शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जिल्ह्यातील प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न : जठार

By admin | Updated: October 19, 2014 22:45 IST

राज्यात सरकार आले याचा आनंद जास्त आहे

कणकवली : पराभव झाला या दु:खापेक्षा राज्यात सरकार आले याचा आनंद जास्त आहे. केंद्र व राज्यातील सत्तेच्या आधारे जिल्ह्यातील प्रश्न मार्गी लावण्याचा एककलमी कार्यक्रम हाती घेणार असल्याचे प्रतिपादन प्रमोद जठार यांनी केले. निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राजन म्हापसेकर, रंगनाथ गवस, शिशीर परूळेकर, बबलू सावंत आदी उपस्थित होते. राणे कुटुंबीयांच्या विरोधातील मतांमध्ये विभागणी झाल्याने पराभव झाला. तो मी मान्य करतो. मतविभागणी टाळता आली असती तर चित्र बदलले असते. परंतु पैशापुढे बाकी सर्व फिके पडते हे दिसून आले. ज्यांनी आपणास मतदान केले त्या सर्वांचा आभारी आहे. कुडाळ मतदारसंघातून जिंकलेले वैभव नाईक आणि सावंतवाडीतून जिंकलेले दीपक केसरकर या दोघांचे अभिनंदन करतो, असे जठार म्हणाले.विरोधी पक्षाचा आमदार असताना जेवढे काम केले नाही. तेवढे आता आमदार नसताना करून दाखवेन. त्यासाठी केंद्र व राज्यातील सत्तेचा वापर केला जाईल. भाजपा कार्यकर्त्यांनी या पराभवाने विचलित होऊ नये. तिनही ठिकाणी पराभव झाला तरी केंद्र व राज्यातील सत्ता व्यवस्थित राबवली तर भविष्यात सर्व सत्तास्थाने काबीज करू शकतो. पक्षश्रेष्ठी आपली काळजी घेण्याचा निश्चित प्रयत्न करतील. नारायण राणेंच्या पराभवाने त्यांची राजकीय कारकीर्द संपल्यात जमा आहे. नारायण राणेंच्या पराभवाच्या दु:खापेक्षा आपले दु:ख मोठे नाही. हरलो तरी राजकीय रिंग्ांणात राहून विकासकामांचा पाठपुरावा करू असे सांगून पराभव पचवून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन जठार यांनी केले. (प्रतिनिधी)