शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
3
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
4
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
5
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
6
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
7
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
9
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
10
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
11
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
12
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
13
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
14
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
15
Lalbaugcha Raja 2025 First Look: 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
16
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
17
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
18
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
20
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

रत्नागिरीत सरासरी ६२ टक्के मतदान

By admin | Updated: October 16, 2014 00:51 IST

चिपळुणात सर्वाधिक, तर रत्नागिरीत सर्वांत कमी.. भास्कर जाधव यांचा पराभव न केल्यास... संन्यास

रत्नागिरी : जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांत सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी ५३.८३ टक्केमतदान झाले आहे. पुढच्या एका तासातील मतदानाचा विचार करता सुमारे ६० ते ६२ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी आज, बुधवारी सायंकाळी उशिरा आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला. सर्वाधिक मतदान चिपळुणात, तर रत्नागिरीत सर्वांत कमी मतदान झाले.मतदानास सकाळी सात वाजल्यापासून प्रारंभ झाला. सुरुवातीच्या दोन तासांत ग्रामीण तसेच शहरी भागातही मतदानाचा वेग चांगला होता. सकाळी दहानंतर हा वेग काहीसा मंदावला. सकाळी सात ते नऊ या वेळेत दापोली, गुहागर, चिपळूण, रत्नाागिरी आणि राजापूर या पाचही तालुक्यांत सरासरी २५ टक्के मतदान झाले. यात रत्नागिरी आणि चिपळुणात अधिक मतदान झाले. सुरुवातीला मतदान वेगात झाल्याने पुढेही हे प्रमाण वाढेल, असा अंदाज व्यक्त होेत होता; मात्र, पुन्हा एक वाजेपर्यंत / ातदान संथगतीने झाले. त्यामुळे सात ते एक या वेळेत जिल्ह्याचे एकूण ३५.८ टक्के मतदान झाले. सायंकाळच्या शेवटच्या दोन तासांत मतदानाने काहीसा वेग घेतला. मतदान सुरू झाल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात एकूण ६,७६,०५८ (५३.८३ टक्के) मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजावला.यात पुरुषांची संख्या ३ लाख २८ हजार ७७२, तर महिला मतदारांची संख्या ३ लाख ३८ हजार २८६ इतकी आहे. एकूण मतदारांची संख्या लक्षात घेता पुरुष मतदारांची टक्केवारी ५५.९ टक्के इतकी आहे, तर महिलांची टक्केवारी ५१.९६ टक्के इतकी आहे. काही ठिकाणी मतदानयंत्रांत झालेले किरकोळ बिघाड वगळता अन्यत्र मतदान शांततेत पार पडले.पाचही मतदारसंघांतील नियोजित ठिकाणी रविवारी (दि. १९) सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी होणार असल्याचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)..तर संन्यास भास्कर जाधव यांचा पराभव न केल्यास राजकारणातून संन्यास घेण्याचा निश्चय गुहागर मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार संदीप सावंत यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केला.ंमतदारसंघटक्केदापोली५४.०२गुहागर५५.३३चिपळूण५९.०९रत्नागिरी४६.४९राजापूर५४.८७सरासरी५३.८३