शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
5
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
6
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
7
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
8
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
9
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
10
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
11
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
12
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
13
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
14
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
15
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
16
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
17
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
18
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
19
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
20
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा

सचिवांच्या शिफारशींवर हरकती नोंदविण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2015 00:18 IST

शिक्षण विभाग :‘आॅनलाईन’चा पर्याय उपलब्ध...

टेंभ्ये : शालेय शिक्षण विभाग प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीने दि. १० एप्रिल रोजी जाहीर केलेल्या शिफारशींवर हरकती नोंदवण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे. दि. ८ मे पर्यंत या शिफारशींवर आॅनलाईन हरकती नोंदवता येणार आहेत. समितीने केलेल्या शिफारशी आहेत तशा स्वीकारल्यास माध्यमिक शाळांवर त्याचा विपरीत परिणाम होणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.शासनाच्या ६६६.ी४िूं३्रङ्मल्ल.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावर २ूँङ्मङ्म’ या लिंकवर हा अहवाल जनतेच्या हरकतीसाठी टाकण्यात आला आहे. या अहवालानुसार शाळांचे स्तर निश्चित करण्यात आले आहेत. यानुसार इयत्ता पाचवी ते दहावीच्या माध्यमिक शाळांमधून इयत्ता पाचवीचा वर्ग वगळण्यात येणार आहे. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत असणाऱ्या शाळांना पाचवीचा वर्ग जोडण्यात येणार आहे.इयत्ता आठवी ते दहावीच्या माध्यमिक शाळांना इयत्ता सहावी व सातवीचे वर्ग जोडण्याची शिफारस करण्यात आली आहे. परंतु या प्रत्येक वर्गामध्ये किमान ३५ विद्यार्थी असणे बंधनकारक करण्यास आले आहेत. विद्यार्थ्यांची अट पूर्ण झाली नाही तर या शाळेचा आठवीचा वर्ग काढून टाकण्यात येणार आहे. इयत्ता नववीची दुसरी तुकडी टिकवण्यासाठी किमान ६१ विद्यार्थीसंख्या निश्चित करण्यात आली आहे. अशा अनेक जाचक शिफारशी सुचविण्यात आल्या आहेत.कोकणातील प्रादेशिक प्रतिकूलता लक्षात घेता विद्यार्थीसंख्येची अट पूर्ण करणे अशक्य आहे. समितीच्या शिफारशी आहे तशा स्वीकारल्या तर कोकणातील माध्यमिक शाळा बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागातील शाळांसमोर सध्या पटसंख्येची मोठी समस्या निर्माण झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्याची लोकसंख्या घटत असल्याने त्याचा परिणाम विद्यार्थी पटसंख्येवर होत आहे. या परिस्थितीचा विचार करुन कोकणासाठी पटसंख्येचे निकष निश्चित करणे आवश्यक आहे. या शिफारशींवर समाजातील सर्व घटकाना हरकती नोंदविता येणार आहेत. यासाठी ३ींूँी१ल्लङ्म१े२@ॅें्र’.ूङ्मे या मेल आयडीवर आपल्या सूचना ८ मे पर्यंत पाठवता येणार आहेत.प्रधान सचिवांचा अहवाल हा आराखडा आहे. याबाबत जनतेच्या सूचना मागवण्यात आल्या आहेत. जनतेच्या अभ्यासपूर्ण सूचनांचा विचार करुनच हा अहवाल स्वीकारला जाणार आहे. यामुळे जनतेने आपल्या अभ्यासपूर्वक सूचना मांडाव्यात, असे मत शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले. ते रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्या शिष्टमंडळाशी रत्नागिरी येथे बोलत होते. (वार्ताहर)सर्वांनी सूचना नोंदवाप्रधान सचिवांच्या शिफारशी अन्यायकारक आहेत. याबाबत सर्वांनी आपल्या अभ्यासपूर्वक सूचना नोंदवण्याचे आवाहन माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष भारत घुले यांनी केले आहे.