शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडी शहरात रोप वे ला पालिकेची मंजुरी

By admin | Updated: December 29, 2014 23:36 IST

दीपक केसरकर : सावंतवाडी पर्यटन महोत्सवाचा समारोप

सावंतवाडी : मी महाराष्ट्राचा झालो असलो तरी माझ्यावर पहिला अधिकार आहे तो सावंतवाडीकरांचा. त्यामुळे विकासाची पूर्ण जबाबदारी माझ्यावर आहे. सावंतवाडी शहरात रोप वे सारखा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. तो बीओटी तत्त्वावर राबवण्याची शासनाची भूमिका आहे, असे मत राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मांडले. केसरकर सावंतवाडी नगरपालिकेच्यावतीने आयोजित पर्यटन महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.यावेळी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, सुषमा देसाई, आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, सुभाष मयेकर, आशिष पेडणेकर, रूपेश राऊळ, मुख्याधिकारी विजयकुमार व्दासे, भुषण देसाई, नगरसेवक विलास जाधव, राजू बेग, गोविंद वाडकर, माजी नगराध्यक्षा पल्लवी केसरकर, सभापती शर्वरी धारगळकर, किर्ती बोंद्रे, वैशाली पटेकर, शुभांगी सुकी, माधवी मिशाळ, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख स्रेहा तेंडूलकर आदी यावेळी उपस्थीत होते.यावेळी केसरकर म्हणाले, सावंतवाडीने मला घडविले आहे. त्यामुळे सावंतवाडीचा विकास करणे ही माझी पूर्ण जबाबदारी आहे. अनेक शक्तीशी लढताना तुमची साथ नसती तर मी इथपर्यत पोचू शकलो नसतो, त्यामुळे मी जरी महाराष्ट्राचा झालो असलो तरी पहिला अधिकार हा सावंतवाडीकराचा आहे, असे सांगत सावंतवाडी परिसरात येत्या वर्षभरात एक तरी मोठा प्रकल्प आणणारच, असे सांगत सावंतवाडी नगरपालिकेच्यावतीने माझ्याकडे ज्या मागण्या ठेवल्या आहेत. त्या पूर्ण करण्यावर माझा भर राहणार आहे.सावंतवाडीत रोप वे प्रकल्प राबवण्यात येणार आहे. पर्यटकांना आकर्षित करणारा हा प्रकल्प असून शासन या प्रकल्पाला जास्तीत जास्त मदत करेल. पण हा प्रकल्प बीओटी तत्त्वावर कसा राबवण्यात येईल, यावर भर द्या, असा सल्लाही मंत्री केसरकर यांनी नगरपालिकेला दिला. संत गाडगेबाबा मंडई बांधणे हे शासनाचे कर्तव्य आहे. पण हा प्रकल्प बांधत असताना पालिकेने तेथील दुकानदार तसेच नगरपालिका किती प्रमाणात रककम उभी करू शकते, त्यातील उर्वरित रक्कम शासन पूर्ण करेल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सावंतवाडीतील विकास कामांबाबत उद्योगमंत्री व पालकमंत्री यांना माहीती दिली. तसेच कारिवडे, कोलगाव, मळगाव व माजगाव या परिसरात एखादा मोठा उद्योग यावा, अशी मागणी ही त्यांनी यावेळी उद्योगमंत्र्याकडे केली. तसेच पालिका जमिनीवर आरक्षणाबाबत शासनाने योग्य निर्णय घ्यावा, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.प्रास्ताविक नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केले तर आभार मुख्याधिकारी विजयकुमार व्दासे यांनी मानले. पालिकेच्यावतीने उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा सत्कार करण्यात आला. तसेच महोत्सव काळात यशस्वी काम करणाऱ्या पोलिसांचा तसेच सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)