शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

समाज साहित्य विचार संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. नितीन रिंढे, डॉ. भालचंद्र मुणगेकर प्रमुख पाहुणे

By सुधीर राणे | Updated: December 8, 2023 12:51 IST

सिंधुदुर्ग समाज साहित्य प्रतिष्ठानतर्फे १६ डिसेंबर रोजी मुंबईत आयोजन 

कणकवली: सिंधुदुर्ग समाज साहित्य प्रतिष्ठान गेली काही वर्ष  साहित्यिक उपक्रम राबवत आहे. प्रतिष्ठानच्या यावर्षीच्या तिसऱ्या समाज साहित्य विचार संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी, समीक्षक आणि साहित्य संशोधक प्रा. डॉ.नितीन रिंढे यांची निवड करण्यात आली आहे. तर संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी कुलगुरू, लेखक आणि माजी राज्यसभा सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे. शनिवार १६ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता दादर, मुंबई ग्रंथ संग्रहालयाच्या सुरेंद्र गावस्कर सभागृहात या संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर आणि प्रमुख कार्यवाह प्रा.वैभव साटम यांनी दिली.याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग समाज साहित्य प्रतिष्ठान दरवर्षी समाज साहित्य विचार संमेलन आयोजित करते. 'समाज असतो म्हणून साहित्याची निर्मिती होते'  हे ब्रीदवाक्य या संमेलनाचे असल्यामुळे संमेलनाला समाज साहित्य विचार संमेलन असे शीर्षक देण्यात आले आहे. हे तिसरे संमेलन असून ते मुंबईत आयोजित करण्यात आले आहे. प्रतिष्ठानचे काम महाराष्ट्र व्यापी व्हावे आणि या कामात महाराष्ट्रातील साहित्य संस्कृती क्षेत्रातील गुणवंत व्यक्तींना सहभागी करून घेता यावे तसेच कोकणातील कवी लेखकांबरोबर महाराष्ट्रातल्या इतर भागातीलही कवी लेखकांना मंच उपलब्ध करून द्यावा म्हणून हे संमेलन मुंबईत घेण्यात आले आहे.संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेले प्रा.डॉ. नितीन रिंढे हे मराठीतील महत्त्वाचे कवी समीक्षक आणि साहित्य संशोधक म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्र फाउंडेशनसह अनेक प्रतिष्ठित पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. तर संमेलनाचे प्रमुख पाहुणे सिंधुदुर्ग सुपुत्र डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी मुंबई विद्यापीठाचे  कुलगुरू, राज्यसभा सदस्य आणि देशाच्या नियोजन आयोगाचे सदस्य म्हणून त्यांनी केलेले कार्य सर्वश्रुत आहे. तर संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात आयोजित करण्यात आलेल्या निमंत्रितांच्या कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी कवयित्री प्राचार्य डॉ.सिसिलिया कार्व्हालो यांना निमंत्रित करण्यात आले आहे.संमेलनाच्या पहिल्या सत्रात गुरुवर्य इतिहासकार कृष्णराव अर्जुन केळुसकर पुरस्काराने ज्येष्ठ विचारवंत  चंद्रकांत वानखडे (नागपूर) यांना तर काशिराम आत्माराम साटम स्मृती समाज साहित्य कादंबरी पुरस्काराने विजय जावळे (बीड) यांना आणि प्रकाश रामचंद्र रसाळ स्मृती भूमी काव्य पुरस्काराने डॉ अनिल धाकू कांबळी (कणकवली ,नांदगाव) यांना डॉ.मुणगेकर यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. यावेळी  जयंत पवार कथा स्पर्धा पुरस्कारातील विजेते कथाकार डॉ.ऐश्वर्या रेवडकर (बार्शी) आणि जयदीप विघ्ने (बुलढाणा) यांनाही गैरविण्यात येणार आहे. या पहिल्या सत्रात समाज साहित्य प्रतिष्ठानच्या वार्षिक संमेलन विशेषांकाचे तसेच फोंडाघाट येथील कवी संतोष जोईल यांच्या  'काहीच सहन होत नाही' या काव्यसंग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीचेही प्रकाशन करण्यात येणार आहे.संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात महाराष्ट्राच्या विविध भागातील कवींच्या सहभागाने कवयित्री डॉ.सिसिलिया कार्व्हालो ( वसई) यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले असून यात अविनाश गायकवाड (मुंबई), वर्जेस सोलंकी, फेलेक्स डीसोझा,महेश लिला पंडित, संगीता अरबुने (विरार), रमेश सावंत, विजय सावंत (मुंबई), जिजा शिंदे (छत्रपती संभाजीनगर ,औरंगाबाद), अंजली ढमाळ, बालिका ज्ञानदेव (पुणे), प्रियदर्शनी पारकर, डॉ.दर्शना कोलते, संतोष जोईल, मनीषा पाटील, प्रमिता तांबे, अँड मेघना सावंत, अँड.प्राजक्ता शिंदे (सिंधुदुर्ग) आदींचा समावेश आहे. संमेलनाच्या अधिक माहितीसाठी  प्रा.संजीवनी पाटील , प्रा.तुषार नेवरेकर यांच्याशी संपर्क करावा असेही आवाहन मातोंडकर आणि साटम यांनी केले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMumbaiमुंबई