शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत सरासरी ६२ टक्के मतदान

By admin | Updated: October 16, 2014 00:51 IST

चिपळुणात सर्वाधिक, तर रत्नागिरीत सर्वांत कमी.. भास्कर जाधव यांचा पराभव न केल्यास... संन्यास

रत्नागिरी : जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांत सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी ५३.८३ टक्केमतदान झाले आहे. पुढच्या एका तासातील मतदानाचा विचार करता सुमारे ६० ते ६२ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी आज, बुधवारी सायंकाळी उशिरा आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला. सर्वाधिक मतदान चिपळुणात, तर रत्नागिरीत सर्वांत कमी मतदान झाले.मतदानास सकाळी सात वाजल्यापासून प्रारंभ झाला. सुरुवातीच्या दोन तासांत ग्रामीण तसेच शहरी भागातही मतदानाचा वेग चांगला होता. सकाळी दहानंतर हा वेग काहीसा मंदावला. सकाळी सात ते नऊ या वेळेत दापोली, गुहागर, चिपळूण, रत्नाागिरी आणि राजापूर या पाचही तालुक्यांत सरासरी २५ टक्के मतदान झाले. यात रत्नागिरी आणि चिपळुणात अधिक मतदान झाले. सुरुवातीला मतदान वेगात झाल्याने पुढेही हे प्रमाण वाढेल, असा अंदाज व्यक्त होेत होता; मात्र, पुन्हा एक वाजेपर्यंत / ातदान संथगतीने झाले. त्यामुळे सात ते एक या वेळेत जिल्ह्याचे एकूण ३५.८ टक्के मतदान झाले. सायंकाळच्या शेवटच्या दोन तासांत मतदानाने काहीसा वेग घेतला. मतदान सुरू झाल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात एकूण ६,७६,०५८ (५३.८३ टक्के) मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजावला.यात पुरुषांची संख्या ३ लाख २८ हजार ७७२, तर महिला मतदारांची संख्या ३ लाख ३८ हजार २८६ इतकी आहे. एकूण मतदारांची संख्या लक्षात घेता पुरुष मतदारांची टक्केवारी ५५.९ टक्के इतकी आहे, तर महिलांची टक्केवारी ५१.९६ टक्के इतकी आहे. काही ठिकाणी मतदानयंत्रांत झालेले किरकोळ बिघाड वगळता अन्यत्र मतदान शांततेत पार पडले.पाचही मतदारसंघांतील नियोजित ठिकाणी रविवारी (दि. १९) सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी होणार असल्याचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)..तर संन्यास भास्कर जाधव यांचा पराभव न केल्यास राजकारणातून संन्यास घेण्याचा निश्चय गुहागर मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार संदीप सावंत यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केला.ंमतदारसंघटक्केदापोली५४.०२गुहागर५५.३३चिपळूण५९.०९रत्नागिरी४६.४९राजापूर५४.८७सरासरी५३.८३