शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
2
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
3
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
4
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
5
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
6
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
7
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
8
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
9
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
10
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
11
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
12
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
13
वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन
14
Malegaon Municipal Corporation Election : जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
15
अभिमानास्पद! जुन्या कागदांपासून पेन्सिल बनवणारं यंत्र; कोण आहे राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती?
16
१२२ षटकार, १४८८ धावा... रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर 'या' पठ्ठ्याने गाजवलं २०२५चं वर्ष
17
Aaditya Thackeray : “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
18
भारतात रॉल्स रॉयसचा 'मेगा प्लॅन'! देशाला तिसरे 'होम मार्केट' बनवण्याची घोषणा; 'या' क्षेत्रात करणार गुंतवणूक
19
“दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही”: उद्धव ठाकरे
20
धक्कादायक! ज्या मंदिरात २२ दिवसांपूर्वी लग्न केलं, तिथेच स्वत:ला संपवलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
Daily Top 2Weekly Top 5

corona virus-जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी पथके नियुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 11:57 IST

जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा गरजू लोकांपर्यंत सुरळीत व्हावा, वस्तुंची योग्य किंमत आकारली जावी याच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी उपजिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्या नेतृत्वाखाली पथके नियुक्त केली आहेत.

ठळक मुद्देजीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी पथके नियुक्तजिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरीकडून अंमलबजावणी

सांगली : जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा गरजू लोकांपर्यंत सुरळीत व्हावा, वस्तुंची योग्य किंमत आकारली जावी याच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी उपजिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्या नेतृत्वाखाली पथके नियुक्त केली आहेत. या पथकांमध्ये अन्न व औषध प्रशासन, वैधमापन शास्त्र, अन्नधान्य वितरण अधिकारी या विभागांच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आाहेत. याचाच एक भाग म्हणून केंद्र शासनाच्या ग्राहक संरक्षण विभागाने मास्क (2 प्लाई, 3 प्लाई सर्जिकल मास्क, एन 95 मास्क) व हँड सॅनिटायझर या वस्तुंचा जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत अंतर्भाव केला आहे.

सांगली जिल्ह्यामध्ये आजअखेर करोना बाधीत व संशयीत रूग्ण आढळून आलेला नाही. तथापी नागरिकांकडून सुरक्षिततेसाठी मास्क (2 प्लाई, 3 प्लाई सर्जिकल मास्क, एन 95 मास्क) व हँड सॅनिटायझरची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जात आहे.

या वस्तुंचा पुरवठा मर्यादीत स्वरूपात होत असल्याने सदर वस्तुंची विक्री निर्धारीत किंमतीपेक्षा अधिक दराने होण्याची तसेच साठेबाजी होऊन काळाबाजार होण्याची शक्यता आहे.

या वस्तुंचा तसेच इतर जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा गरजू लोकांपर्यंत सुरळीत व्हावा, वस्तुंची योग्य किंमत आकारली जावी याच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी उपजिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्या नेतृत्वाखाली पथके नियुक्त केली आहेत.

या पथकांमध्ये अन्न व औषध प्रशासन, वैधमापन शास्त्र, अन्नधान्य वितरण अधिकारी या विभागांच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.यामध्ये सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांच्या नेतृत्वाखाली, मिरज तालुका तहसिलदार रणजित देसाई, कवठेमहांकाळ तालुका तहसिलदार बी. जी. गोरे, तासगाव तालुका तहसिलदार कल्पना ढवळे, वाळवा तालुका तहसिलदार रविंद्र सबनीस, शिराळा तालुका सहाय्यक जिल्हाधिकारी तथा तहसिलदार आशिष येरेकर, खानापूर तालुका तहसिलदार ऋषिकेत शेळके, आटपाडी तालुका तहसिलदार सचिन लंगुटे, कडेगाव तालुका तहसिलदार शैलजा पाटील, पलूस तालुका तहसिलदार राजेंद्र पोळ, जत तालुका तहसिलदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथके तयार करण्यात आली आहेत.

अन्न व औषध प्रशासन व वैधमापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पथक प्रमुखांच्या सूचनेनुसार कामकाज करून मास्क व हँडसॅनिटायझर तसेच अन्य जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळीतपणे, निर्धारीत किंमतीस होतो किंवा कसे याबाबत तपासणी करावी. नागरिकांकडून कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास गांर्भीयाने दखल घेऊन शहानिशा करावी.

कोणताही गैरप्रकार निदर्शनास आल्यास संबंधितांविरूध्द जीवनावश्यक वस्तु कायदा 1955, आवश्यकतेनुसार औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940, औषध किंमत नियंत्रण आदेश 2013, वैधमापन शास्त्र अधिनियम 2009 व अविष्टित वस्तु नियम 2011 नुसार कारवाई प्रस्तापित करावी.

तपासणीबाबतचा दैनंदिन अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी यांना सादर करावा, असे निर्देशित केले आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची हजगर्जी झाल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली