शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
2
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
3
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
4
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
6
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
7
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
8
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
9
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
10
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
11
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
12
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
14
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
15
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
16
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
17
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
18
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
19
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
20
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले

समाज साहित्य विचार संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. नितीन रिंढे, डॉ. भालचंद्र मुणगेकर प्रमुख पाहुणे

By सुधीर राणे | Updated: December 8, 2023 12:51 IST

सिंधुदुर्ग समाज साहित्य प्रतिष्ठानतर्फे १६ डिसेंबर रोजी मुंबईत आयोजन 

कणकवली: सिंधुदुर्ग समाज साहित्य प्रतिष्ठान गेली काही वर्ष  साहित्यिक उपक्रम राबवत आहे. प्रतिष्ठानच्या यावर्षीच्या तिसऱ्या समाज साहित्य विचार संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी, समीक्षक आणि साहित्य संशोधक प्रा. डॉ.नितीन रिंढे यांची निवड करण्यात आली आहे. तर संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी कुलगुरू, लेखक आणि माजी राज्यसभा सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे. शनिवार १६ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता दादर, मुंबई ग्रंथ संग्रहालयाच्या सुरेंद्र गावस्कर सभागृहात या संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर आणि प्रमुख कार्यवाह प्रा.वैभव साटम यांनी दिली.याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग समाज साहित्य प्रतिष्ठान दरवर्षी समाज साहित्य विचार संमेलन आयोजित करते. 'समाज असतो म्हणून साहित्याची निर्मिती होते'  हे ब्रीदवाक्य या संमेलनाचे असल्यामुळे संमेलनाला समाज साहित्य विचार संमेलन असे शीर्षक देण्यात आले आहे. हे तिसरे संमेलन असून ते मुंबईत आयोजित करण्यात आले आहे. प्रतिष्ठानचे काम महाराष्ट्र व्यापी व्हावे आणि या कामात महाराष्ट्रातील साहित्य संस्कृती क्षेत्रातील गुणवंत व्यक्तींना सहभागी करून घेता यावे तसेच कोकणातील कवी लेखकांबरोबर महाराष्ट्रातल्या इतर भागातीलही कवी लेखकांना मंच उपलब्ध करून द्यावा म्हणून हे संमेलन मुंबईत घेण्यात आले आहे.संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेले प्रा.डॉ. नितीन रिंढे हे मराठीतील महत्त्वाचे कवी समीक्षक आणि साहित्य संशोधक म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्र फाउंडेशनसह अनेक प्रतिष्ठित पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. तर संमेलनाचे प्रमुख पाहुणे सिंधुदुर्ग सुपुत्र डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी मुंबई विद्यापीठाचे  कुलगुरू, राज्यसभा सदस्य आणि देशाच्या नियोजन आयोगाचे सदस्य म्हणून त्यांनी केलेले कार्य सर्वश्रुत आहे. तर संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात आयोजित करण्यात आलेल्या निमंत्रितांच्या कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी कवयित्री प्राचार्य डॉ.सिसिलिया कार्व्हालो यांना निमंत्रित करण्यात आले आहे.संमेलनाच्या पहिल्या सत्रात गुरुवर्य इतिहासकार कृष्णराव अर्जुन केळुसकर पुरस्काराने ज्येष्ठ विचारवंत  चंद्रकांत वानखडे (नागपूर) यांना तर काशिराम आत्माराम साटम स्मृती समाज साहित्य कादंबरी पुरस्काराने विजय जावळे (बीड) यांना आणि प्रकाश रामचंद्र रसाळ स्मृती भूमी काव्य पुरस्काराने डॉ अनिल धाकू कांबळी (कणकवली ,नांदगाव) यांना डॉ.मुणगेकर यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. यावेळी  जयंत पवार कथा स्पर्धा पुरस्कारातील विजेते कथाकार डॉ.ऐश्वर्या रेवडकर (बार्शी) आणि जयदीप विघ्ने (बुलढाणा) यांनाही गैरविण्यात येणार आहे. या पहिल्या सत्रात समाज साहित्य प्रतिष्ठानच्या वार्षिक संमेलन विशेषांकाचे तसेच फोंडाघाट येथील कवी संतोष जोईल यांच्या  'काहीच सहन होत नाही' या काव्यसंग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीचेही प्रकाशन करण्यात येणार आहे.संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात महाराष्ट्राच्या विविध भागातील कवींच्या सहभागाने कवयित्री डॉ.सिसिलिया कार्व्हालो ( वसई) यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले असून यात अविनाश गायकवाड (मुंबई), वर्जेस सोलंकी, फेलेक्स डीसोझा,महेश लिला पंडित, संगीता अरबुने (विरार), रमेश सावंत, विजय सावंत (मुंबई), जिजा शिंदे (छत्रपती संभाजीनगर ,औरंगाबाद), अंजली ढमाळ, बालिका ज्ञानदेव (पुणे), प्रियदर्शनी पारकर, डॉ.दर्शना कोलते, संतोष जोईल, मनीषा पाटील, प्रमिता तांबे, अँड मेघना सावंत, अँड.प्राजक्ता शिंदे (सिंधुदुर्ग) आदींचा समावेश आहे. संमेलनाच्या अधिक माहितीसाठी  प्रा.संजीवनी पाटील , प्रा.तुषार नेवरेकर यांच्याशी संपर्क करावा असेही आवाहन मातोंडकर आणि साटम यांनी केले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMumbaiमुंबई