शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
4
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
5
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
6
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
7
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
8
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
9
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
10
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
11
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
12
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
13
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
14
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
15
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
16
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
17
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
18
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
19
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
20
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
Daily Top 2Weekly Top 5

एप्रिल महिना राजकीय रणधुमाळीचा

By admin | Updated: March 26, 2015 00:10 IST

आचारसंहिता सुरू : ग्रामपंचायत, जिल्हा बँक, सहकारी संस्थांच्या निवडणुका

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील होऊ घातलेली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक तसेच विविध सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असतानाच आता सिंधुदुर्गातील आॅगस्ट व सप्टेंबरमध्ये मुदती संपणाऱ्या ७२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्याने संपूर्ण जिल्हा राजकीयदृष्ट्या ढवळून निघणार आहे. तर याचवेळी ७८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकाही होणार आहेत. या निवडणुकांसाठी २२ एप्रिलला मतदान व २३ एप्रिलला मतमोजणी होणार आहे.राज्याच्या निवडणूक विभागाने निवडणूक कार्यक्रमाची मंगळवारी घोषणा केल्यानंतर मंगळवारपासूनच संबंधित गावाच्या हद्दीत आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. जिल्हा बँकेची निवडणूक तोंडावर आली असतानाच तसेच विकास सोसायट्यांच्या निवडणुकात चांगलीच रंगत भरली असताना त्यात ग्रामपंचायत निवडणुकीची भर पडली आहे. या ७२ ग्रामपंचायतींची मुदत मे ते आॅगस्ट या दरम्यान संपत असल्याने या निवडणुका शांततेत व पारदर्शकरित्या पार पाडाव्यात यासाठी राज्य निवडणूक विभागाने जिल्हा प्रशासनाला आदेश दिले आहेत.जिल्ह्यात पार पडलेल्या लोकसभा व त्यानंतर विधानसभा निवडणुकींचे निकाल पहाता साऱ्यांचीच झोप उडविणारे ते निकाल होते. त्यामुळे जिल्हा बँक निवडणुका तसेच सोसायट्यांच्या निवडणुकीमध्ये कोणता पक्ष वर्चस्व सिद्ध करेल हे अंदाज बांधणे सध्या मुश्किल बनले आहे. त्यात आता जिल्ह्यातील ७२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार असल्याने या ग्रामपंचायतींवर कोणत्या पक्षाचा झेंडा लागणार हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे. दरम्यान, या साऱ्या निवडणुकीत मात्र जिल्हा राजकीयदृष्ट्या ढवळून निघणार हे मात्र निश्चित! निवडणुकीच्यावेळी अनेक उमेदवार अर्ज भरतात. परंतु नामनिर्देशनपत्र मागे घेण्याच्यावेळी एक उमेदवार सोडून अन्य उमेदवार अर्ज मागे घेतात. अशावेळी तो उमेदवार इतर उमेदवारांना दबाव आणून उमेदवारी अर्ज मागे घेण्यास लावतो ही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यापुढे असे प्रसंग घडल्यास राज्य निवडणूक आयोगास त्याबाबत सविस्तर अहवाल तत्काळ पाठवावा व राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिल्यानंतरच त्या उमेदवाराला विजयी घोषित करावे असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. ‘महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम’ या योजनेबाबतच्या शासन निर्णयामध्ये या ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणे या उपाययोजनेचा समावेश असला तरी आयोगाच्या आदेशानुसार ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम योजनेच्या बैठकीमध्ये जिल्हास्तरीय किंवा उपविभागीय स्तरावरील अथवा तालुका स्तरावरील कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने भाग घेतल्यास आचारसंहितेचा भंग मानून त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे, असेही निवडणूक विभागाचे निर्देशआहेत. (प्रतिनिधी)खर्च वेळेत सादर करण्याचे आवाहन निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून ३० दिवसांच्या आत संबंधित उमेदवाराने जिल्हा प्रशासनाकडे खर्च सादर करणे बंधनकारक आहे. जो उमेदवार खर्चाचा तपशील वेळेत सादर करणार नाही त्या उमेदवाराच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात यावा असे आदेशही राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्याची संपूर्ण जबाबदारी जिल्हाधिकारी याची राहणार आहे.जिल्ह्यातील मुदती संपणाऱ्या ७२ ग्रामपंचायतींपैकी जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर काँग्रेसचे वर्चस्व प्रस्थापित करणार. त्याचप्रमाणे ज्या ग्रामपंचायतींवर काँग्रेसचे वर्चस्व आहे ते तसेच कायम राहणार आहे. त्यासाठी प्रत्येक गावागावातील कार्यकर्ते कामाला लागले आहेत. - संदेश सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष२२ एप्रिलला स्थानिक सुट्टी जाहीरमतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी ज्या ग्रामपंचायत क्षेत्रात मतदान होणार आहे त्या क्षेत्रापुरती बुधवारी २२ एप्रिल रोजी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात यावी असे आदेश देण्यात आले आहेत.