शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

सावंतवाडी शहरात रोप वे ला पालिकेची मंजुरी

By admin | Updated: December 29, 2014 23:36 IST

दीपक केसरकर : सावंतवाडी पर्यटन महोत्सवाचा समारोप

सावंतवाडी : मी महाराष्ट्राचा झालो असलो तरी माझ्यावर पहिला अधिकार आहे तो सावंतवाडीकरांचा. त्यामुळे विकासाची पूर्ण जबाबदारी माझ्यावर आहे. सावंतवाडी शहरात रोप वे सारखा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. तो बीओटी तत्त्वावर राबवण्याची शासनाची भूमिका आहे, असे मत राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मांडले. केसरकर सावंतवाडी नगरपालिकेच्यावतीने आयोजित पर्यटन महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.यावेळी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, सुषमा देसाई, आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, सुभाष मयेकर, आशिष पेडणेकर, रूपेश राऊळ, मुख्याधिकारी विजयकुमार व्दासे, भुषण देसाई, नगरसेवक विलास जाधव, राजू बेग, गोविंद वाडकर, माजी नगराध्यक्षा पल्लवी केसरकर, सभापती शर्वरी धारगळकर, किर्ती बोंद्रे, वैशाली पटेकर, शुभांगी सुकी, माधवी मिशाळ, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख स्रेहा तेंडूलकर आदी यावेळी उपस्थीत होते.यावेळी केसरकर म्हणाले, सावंतवाडीने मला घडविले आहे. त्यामुळे सावंतवाडीचा विकास करणे ही माझी पूर्ण जबाबदारी आहे. अनेक शक्तीशी लढताना तुमची साथ नसती तर मी इथपर्यत पोचू शकलो नसतो, त्यामुळे मी जरी महाराष्ट्राचा झालो असलो तरी पहिला अधिकार हा सावंतवाडीकराचा आहे, असे सांगत सावंतवाडी परिसरात येत्या वर्षभरात एक तरी मोठा प्रकल्प आणणारच, असे सांगत सावंतवाडी नगरपालिकेच्यावतीने माझ्याकडे ज्या मागण्या ठेवल्या आहेत. त्या पूर्ण करण्यावर माझा भर राहणार आहे.सावंतवाडीत रोप वे प्रकल्प राबवण्यात येणार आहे. पर्यटकांना आकर्षित करणारा हा प्रकल्प असून शासन या प्रकल्पाला जास्तीत जास्त मदत करेल. पण हा प्रकल्प बीओटी तत्त्वावर कसा राबवण्यात येईल, यावर भर द्या, असा सल्लाही मंत्री केसरकर यांनी नगरपालिकेला दिला. संत गाडगेबाबा मंडई बांधणे हे शासनाचे कर्तव्य आहे. पण हा प्रकल्प बांधत असताना पालिकेने तेथील दुकानदार तसेच नगरपालिका किती प्रमाणात रककम उभी करू शकते, त्यातील उर्वरित रक्कम शासन पूर्ण करेल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सावंतवाडीतील विकास कामांबाबत उद्योगमंत्री व पालकमंत्री यांना माहीती दिली. तसेच कारिवडे, कोलगाव, मळगाव व माजगाव या परिसरात एखादा मोठा उद्योग यावा, अशी मागणी ही त्यांनी यावेळी उद्योगमंत्र्याकडे केली. तसेच पालिका जमिनीवर आरक्षणाबाबत शासनाने योग्य निर्णय घ्यावा, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.प्रास्ताविक नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केले तर आभार मुख्याधिकारी विजयकुमार व्दासे यांनी मानले. पालिकेच्यावतीने उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा सत्कार करण्यात आला. तसेच महोत्सव काळात यशस्वी काम करणाऱ्या पोलिसांचा तसेच सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)