शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सिडकोच्या मागून कोकण परप्रांतीयांच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न, विनायक राऊतांचा आरोप

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: March 27, 2024 18:13 IST

कुडाळ येथील युवा कार्यकर्ता मेळाव्यात सरकारवर टीका

कुडाळ (सिंधुदुर्ग) : आता हे सरकार कोकणात सिडकोला आणून कोकण परप्रांतीयांच्या ताब्यात देऊ पाहत असल्याचा आरोप खासदार तथा इंडिया आघाडीचे रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघाचे उमेदवार विनायक राऊत यांनी केला. तसेच लोकसभा निवडणुकीत विजयाचा पताका फडकविण्यासाठी आता युवासेना कार्यरत असल्याने सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. युवाशक्तीच्या ताकदीवर विश्वास आहे, युवाशक्तीने देशाची लोकशाही वाचविण्यासाठी मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन युवा पिढीला राऊत यांनी केले.इंडिया आघाडीच्यावतीने कुडाळ येथे रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा क्षेत्राचा युवा महाराष्ट्रभिमान मेळावा खासदार विनायक राऊत, युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई, आमदार वैभव नाईक, राजन साळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी युवासेनेचे जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, सुशांत नाईक, रूची राऊत, विक्रांत जाधव, वरुण जाधव, रूपेश कदम, काँग्रेस युवकचे सरचिटणीस शिवराज मोरे, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष रूपेश जाधव, आप युवक जिल्हाध्यक्ष आदित्य बटवाले, अथर्व साळवी तसेच जिल्हाप्रमुख संजय पडते, संदेश पारकर, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, महिला प्रदेश सरचिटणीस जान्हवी सावंत तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

लोकशाही वाचविण्याची युवा पिढीवर जबाबदारीवरुण सरदेसाई म्हणाले, भाजपाने कोणतीच आश्वासने पूर्ण केली नाहीत. त्यामुळे भाजपकडेे अपयशाचा पाढा आहे. देशातील सध्याच्या स्थितीनुसार ही लोकसभेची शेवटची निवडणूक होऊ शकते, कारण भाजप देशाची लोकशाही संपवू पाहत आहे. त्यामुळे लोकशाही वाचविण्याची मोठी जबाबदारी युवा पिढीवर आहे.

आम्ही निष्ठावंत यावेळी आमदार राजन साळवी म्हणाले, या निवडणुकीत गद्दारांना धडा शिकवायचा आहे, माझ्यासह, कुटुंबीयांवर चौकशी लावून दबाव टाकला गेला, पण आम्ही निष्ठावंत आहोत.

ही राणेंची राजकीय अधोगतीएकीकडे भाजपाचे मंत्री नारायण राणे, मंत्री रवींद्र चव्हाण व गद्दारांचे नेते दीपक केसरकर, उदय सामंत असे चार जण कोकणातील मंत्री असूनही या मतदारसंघाचा प्रचार प्रमुख गोव्याचे मुख्यमंत्री यांना केले, कारण या चारही जणांवर भाजपाचा विश्वास नसावा असा. तर, भाजपकडून अजूनही नारायण राणे यांना उमेदवारी दिली जात नाही ही, राणे यांची राजकीय अधोगती आहे. या मेळाव्याला तुडुंब गर्दी झाली तर, कुडाळमध्ये उदय सामंत यांच्या मेळाव्यात पैसे न मिळाल्याने भांडणे सुरू होती, असा टोला शिंदे गटाला नाईक यांनी लगावला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गVinayak Rautविनायक राऊत Narayan Raneनारायण राणेlok sabhaलोकसभा