शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

आधारकार्डचा शिल्लक दीड टक्का रेंगाळणार

By admin | Updated: November 30, 2015 01:09 IST

न्यायालयाच्या निर्णयाचा परिणाम : महा - ई सेवा केंद्रांतर्गत उपक्रम सुरू; नागरिक आश्वस्त

रत्नागिरी : शासनाने सर्व शासकीय कामांसाठी आधारकार्ड अनिवार्य करणार असल्याचा दणका नागरिकांना देताच, ज्यांनी अद्याप आधारकार्ड काढलेली नाहीत किंवा ज्यांना ती मिळालेली नव्हती, अशांची आधारकार्डसाठी धावपळ सुरू झाली होती. त्यामुळे आधारकार्डच्या कामाला जिल्ह्यात गती आल्याने आधारनोंदणीचे काम आत्तापर्यंत ९८.५३ टक्के पूर्ण झाले. मात्र, न्यायालयाने आधारकार्ड सक्तीचे करू नये, असा निर्णय दिल्याने उर्वरीत दीड टक्के काम दीर्घकाळ रेंगाळण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे.राज्यात आधारकार्ड देण्याचे काम शासनाने ‘ग्लोडाईन’ या कंपनीकडे दिले होते. पण पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात केवळ ३५ टक्के काम करून सदर कंपनीने हे काम अचानक थांबविले. १२ जानेवारी २०११ ते ३१ मार्च २०१२ या कालावधीत जिल्ह्यातील १६,१२,६७२ लोकसंख्येपैकी केवळ ६,४३,५८२ एवढ्याच आधारकार्डचे काम पूर्ण झाले होते. त्यानंतर विविध शिष्यवृत्ती, विविध योजनांचे अनुदान, गॅस सिलिंडरची सबसिडी आदींसाठीही आधारकार्ड सक्तीचे केल्यामुळे नागरिकांची यासाठी धावपळ सुरू झाली. १ जानेवारी २०१३पासून जिल्ह्यात ‘स्पॅन्को’ कंपनीतर्फे आधारकार्ड नोंदणीला सुरूवात करण्यात आली. जिल्ह्यातील ३१ महा ई - सेवा केंद्रांच्या माध्यमातून ही सेवा सध्या सुरू आहे. जिल्ह्याची एकूण लोकसंख्या (२०११च्या जनगणनेनुसार) १६,१५,०६९ इतकी आहे. त्यापैकी नोव्हेंबर २०१५पर्यंत १५ लाख ९१ हजार २८५ जणांची (९८.५३) आधार नोंदणी पूर्ण झाली आहे. तर केवळ २३,७८४ जणांची आधार नोंदणी होणे अद्याप बाकी आहे. युनिक कार्ड म्हणून आधारकार्डचा वापर केला जाण्याची घोषणा केंद्र सरकारने यापूर्वी केली होती. मात्र, ती जाचक ठरल्याने काही जणांनी न्यायालयाकडे दाद मागितली. त्यावर निवडणूक कार्ड आणि रेशनकार्ड यासाठी आधारकार्डची सक्ती करू नये, अशा न्यायालयाच्या सूचना आल्याने आता नागरिक आश्वस्त झाले आहेत. त्यामुळे उरलेले दीड टक्के आधारकार्ड नोंदणीचे काम आता दीर्घकाळ रेंगाळण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)तालुका लोकसंख्याआधारनोंदणीमंडणगड६२,१२३६१,६९७दापोली१,७८,३४०१,९९,३१२खेड१,८१,६१५१,७६.८२६चिपळूण२,७९,१२२२,६७,९५९गुहागर१,२३,२०९१,२५,१३२संगमेश्वर१,९८,३४३१,९२,५१२रत्नागिरी३,१९,४४९३,०२,३४०लांजा१,०६,९८६१,२३,०२५राजापूर१,६५,८८२१,४२,४८२एकूण१६,१५,०६९१५,९१,२८५आधारकार्ड सक्ती केल्यानंतर आधारकार्डसाठी गर्दी होत होती. मात्र, न्यायालयाने ही सक्ती करू नये असे सांगताच नागरिकांनी पाठ फिरवली. रेशनकार्डसाठी कार्ड आवश्यक करण्यात आले आहे.