यान नाही. या ठिकाणी मोठे उद्यान बांधण्यात येणार आहे, अशी फक्त सरकार व प्रशासन यांच्याकडून घोषणा केली जाते. तसेच ग्रामपंचायतीने छोट्या पद्धतीत बांधलेल्या उद्यानाचे तीनतेरा वाजले आहेत.अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणशहरातील वाढत्या लोकसंख्येबरोबर या ठिकाणी अतिक्रमणे व अनाधिकृत बांधकामांचेही प्रमाण वाढत असून ही समस्याही भविष्यात कुडाळ शहरासमोर वाढत आहे. आवश्यक त्या ठिकाणी फुटपाथ नाही. सर्वांनीच पदे भोगली पण आश्वासित विकासाला बगल दिल्याचेच चित्र शहराच्या सध्याच्या स्थितीकडे पाहून नागरिकांतून व्यक्त होत आहे.