शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

आधारकार्डचा शिल्लक दीड टक्का रेंगाळणार

By admin | Updated: November 30, 2015 01:09 IST

न्यायालयाच्या निर्णयाचा परिणाम : महा - ई सेवा केंद्रांतर्गत उपक्रम सुरू; नागरिक आश्वस्त

रत्नागिरी : शासनाने सर्व शासकीय कामांसाठी आधारकार्ड अनिवार्य करणार असल्याचा दणका नागरिकांना देताच, ज्यांनी अद्याप आधारकार्ड काढलेली नाहीत किंवा ज्यांना ती मिळालेली नव्हती, अशांची आधारकार्डसाठी धावपळ सुरू झाली होती. त्यामुळे आधारकार्डच्या कामाला जिल्ह्यात गती आल्याने आधारनोंदणीचे काम आत्तापर्यंत ९८.५३ टक्के पूर्ण झाले. मात्र, न्यायालयाने आधारकार्ड सक्तीचे करू नये, असा निर्णय दिल्याने उर्वरीत दीड टक्के काम दीर्घकाळ रेंगाळण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे.राज्यात आधारकार्ड देण्याचे काम शासनाने ‘ग्लोडाईन’ या कंपनीकडे दिले होते. पण पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात केवळ ३५ टक्के काम करून सदर कंपनीने हे काम अचानक थांबविले. १२ जानेवारी २०११ ते ३१ मार्च २०१२ या कालावधीत जिल्ह्यातील १६,१२,६७२ लोकसंख्येपैकी केवळ ६,४३,५८२ एवढ्याच आधारकार्डचे काम पूर्ण झाले होते. त्यानंतर विविध शिष्यवृत्ती, विविध योजनांचे अनुदान, गॅस सिलिंडरची सबसिडी आदींसाठीही आधारकार्ड सक्तीचे केल्यामुळे नागरिकांची यासाठी धावपळ सुरू झाली. १ जानेवारी २०१३पासून जिल्ह्यात ‘स्पॅन्को’ कंपनीतर्फे आधारकार्ड नोंदणीला सुरूवात करण्यात आली. जिल्ह्यातील ३१ महा ई - सेवा केंद्रांच्या माध्यमातून ही सेवा सध्या सुरू आहे. जिल्ह्याची एकूण लोकसंख्या (२०११च्या जनगणनेनुसार) १६,१५,०६९ इतकी आहे. त्यापैकी नोव्हेंबर २०१५पर्यंत १५ लाख ९१ हजार २८५ जणांची (९८.५३) आधार नोंदणी पूर्ण झाली आहे. तर केवळ २३,७८४ जणांची आधार नोंदणी होणे अद्याप बाकी आहे. युनिक कार्ड म्हणून आधारकार्डचा वापर केला जाण्याची घोषणा केंद्र सरकारने यापूर्वी केली होती. मात्र, ती जाचक ठरल्याने काही जणांनी न्यायालयाकडे दाद मागितली. त्यावर निवडणूक कार्ड आणि रेशनकार्ड यासाठी आधारकार्डची सक्ती करू नये, अशा न्यायालयाच्या सूचना आल्याने आता नागरिक आश्वस्त झाले आहेत. त्यामुळे उरलेले दीड टक्के आधारकार्ड नोंदणीचे काम आता दीर्घकाळ रेंगाळण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)तालुका लोकसंख्याआधारनोंदणीमंडणगड६२,१२३६१,६९७दापोली१,७८,३४०१,९९,३१२खेड१,८१,६१५१,७६.८२६चिपळूण२,७९,१२२२,६७,९५९गुहागर१,२३,२०९१,२५,१३२संगमेश्वर१,९८,३४३१,९२,५१२रत्नागिरी३,१९,४४९३,०२,३४०लांजा१,०६,९८६१,२३,०२५राजापूर१,६५,८८२१,४२,४८२एकूण१६,१५,०६९१५,९१,२८५आधारकार्ड सक्ती केल्यानंतर आधारकार्डसाठी गर्दी होत होती. मात्र, न्यायालयाने ही सक्ती करू नये असे सांगताच नागरिकांनी पाठ फिरवली. रेशनकार्डसाठी कार्ड आवश्यक करण्यात आले आहे.