शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
4
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
5
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
6
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
7
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
8
"सेटवर ते मस्ती करायचे पण मी...", अशोक सराफ यांनी सांगितला 'करण अर्जुन'चा किस्सा
9
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
10
आमिर खानच्या घरी पोहचले २५ आयपीएस अधिकारी, चाहते पडले चिंतेत, म्हणाले - "रेड पडली आहे का?"
11
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले
12
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
13
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
14
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
15
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
16
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
17
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
18
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
19
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
20
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले

प्रत्येक शाळेत ‘चावडी वाचन’ राबवा

By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST

शेखर सिंह : प्रत्येक विद्यार्थ्याला कौशल्य सादर करण्याची संधी

सिंधुदुर्गनगरी : केंद्रशासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात १५ आॅगस्ट, २ आॅक्टोबर व ३ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेच्या प्रत्येक प्राथमिक शाळेत चावडी वाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचे कौशल्य सादर करण्याची संधी मिळावी, अध्ययन व अध्यापनाचे मूल्यमापन करून त्यामध्ये सुधारणा करता यावी यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शाळांनी चावडी वाचन कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी गुरूवारच्या पत्रकार परिषदेत केले.चावडी वाचन कार्यक्रमाविषयी माहिती देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी रत्नाकर धाकोरकर, सर्व शिक्षा अभियानचे कार्यक्रम अधिकारी स्मिता नलावडे, जिल्हा माहिती सहाय्यक अर्चना माने आदी उपस्थित होते.केंद्रशासनाच्या निर्देशानुसार सन २०१३-१४ पासून संपूर्ण राज्यभरात चावडी वाचन कार्यक्रम राबविला जातो. चालू शैक्षणिक वर्षातही कार्यक्रम राबविला जाणार आहे. त्यामध्ये काही बदल सुचविले आहेत. यापूर्वी संबंधित शाळा व्यवस्थापन समितीला सहभागी करून घेऊन हा चावडी वाचन कार्यक्रम शाळांमध्ये आयोजित करण्यात येत होता. मात्र, आता त्याचा विस्तार करत त्यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, विषय समित्यांचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, सदस्य यांनाही आमंत्रित करण्यात येणार आहे. याशिवाय सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, पंचायत समिती स्तरावरील सर्व यंत्रणा, लोकप्रतिनिधी, शिक्षणप्रेमी, शिक्षणतज्ज्ञ, युवक, समाजसेवक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व पालक यांचा सहभाग राहणार आहे. त्याबाबतचे नियोजन करण्यात येणार आहे. तर चावडी वाचन कार्यक्रमापूर्वी किमान तीन दिवस अगोदर सर्व संबंधितांना कळविण्यात येणार आहे, अशी माहिती शेखर सिंह यांनी दिली.यामुळे विद्यार्थ्यांना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांची प्रगती करून घेता येईल. शिक्षणाचा दर्जाबाबतही मूल्यमापन होईल. प्रत्येक शिक्षकाला आपण काय शिकवितो, त्याचे विद्यार्थ्यांना आकलन होते का? कोणत्या विद्यार्थ्याकडे जादा लक्ष देणे आवश्यक आहे याचेही मूल्यमापन करता येईल. त्यामुळे चावडी वाचन हा उपक्रम अतिशय चांगला आहे. (प्रतिनिधी)चावडी वाचनासाठी तीन दिवसांची निश्चितीसिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये प्रभावीपणे चावडी वाचन कार्यक्रम राबविण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. शासन निर्देशानुसार १५ आॅगस्ट, २ आॅक्टोबर व ३ जानेवारी या दिवशी चावडी वाचन कार्यक्रम दिवस निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार प्रत्येक शाळेत आयोजन केले जाईलच. त्या व्यतिरिक्त प्रत्येक शाळेने महिन्यातून एकदा शाळा व्यवस्थापन समिती व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत चावडी वाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मूल्यमापनचावडी वाचन कार्यक्रमावेळी जिल्हास्तरावरील वरिष्ठ अधिकारी अचानक भेट देत या कार्यक्रमाचे मूल्यमापन करणार आहेत. चावडी वाचन कार्यक्रम सहज, आनंददायी, अनौपचारीक वातावरणात घेण्यात येईल. कोणत्याही विद्यार्थ्यावर चावडी वाचन कार्यक्रमाचे दडपण येणार नाही याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यात चावडी वाचन कार्यक्रम प्रभावीपणे राबवून शैक्षणिक दर्जा सुधारावा, विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत अशी माहिती शेखर सिंह यांनी दिली.