शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोच्या मागून कोकण परप्रांतीयांच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न, विनायक राऊतांचा आरोप

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: March 27, 2024 18:13 IST

कुडाळ येथील युवा कार्यकर्ता मेळाव्यात सरकारवर टीका

कुडाळ (सिंधुदुर्ग) : आता हे सरकार कोकणात सिडकोला आणून कोकण परप्रांतीयांच्या ताब्यात देऊ पाहत असल्याचा आरोप खासदार तथा इंडिया आघाडीचे रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघाचे उमेदवार विनायक राऊत यांनी केला. तसेच लोकसभा निवडणुकीत विजयाचा पताका फडकविण्यासाठी आता युवासेना कार्यरत असल्याने सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. युवाशक्तीच्या ताकदीवर विश्वास आहे, युवाशक्तीने देशाची लोकशाही वाचविण्यासाठी मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन युवा पिढीला राऊत यांनी केले.इंडिया आघाडीच्यावतीने कुडाळ येथे रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा क्षेत्राचा युवा महाराष्ट्रभिमान मेळावा खासदार विनायक राऊत, युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई, आमदार वैभव नाईक, राजन साळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी युवासेनेचे जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, सुशांत नाईक, रूची राऊत, विक्रांत जाधव, वरुण जाधव, रूपेश कदम, काँग्रेस युवकचे सरचिटणीस शिवराज मोरे, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष रूपेश जाधव, आप युवक जिल्हाध्यक्ष आदित्य बटवाले, अथर्व साळवी तसेच जिल्हाप्रमुख संजय पडते, संदेश पारकर, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, महिला प्रदेश सरचिटणीस जान्हवी सावंत तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

लोकशाही वाचविण्याची युवा पिढीवर जबाबदारीवरुण सरदेसाई म्हणाले, भाजपाने कोणतीच आश्वासने पूर्ण केली नाहीत. त्यामुळे भाजपकडेे अपयशाचा पाढा आहे. देशातील सध्याच्या स्थितीनुसार ही लोकसभेची शेवटची निवडणूक होऊ शकते, कारण भाजप देशाची लोकशाही संपवू पाहत आहे. त्यामुळे लोकशाही वाचविण्याची मोठी जबाबदारी युवा पिढीवर आहे.

आम्ही निष्ठावंत यावेळी आमदार राजन साळवी म्हणाले, या निवडणुकीत गद्दारांना धडा शिकवायचा आहे, माझ्यासह, कुटुंबीयांवर चौकशी लावून दबाव टाकला गेला, पण आम्ही निष्ठावंत आहोत.

ही राणेंची राजकीय अधोगतीएकीकडे भाजपाचे मंत्री नारायण राणे, मंत्री रवींद्र चव्हाण व गद्दारांचे नेते दीपक केसरकर, उदय सामंत असे चार जण कोकणातील मंत्री असूनही या मतदारसंघाचा प्रचार प्रमुख गोव्याचे मुख्यमंत्री यांना केले, कारण या चारही जणांवर भाजपाचा विश्वास नसावा असा. तर, भाजपकडून अजूनही नारायण राणे यांना उमेदवारी दिली जात नाही ही, राणे यांची राजकीय अधोगती आहे. या मेळाव्याला तुडुंब गर्दी झाली तर, कुडाळमध्ये उदय सामंत यांच्या मेळाव्यात पैसे न मिळाल्याने भांडणे सुरू होती, असा टोला शिंदे गटाला नाईक यांनी लगावला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गVinayak Rautविनायक राऊत Narayan Raneनारायण राणेlok sabhaलोकसभा