शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

सिडकोच्या मागून कोकण परप्रांतीयांच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न, विनायक राऊतांचा आरोप

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: March 27, 2024 18:13 IST

कुडाळ येथील युवा कार्यकर्ता मेळाव्यात सरकारवर टीका

कुडाळ (सिंधुदुर्ग) : आता हे सरकार कोकणात सिडकोला आणून कोकण परप्रांतीयांच्या ताब्यात देऊ पाहत असल्याचा आरोप खासदार तथा इंडिया आघाडीचे रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघाचे उमेदवार विनायक राऊत यांनी केला. तसेच लोकसभा निवडणुकीत विजयाचा पताका फडकविण्यासाठी आता युवासेना कार्यरत असल्याने सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. युवाशक्तीच्या ताकदीवर विश्वास आहे, युवाशक्तीने देशाची लोकशाही वाचविण्यासाठी मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन युवा पिढीला राऊत यांनी केले.इंडिया आघाडीच्यावतीने कुडाळ येथे रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा क्षेत्राचा युवा महाराष्ट्रभिमान मेळावा खासदार विनायक राऊत, युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई, आमदार वैभव नाईक, राजन साळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी युवासेनेचे जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, सुशांत नाईक, रूची राऊत, विक्रांत जाधव, वरुण जाधव, रूपेश कदम, काँग्रेस युवकचे सरचिटणीस शिवराज मोरे, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष रूपेश जाधव, आप युवक जिल्हाध्यक्ष आदित्य बटवाले, अथर्व साळवी तसेच जिल्हाप्रमुख संजय पडते, संदेश पारकर, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, महिला प्रदेश सरचिटणीस जान्हवी सावंत तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

लोकशाही वाचविण्याची युवा पिढीवर जबाबदारीवरुण सरदेसाई म्हणाले, भाजपाने कोणतीच आश्वासने पूर्ण केली नाहीत. त्यामुळे भाजपकडेे अपयशाचा पाढा आहे. देशातील सध्याच्या स्थितीनुसार ही लोकसभेची शेवटची निवडणूक होऊ शकते, कारण भाजप देशाची लोकशाही संपवू पाहत आहे. त्यामुळे लोकशाही वाचविण्याची मोठी जबाबदारी युवा पिढीवर आहे.

आम्ही निष्ठावंत यावेळी आमदार राजन साळवी म्हणाले, या निवडणुकीत गद्दारांना धडा शिकवायचा आहे, माझ्यासह, कुटुंबीयांवर चौकशी लावून दबाव टाकला गेला, पण आम्ही निष्ठावंत आहोत.

ही राणेंची राजकीय अधोगतीएकीकडे भाजपाचे मंत्री नारायण राणे, मंत्री रवींद्र चव्हाण व गद्दारांचे नेते दीपक केसरकर, उदय सामंत असे चार जण कोकणातील मंत्री असूनही या मतदारसंघाचा प्रचार प्रमुख गोव्याचे मुख्यमंत्री यांना केले, कारण या चारही जणांवर भाजपाचा विश्वास नसावा असा. तर, भाजपकडून अजूनही नारायण राणे यांना उमेदवारी दिली जात नाही ही, राणे यांची राजकीय अधोगती आहे. या मेळाव्याला तुडुंब गर्दी झाली तर, कुडाळमध्ये उदय सामंत यांच्या मेळाव्यात पैसे न मिळाल्याने भांडणे सुरू होती, असा टोला शिंदे गटाला नाईक यांनी लगावला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गVinayak Rautविनायक राऊत Narayan Raneनारायण राणेlok sabhaलोकसभा