शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रयत्न

By admin | Updated: May 21, 2015 00:05 IST

दत्तात्रय शिंदे : पोलीस अधीक्षकांनी मांडली रूपरेषा

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गातील गुन्ह्यांचे प्रमाण हे राज्याच्या तुलनेत खूप कमी आहे ही निश्चितच समाधानकारक बाब आहे. तरीसुद्धा गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गुन्हे प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणार आहे. घडलेले गुन्हे उघडकीस यावेत या अनुषंगाने पोलीस कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करून जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी पत्रकारांना दिली.बुधवारी पोलीस अधीक्षक दालनात जिल्हा मुख्यालय पत्रकारांनी नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली असता ते बोलत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे म्हणाले की, मी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रथमत: गुन्ह्याचे प्रमाण पाहिले. तर असे निदर्शनास आले की, इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सिंधुदुर्गात गुन्ह्यांचे प्रमाण हे नगण्य आहे. ही बाब निश्चितच समाधानकारक आहे. तरीसुद्धा इतर जे गुन्हे घडतात ते रोखणेसुद्धा तेवढेच महत्वाचे आहे. म्हणून गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यात गुन्हे प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणार आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखली जाईल. घडलेल्या गुन्ह्यांचा पर्दाफाश जास्तीत जास्त प्रमाणात व्हावा यासाठी त्यादृष्टीने मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच पोलीस दलाचे मनोबल वाढविले जाईल व पोलिसांसाठी कल्याणकारी योजना राबविण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती यावेळी नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दिली.जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात सागरी किनारा लाभला असून त्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पावले उचलताना स्थानिक लोकांचे व मच्छिमार बांधवांचे सहकार्य हे पोलिसांना आवश्यक आहे. यांचे सहकार्य लाभल्यास सागरी सुरक्षा दलाला चांगली श्रेणी गाठता येईल असेही शिंदे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)राज्याच्या विविध भागात यशस्वी कामशिंदे यांचे मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील बार्शी हे आहे. एम. एस्सी. कृषी, एल. एल. बी. तसेच सहकार क्षेत्रातील जी.डी.सी. अँड ए. हा डिप्लोमा हे शिक्षण पूर्ण करून सन १९६६ च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून पोलीस उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. गडचिरोली, गोंदिया या नक्षलवादी भागात त्यांनी काम केले. या जिल्ह्यात सलग तीन वर्षे कठीण सेवा बजावल्याबद्दल शासनाकडून विशेष सेवा पदकही मिळाले. सोलापूर जिल्ह्यातही त्यांनी काम केले. एसीपी क्राईम व डी. व्ही. दोन याठिकाणी काम केले. २००२ च्या सोलापूरमधील जातीय दंगलीत ‘त्या’ दंगली शमविण्यासाठी कठोर कारवाईही केली. त्यानंतर नवी मुंबईत एसीपी क्राईम व एसीपी म्हणून स्पेशल ब्रँचमध्ये काम केले. घनसोली येथे झालेल्या जातीय दंगलीत चांगले काम केले. यावेळी वेळप्रसंगी गोळीबारही करावा लागला होता. सन २००६ मध्ये मुंबई शहर उपायुक्त म्हणून प्रमोशन मिळाले. मुंबई उपनगर अधीक्षक म्हणूनही काम पाहिले. सन २००९ ते २०१२ पर्यंत डी.सी.पी. म्हणून काम पाहिले. सध्या दहशतवादी विरोधी पथकाचे अधीक्षक पदावर असताना सिंधुदुर्गात बदली झाली.