शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

बबनराव मी तुमच्यासोबतच, रोजगारावरून खासदार राऊत व साळगावकर यांचे सुरात सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 00:02 IST

नाणार प्रकल्पाला पाठिंबा देणे कदापि शक्य नाही. पण जिल्ह्यात प्रकल्प आले पाहिजेत या मताशी मी सहमत आहे. बेरोजगारी वाढत आहे, हे चांगले नाही.

सावंतवाडी : नाणार प्रकल्पाला पाठिंबा देणे कदापि शक्य नाही. पण जिल्ह्यात प्रकल्प आले पाहिजेत या मताशी मी सहमत आहे. बेरोजगारी वाढत आहे, हे चांगले नाही. त्यामुळे प्रकल्प यावेत या मताशी मी सहमत आहे, असे म्हणत खासदार विनायक राऊत यांनी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या सुरात सूर मिळवला. तसेच प्रकल्पासाठी मी स्वत: प्रयत्न करेन असे म्हणत, बबनराव, मी तुमच्यासोबतच अशी कोपरखळी मारत खासदार निधीतून नगरपालिकेला १५ लाखांचा निधी जाहीर केला.खासदार विनायक राऊत यांनी शुक्रवारी सावंतवाडी नगरपालिकेला सदिच्छा भेट दिली . त्यांचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी स्वागत केले. यावेळी मुख्याधिकारी राहुल इंगळे, जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा, विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ,  राजू नाईक, नगरसेविका शुभांगी सुकी, भारती मोरे, माधुरी वाडकर, बाबू कुडतरकर, सागर नाणोस्कर आदी उपस्थित होते.नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी कंत्राटी कामगारांना कायम करा या मागणीचा पाठपुरावा करा, अशी विनंती खासदार राऊत यांच्याकडे केली. त्यावर राऊत यांनी तुमचा प्रश्न चांगला आहे. नक्की पाठपुरावा करू, असे सांगितले. तर नगराध्यक्षांनी जिल्ह्यात रोजगार आला पाहिजे. सगळ्याच प्रकल्पांना विरोध नको, अशी भूमिका मांडली. त्यावर खासदार राऊत यांनी आम्ही नाणार प्रकल्पाला कशासाठी विरोध करतो हे साळगावकर यांना पटवून दिले.तुम्ही रोजगार म्हणत असाल तर नाणारमधून रोजगार निर्मिती होईल. पण ती किती आणि स्थानिक त्यात किती असतील याचा विचार करा. देशात दोन ठिकाणी रिफायनरी आहे. तेथेही मी जाऊन आलो. तर तेथे रोजगार करणारे स्थानिक नाहीत तर ते बाहेरचे आहेत. तुम्हाला कोकणात बाहेरचे येऊन रोजगार करणारे चालतील का? असा सवाल करत प्रकल्प आले पाहिजेत या मताशी मी सहमत आहे. पण ते कोणते प्रकल्प यावेत यालाही मर्यादा आहे. रोजगारासाठी मी तुमच्याबरोबरच आहे. येथील युवकांना रोजगार मिळाला पाहिजे या मताशी सहमत असून रोजगार आम्ही उपलब्ध केला नाही तर आम्हाला पुढील पिढी माफ करणार नाही, असे सांगत प्रकल्प यावेत, असे सांगत साळगावकर यांच्या सुरात राऊत यांनी सूर मिळवत रोजगारासाठी काय तरी केले पाहिजे, असेही सांगितले. तसेच नगरपालिकेचे काम खरोखरच चांगले आहे. मला कायम नगरपालिकेबद्दल अभिमान आहे. बबनराव मी तुमच्या सोबतच, असे म्हणत खासदार राऊत यांनी आपल्या खासदार निधीतून पालिकेला पंधरा लाखाचा निधीही जाहीर केला. तसेच नगरपालिकेत नगराध्यक्ष व नगरसेवक हे चांगले काम करीत आहेत, असे सांगत अभिनंदनही त्यांनी यावेळी केले.महामार्ग सावंतवाडीतून गेला पाहिजे होताझाराप-पत्रादेवी हा महामार्ग सावंतवाडीतून गेला पाहिजे होता. त्यामुळे रोजगार निर्मिती झाली असती, असे सांगत सावंतवाडीचे दु:ख आम्ही जाणून आहोत. त्यामुळेच कणकवलीवासियांना शहरातून महामार्ग कसा जाईल हे बघा, अशी सूचना केल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले.

टॅग्स :Vinayak Rautविनायक राऊत