शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

आधारकार्डचा शिल्लक दीड टक्का रेंगाळणार

By admin | Updated: November 30, 2015 01:09 IST

न्यायालयाच्या निर्णयाचा परिणाम : महा - ई सेवा केंद्रांतर्गत उपक्रम सुरू; नागरिक आश्वस्त

रत्नागिरी : शासनाने सर्व शासकीय कामांसाठी आधारकार्ड अनिवार्य करणार असल्याचा दणका नागरिकांना देताच, ज्यांनी अद्याप आधारकार्ड काढलेली नाहीत किंवा ज्यांना ती मिळालेली नव्हती, अशांची आधारकार्डसाठी धावपळ सुरू झाली होती. त्यामुळे आधारकार्डच्या कामाला जिल्ह्यात गती आल्याने आधारनोंदणीचे काम आत्तापर्यंत ९८.५३ टक्के पूर्ण झाले. मात्र, न्यायालयाने आधारकार्ड सक्तीचे करू नये, असा निर्णय दिल्याने उर्वरीत दीड टक्के काम दीर्घकाळ रेंगाळण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे.राज्यात आधारकार्ड देण्याचे काम शासनाने ‘ग्लोडाईन’ या कंपनीकडे दिले होते. पण पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात केवळ ३५ टक्के काम करून सदर कंपनीने हे काम अचानक थांबविले. १२ जानेवारी २०११ ते ३१ मार्च २०१२ या कालावधीत जिल्ह्यातील १६,१२,६७२ लोकसंख्येपैकी केवळ ६,४३,५८२ एवढ्याच आधारकार्डचे काम पूर्ण झाले होते. त्यानंतर विविध शिष्यवृत्ती, विविध योजनांचे अनुदान, गॅस सिलिंडरची सबसिडी आदींसाठीही आधारकार्ड सक्तीचे केल्यामुळे नागरिकांची यासाठी धावपळ सुरू झाली. १ जानेवारी २०१३पासून जिल्ह्यात ‘स्पॅन्को’ कंपनीतर्फे आधारकार्ड नोंदणीला सुरूवात करण्यात आली. जिल्ह्यातील ३१ महा ई - सेवा केंद्रांच्या माध्यमातून ही सेवा सध्या सुरू आहे. जिल्ह्याची एकूण लोकसंख्या (२०११च्या जनगणनेनुसार) १६,१५,०६९ इतकी आहे. त्यापैकी नोव्हेंबर २०१५पर्यंत १५ लाख ९१ हजार २८५ जणांची (९८.५३) आधार नोंदणी पूर्ण झाली आहे. तर केवळ २३,७८४ जणांची आधार नोंदणी होणे अद्याप बाकी आहे. युनिक कार्ड म्हणून आधारकार्डचा वापर केला जाण्याची घोषणा केंद्र सरकारने यापूर्वी केली होती. मात्र, ती जाचक ठरल्याने काही जणांनी न्यायालयाकडे दाद मागितली. त्यावर निवडणूक कार्ड आणि रेशनकार्ड यासाठी आधारकार्डची सक्ती करू नये, अशा न्यायालयाच्या सूचना आल्याने आता नागरिक आश्वस्त झाले आहेत. त्यामुळे उरलेले दीड टक्के आधारकार्ड नोंदणीचे काम आता दीर्घकाळ रेंगाळण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)तालुका लोकसंख्याआधारनोंदणीमंडणगड६२,१२३६१,६९७दापोली१,७८,३४०१,९९,३१२खेड१,८१,६१५१,७६.८२६चिपळूण२,७९,१२२२,६७,९५९गुहागर१,२३,२०९१,२५,१३२संगमेश्वर१,९८,३४३१,९२,५१२रत्नागिरी३,१९,४४९३,०२,३४०लांजा१,०६,९८६१,२३,०२५राजापूर१,६५,८८२१,४२,४८२एकूण१६,१५,०६९१५,९१,२८५आधारकार्ड सक्ती केल्यानंतर आधारकार्डसाठी गर्दी होत होती. मात्र, न्यायालयाने ही सक्ती करू नये असे सांगताच नागरिकांनी पाठ फिरवली. रेशनकार्डसाठी कार्ड आवश्यक करण्यात आले आहे.