शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

मालकी हक्काबाबत कुळांमध्ये जागृती

By admin | Updated: March 4, 2015 23:44 IST

जिल्हाधिकारी कार्यालय : १३,६६७ खातेदारांकडून नजराणा रक्कम जमा

रत्नागिरी : कुळांना त्यांच्या जमिनीचा मालकी हक्क मिळावा, यासाठी अगदी अल्पसा नजराणा रक्कम भरून या जमिनीची मालकी मिळवता येते. मात्र, याबाबत कुळांमध्ये जागृती होण्यासाठी प्रशासनानेच ‘तलाठी तुमच्या दारी’ हा उपक्रम राबवण्यास सुरूवात केली. त्यामुळे आता हळुहळू कुळांमध्ये जागरूकता निर्माण होत असल्याचे चित्र असून, जिल्ह्यातील १,१४,४१० खातेदारांपैकी १३,६६८ कुळांनी नजराणा रक्कम भरली आहे. अजुनही १,००,८६७ खातेदारांकडून ही रक्कम भरणा व्हायची आहे.रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांसाठी मुंबई कूळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ लागू करण्यात आला आहे. या कायद्यान्वये कुळांना ते वर्षानुवर्षे कसत असलेल्या जमिनी परत मिळण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. कुळांची वहिवाट असली तरी त्यांना त्या जमिनी विकताना अनेक अडचणी येत होत्या. मात्र, आता कूळ हक्काने मिळालेल्या जमिनीची विक्री करण्यापूर्वी जिल्हाधिकारी यांच्या पूर्वपरवानगीची गरज नाही, अशी सुधारणा या कायद्यात करण्यात आली आहे.त्यामुळे या जमिनी मालकांच्या ताब्यातून सोडवण्यासाठी त्या जमिनींच्या आकाराच्या ४० पट नजराणा भरून सातबारावर रीतसर नोंद करून घेणे गरजेचे आहे. नजराणाची रक्कम ही अतिशय अल्प म्हणजे अगदी पाच रूपयांपासून पुढे अशी आहे. मात्र, प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवण्यात येऊनही ‘जेव्हा जमीन विकायची असेल तेव्हा बघू’, असे म्हणत कुळांकडूनच दुर्लक्ष केले जात आहे.मध्यंतरी जिल्हा प्रशासनाने कुळांची मालकी प्रस्थापित होऊन त्यांचे नाव सातबारावर नोंदवण्यासाठी विशेष मोहीम राबवली होती. मात्र, त्यालाही कुळांकडून अल्प प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात १ लाख १४ हजार ४१० खातेदार आहेत. आत्तापर्यंत या विशेष कायद्यानुसार ४० पट नजराणा रक्कम भरून जिल्ह्यात १३,६६८ कुळानींच मालकी हक्क मिळवला आहे. प्रशासनाकडून जागृतीचे प्रयत्न होत असूनही कुळांच्या उदासीनतेमुळे कुळहक्कांपासून अनेक कुळे वंचित रहात आहेत. तरीही अगदी ग्रामीण भागात असलेल्या कुळांमध्ये जागृती होऊन त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी पुन्हा आता एप्रिल महिन्यापासून विशेष मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती कूळ वहिवाट शाखेचे नायब तहसीलदार नरेंद्र घोसाळकर यांनी दिली. (प्रतिनिधी)पूर्वमंजुरी नकोमुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियत १९४८ च्या कलम ४३(१) अधिनियमातील नव्या सुधारणेनुसार आता १० वर्षे पूर्ण झालेल्या जमिनीची खरेदी विक्री, देणगी, अदलाबदल, गहाण ठेवणे, पट्टयाने देणे, अभिहस्तांतरण यासाठी जिल्हाधिकारी यांच्या कोणत्याही पूर्वमंजुरीची आवश्यकता राहणार नाही. मात्र, त्यासाठी ४० पट नजराणा भरून मालकी हक्क प्रस्तापित करणे गरजेचे आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.सर्वाधिक खातेदारांची संख्या रत्नागिरी तालुक्यात ३३,२२९ इतकी आहे. त्याखालोखाल दापोलीत २०,८१३ खातेदार आहेत. त्यामानाने रत्नागिरीत नजराणा रक्कम भरलेल्यांची संख्या अधिक आहे. पण दापोलीत केवळ ४४० आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी मुंबई कूळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ लागू.जमिनी मालकांच्या ताब्यातून सोडवण्यासाठी आकाराच्या ४० पट नजराणा भरून सातबारावर रीतसर नोंद करून घेणे गरजेचे.नजराणा भरलेल्या तसेच शिल्लक कुळांची सख्यातालुकाएकूणनजराणा भरलेलेशिल्लकमंडणगड००० दापोली२०,८१३४४०२०,३७३खेड४,३२०८२१४,०३७चिपळूण१९,०१२७१०१८,३०२गुहागर१८,०२२१२३०१६,७९२संगमेश्वर६,२४२२०९४४,४४८रत्नागिरी३३,२२९८१००२५,१२९लांजा१२,४७२६८६११,७८६राजापूर०१२५० एकूण१,१४,४१०१३,६६८१,००,८६७