शहरं
Join us  
Trending Stories
1
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
2
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
3
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
4
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
5
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
6
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
7
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
8
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
9
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
10
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
11
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
12
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
13
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
14
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
15
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
16
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
17
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
18
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
19
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
20
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत

बांदा दशक्रोशीला वादळाचा तडाखा

By admin | Updated: May 7, 2017 23:48 IST

बांदा दशक्रोशीला वादळाचा तडाखा

लोकमत न्यूज नेटवर्कबांदा : बांदा शहर व दशक्रोशीतील गावांना शनिवारी रात्री चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला. सुमारे २० मिनिटांच्या वादळाने होत्याचे नव्हते झाले. या वादळी पावसात शेकडो घरांवर झाडे उन्मळून पडल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ठिकठिकाणी झाडे उन्मळून वीज वाहिन्यांवर पडल्याने वीजवाहिन्या जमिनीवर तुटून पडल्या होत्या. त्यामुळे दशक्रोशीतील वीज रात्रीपासूनच गायब झाली आहे. केळी बागायतींसह माड, पोफळी, काजू, आंबा बागायतींची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. प्रशासकीय यंत्रणेने रविवार हा सुटीचा दिवस असल्याने नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम हाती घेतल्याचे दिसत नव्हते. क्षणार्धात होत्याचे नव्हते झाल्याने स्थानिकांमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण होते. बांद्यासह डेगवे व डिंगणे-धनगरवाडी परिसराला या वादळी पावसाचा सर्वाधिक फटका बसला. वीज खांब उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. एसटीच्या असनिये, घारपी, दाभिल, कोनशी या गावांमध्ये वस्तीसाठी गेलेल्या बसेस मार्गावर झाडे पडल्याने अर्ध्यावरच अडकून पडल्या आहेत.बांदा शहरासह दशक्रोशीला शनिवारी रात्री साडेआठ वाजता चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला. बांदा शहर, शेर्ला, डेगवे, तांबोळी, डिंगणे, गाळेल, डोंगरपाल, नेतर्डे, इन्सुली, वाफोली, विलवडे, सरमळे आदी गावांत चक्रीवादळाचा प्रभाव अधिकच जाणवला. ठिकठिकाणी झाडे उन्मळून घरांवर पडल्याने घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ठिकठिकाणी घरे व दुकाने यांची छपरे वादळी पावसाने उडून गेल्याच्या घटनादेखील घडल्या आहेत. केळी बागायतींसह माड, पोफळी, काजू बागायतींचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वीज वाहिन्यांवर झाडे मोडून पडल्याने वीज खांबांसह वाहिन्या तुटून रस्त्यावर पडल्या होत्या. दशक्रोशीत रात्रीपासूनच वीज गायब झाली असून बांदा शहरात वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले होते. अन्यत्र ग्रामीण भागात मात्र वीजवाहिन्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याचे दिसत नव्हते. सुमारे ७० टक्क्यांहून अधिक भागात वीजवाहिन्या तुटल्याने पुढील चार दिवस हा भाग अंधारात राहणार आहे.डेगवे, फणसवाडी येथील लक्ष्मी गोविंद डेगवेकर यांच्या नवीनच बांधलेल्या घरावर झाड मोडून पडल्याने छपराचे पूर्णपणे नुकसान झाले. तसेच अर्जुन कृष्णा वारंग, प्रसाद नकुल देसाई, बळिराम तुकाराम देसाई, साबाजी राघोबा देसाई, सुनीता नकुल देसाई, सुवर्णलता सहदेव देसाई, रावजी राजाराम देसाई यांच्या घरांवर झाडे उन्मळून पडल्याने छपरांचे नुकसान झाले. तसेच जांभळवाडीतील लक्ष्मी नवसो देसाई, वरची फणसवाडी येथील शिवराम विठ्ठल देसाई, भागिरथी कृष्णा देसाई यांच्या घरांवर झाडे पडल्याने नुकसान झाले. डेगवे उपसरपंच मधुकर देसाई यांच्या काजू बागेतील मांगराचे पत्रे उडून सुमारे १०० मीटर लांब पडले. यावरूनच वादळाची प्रचिती येते. बागेतील बहुतांशी काजू कलमेही उन्मळून पडली. डेगवे सोसायटीचे चेअरमन प्रवीण देसाई यांच्या काजू बागेतील झाडेही मोडून पडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. मोयझरवाडीतील बाबा देसाई यांच्या बागेचीही मोठ्या प्रमाणात पडझड झाली. रविवार सुटीचा वार असतानाही डेगवे तलाठी किरण गजीनकर यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम हाती घेतले. इन्सुलीतील गीतांजली अंकुश माधव, दिनेश दत्ताराम गावडे, आत्माराम कोठावळे, प्रदीप सावंत, हेमंत राणे यांच्या घरांवर झाडे पडल्याने छपरांचे नुकसान झाले.बांदा शहरातही चक्रीवादळाचा फटका बसला. आळवाडा परिसरात वीजवाहिन्या मुख्य रस्त्यावरच तुटून पडल्या होत्या. बांद्यात श्यामसुंदर शंकर गवस, प्रतिभा प्रभाकर म्हावळणकर, कृष्णा विष्णू मांजरेकर, राजेंद्र हरिश्चंद्र पडते, शोभा संभाजी कदम, आनंदी अनंत भाईप, विलास हरी बांदेकर, देवयानी दिनानाथ शिंदे, वीरेंद्र हरी बांदेकर, यशवंत रमेश आळवे, विजया विजयानंद तर्पे, हनुमंत मुरारी सावंत, रूपेश आनंद पाटकर, तातोबा सखाराम वराडकर, सरिता गणपत बहिरे, संजय सीताराम धुरी आदींचे नुकसान झाले. अण्णा आळवे यांच्या गाडीच्या शेडवर आंब्याचे झाड पडून कारच्या बोनेटचे नुकसान झाले. शेर्ला बाजारवाडी येथील दाजी पेडणेकर व उत्तम पेडणेकर यांच्या घरांवर आंब्याचे झाड पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बांदा आळवाडी येथील महेश तळवणेकर यांच्या दुकानावर झाड पडून नुकसान झाले. देऊळवाडी येथील तुकाराम मोरजकर यांच्या घरावरील पत्रे वादळात उडाल्याने नुकसान झाले. तसेच एकनाथ परब यांच्या घरावर फणस पडून छपरासह टीव्हीचेही नुकसान झाले. बांदा शहराला वीजपुरवठा करणाऱ्या ११ केव्ही लाईनवर चार ठिकाणी झाडे पडल्याने शहराचा वीजपुरवठा खंडित झाला. मुसळधार पावसासह वाऱ्याचा वेग अधिक असल्याने परिसरातील विजेचे खांब अक्षरक्ष: उन्मळून पडले. त्यामुळे बांदा दशक्रोशीतील गावांमधील वीजपुरवठा खंडित झाला. बांदा शहराला जोडणाऱ्या विविध ग्रामीण मार्गांवर झाडे उन्मळून पडल्याने बांदा शहराकडे येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. यामध्ये एसटी बसेसही अडकल्याने अनेकांची तारांबळ उडाली.