शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

बांदा दशक्रोशीला वादळाचा तडाखा

By admin | Updated: May 7, 2017 23:48 IST

बांदा दशक्रोशीला वादळाचा तडाखा

लोकमत न्यूज नेटवर्कबांदा : बांदा शहर व दशक्रोशीतील गावांना शनिवारी रात्री चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला. सुमारे २० मिनिटांच्या वादळाने होत्याचे नव्हते झाले. या वादळी पावसात शेकडो घरांवर झाडे उन्मळून पडल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ठिकठिकाणी झाडे उन्मळून वीज वाहिन्यांवर पडल्याने वीजवाहिन्या जमिनीवर तुटून पडल्या होत्या. त्यामुळे दशक्रोशीतील वीज रात्रीपासूनच गायब झाली आहे. केळी बागायतींसह माड, पोफळी, काजू, आंबा बागायतींची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. प्रशासकीय यंत्रणेने रविवार हा सुटीचा दिवस असल्याने नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम हाती घेतल्याचे दिसत नव्हते. क्षणार्धात होत्याचे नव्हते झाल्याने स्थानिकांमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण होते. बांद्यासह डेगवे व डिंगणे-धनगरवाडी परिसराला या वादळी पावसाचा सर्वाधिक फटका बसला. वीज खांब उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. एसटीच्या असनिये, घारपी, दाभिल, कोनशी या गावांमध्ये वस्तीसाठी गेलेल्या बसेस मार्गावर झाडे पडल्याने अर्ध्यावरच अडकून पडल्या आहेत.बांदा शहरासह दशक्रोशीला शनिवारी रात्री साडेआठ वाजता चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला. बांदा शहर, शेर्ला, डेगवे, तांबोळी, डिंगणे, गाळेल, डोंगरपाल, नेतर्डे, इन्सुली, वाफोली, विलवडे, सरमळे आदी गावांत चक्रीवादळाचा प्रभाव अधिकच जाणवला. ठिकठिकाणी झाडे उन्मळून घरांवर पडल्याने घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ठिकठिकाणी घरे व दुकाने यांची छपरे वादळी पावसाने उडून गेल्याच्या घटनादेखील घडल्या आहेत. केळी बागायतींसह माड, पोफळी, काजू बागायतींचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वीज वाहिन्यांवर झाडे मोडून पडल्याने वीज खांबांसह वाहिन्या तुटून रस्त्यावर पडल्या होत्या. दशक्रोशीत रात्रीपासूनच वीज गायब झाली असून बांदा शहरात वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले होते. अन्यत्र ग्रामीण भागात मात्र वीजवाहिन्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याचे दिसत नव्हते. सुमारे ७० टक्क्यांहून अधिक भागात वीजवाहिन्या तुटल्याने पुढील चार दिवस हा भाग अंधारात राहणार आहे.डेगवे, फणसवाडी येथील लक्ष्मी गोविंद डेगवेकर यांच्या नवीनच बांधलेल्या घरावर झाड मोडून पडल्याने छपराचे पूर्णपणे नुकसान झाले. तसेच अर्जुन कृष्णा वारंग, प्रसाद नकुल देसाई, बळिराम तुकाराम देसाई, साबाजी राघोबा देसाई, सुनीता नकुल देसाई, सुवर्णलता सहदेव देसाई, रावजी राजाराम देसाई यांच्या घरांवर झाडे उन्मळून पडल्याने छपरांचे नुकसान झाले. तसेच जांभळवाडीतील लक्ष्मी नवसो देसाई, वरची फणसवाडी येथील शिवराम विठ्ठल देसाई, भागिरथी कृष्णा देसाई यांच्या घरांवर झाडे पडल्याने नुकसान झाले. डेगवे उपसरपंच मधुकर देसाई यांच्या काजू बागेतील मांगराचे पत्रे उडून सुमारे १०० मीटर लांब पडले. यावरूनच वादळाची प्रचिती येते. बागेतील बहुतांशी काजू कलमेही उन्मळून पडली. डेगवे सोसायटीचे चेअरमन प्रवीण देसाई यांच्या काजू बागेतील झाडेही मोडून पडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. मोयझरवाडीतील बाबा देसाई यांच्या बागेचीही मोठ्या प्रमाणात पडझड झाली. रविवार सुटीचा वार असतानाही डेगवे तलाठी किरण गजीनकर यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम हाती घेतले. इन्सुलीतील गीतांजली अंकुश माधव, दिनेश दत्ताराम गावडे, आत्माराम कोठावळे, प्रदीप सावंत, हेमंत राणे यांच्या घरांवर झाडे पडल्याने छपरांचे नुकसान झाले.बांदा शहरातही चक्रीवादळाचा फटका बसला. आळवाडा परिसरात वीजवाहिन्या मुख्य रस्त्यावरच तुटून पडल्या होत्या. बांद्यात श्यामसुंदर शंकर गवस, प्रतिभा प्रभाकर म्हावळणकर, कृष्णा विष्णू मांजरेकर, राजेंद्र हरिश्चंद्र पडते, शोभा संभाजी कदम, आनंदी अनंत भाईप, विलास हरी बांदेकर, देवयानी दिनानाथ शिंदे, वीरेंद्र हरी बांदेकर, यशवंत रमेश आळवे, विजया विजयानंद तर्पे, हनुमंत मुरारी सावंत, रूपेश आनंद पाटकर, तातोबा सखाराम वराडकर, सरिता गणपत बहिरे, संजय सीताराम धुरी आदींचे नुकसान झाले. अण्णा आळवे यांच्या गाडीच्या शेडवर आंब्याचे झाड पडून कारच्या बोनेटचे नुकसान झाले. शेर्ला बाजारवाडी येथील दाजी पेडणेकर व उत्तम पेडणेकर यांच्या घरांवर आंब्याचे झाड पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बांदा आळवाडी येथील महेश तळवणेकर यांच्या दुकानावर झाड पडून नुकसान झाले. देऊळवाडी येथील तुकाराम मोरजकर यांच्या घरावरील पत्रे वादळात उडाल्याने नुकसान झाले. तसेच एकनाथ परब यांच्या घरावर फणस पडून छपरासह टीव्हीचेही नुकसान झाले. बांदा शहराला वीजपुरवठा करणाऱ्या ११ केव्ही लाईनवर चार ठिकाणी झाडे पडल्याने शहराचा वीजपुरवठा खंडित झाला. मुसळधार पावसासह वाऱ्याचा वेग अधिक असल्याने परिसरातील विजेचे खांब अक्षरक्ष: उन्मळून पडले. त्यामुळे बांदा दशक्रोशीतील गावांमधील वीजपुरवठा खंडित झाला. बांदा शहराला जोडणाऱ्या विविध ग्रामीण मार्गांवर झाडे उन्मळून पडल्याने बांदा शहराकडे येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. यामध्ये एसटी बसेसही अडकल्याने अनेकांची तारांबळ उडाली.