शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

सेनेचा स्वबळाचा नारा

By admin | Updated: September 18, 2016 00:02 IST

मालवण नगरपालिका निवडणूक : वैभव नाईकांकडे केली मागणी

मालवण : आगामी पालिका निवडणूक शिवसेनेने स्वबळावर लढवावी, अशी मागणी शहरातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे केली. पालिका निवडणूक आणि युतीबाबतची जबाबदारी नितीन वाळके यांच्यावर सोपविण्यात आली आहे. पालिकेतील सत्ताधारी काँग्रेसच्या विरोधात जनतेमध्ये नाराजी असून त्याचा फायदा उठविण्यासाठी आतापासूनच आंदोलने करून जनतेला न्याय मिळवून द्या, असे आवाहन आमदार नाईक यांनी केले.मालवण पालिका निवडणुकीसाठी शिवसेनेकडून स्वबळाची चाचपणी करण्याबाबत महत्त्वपूर्ण बैठक येथील शासकीय विश्रामगृह येथे आमदार वैभव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी शहरप्रमुख बाबी जोगी, उपतालुकाप्रमुख हरी खोबरेकर, निवडणूकप्रमुख नितीन वाळके, किरण वाळके, नगरसेवका सेजल परब, सन्मेश परब, रुपेश प्रभू, अन्वय प्रभू, गणेश कुडाळकर, किसन मांजरेकर, बाबू मांजरेकर, महिला तालुकाप्रमुख श्वेता सावंत, मेघा सावंत, पंकज सादये, बंड्या सरमळकर, महेश शिरपुटे, दादा पाटकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी काळात युती होईल की नाही याबाबत कार्यकर्त्यांनी चर्चा न करता आपल्या प्रभागाकडे लक्ष देऊन प्रचाराला सुरुवात करावी. मालवण पालिकेत पुन्हा शिवसेनेची सत्ता येण्यासाठी सर्व आजी-माजी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन निवडणूक प्रचार यंत्रणा राबविण्याबाबत आमदारांनी सूचना केल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी काही समस्या आमदारांकडे मांडल्या. (प्रतिनिधी)इच्छुकांनी शहरप्रमुखांकडे नावे देण्याच्या सूचनाशिवसेनेतून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी आपली नावे शहरप्रमुख बाबी जोगी यांच्याकडे नोंदविण्याची सूचना करण्यात आली आहे. तर उमेदवारांनी आपापल्या प्रभागातील संभाव्य प्रचाराचे मुद्देही प्रत्येकाने तयार करण्याच्या सूचना आमदार वैभव नाईक यांनी केल्या. बैठकीदरम्यान, सर्वच कार्यकर्त्यांनी शिवसेनेने पालिकेत स्वबळावर निवडणूक लढवावी अशी एकमुखी मागणी केल्याचे समजते. तर राज्यशासनाने नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करण्याबाबत शिवसेनेने सरकारवर दबाव आणावा. यावेळी नगराध्यक्षपदाचे महिला आरक्षण कायम राहिल्यास विद्यमान नगरसेविका सेजल परब यांच्या नावाचा विचार होणार आहे. मालवण पालिका निवडणुकीत चुरसमालवण नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप हे दोन्ही युती शासनातील पक्ष वेगवेगळे लढले तर त्याचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला होण्याची चिन्हे आहेत. कारण हे दोन राज्यात सत्ताधारी पक्ष आहेत. तर सध्या मालवण पालिका काँग्रेसच्या ताब्यात आहे.