शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

वकील संघटनेची सरकारविरोधात निदर्शने, विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 14:21 IST

केंद्र सरकारने अर्थसंकल्पात देशातील वकिलांसाठी कल्याणकारी योजना समाविष्ट न केल्याने भारतीय विधिज्ञ परिषदेने पुकारलेल्या देशव्यापी निदर्शनं कार्यक्रमात मालवणातील वकिलांनी सहभाग घेतला. यावेळी वकिलांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन मालवण दिवाणी न्यायाधीश व मालवण तहसीलदारांना सादर करत मालवण न्यायालयाबाहेर सरकार विरोधात निदर्शन करत आपल्या मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी केली.

ठळक मुद्देविविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर कल्याणकारी योजनेत समावेश करण्याची आहे मागणी

मालवण : केंद्र सरकारने अर्थसंकल्पात देशातील वकिलांसाठी कल्याणकारी योजना समाविष्ट न केल्याने भारतीय विधिज्ञ परिषदेने पुकारलेल्या देशव्यापी निदर्शनं कार्यक्रमात मालवणातील वकिलांनी सहभाग घेतला. यावेळी वकिलांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन मालवण दिवाणी न्यायाधीश व मालवण तहसीलदारांना सादर करत मालवण न्यायालयाबाहेर सरकार विरोधात निदर्शन करत आपल्या मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी केली.यामध्ये मालवण तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. समीर गवाणकर, उपाध्यक्ष अ‍ॅड. हेमेंद्र गोवेकर, अ‍ॅड. गिरीश गिरकर, अ‍ॅड. सतीश धामापूरकर, अ‍ॅड. हर्षद तरवडकर, अ‍ॅड. अमेय कुलकर्णी, अ‍ॅड. अंबरीश गावडे, अ‍ॅड. सुदर्शन गिरसागर, अ‍ॅड. रोहित गरगटे, अ‍ॅड. अक्षय सामंत, अ‍ॅड. सुमित जाधव, अ‍ॅड. अमृता मोंडकर, अ‍ॅड. शिल्पा टिळक, अ‍ॅड. प्राची कुलकर्णी, अ‍ॅड. रश्मी मोंडकर, अ‍ॅड. सोनल पालव, अ‍ॅड. पूनम धुमाळ, अ‍ॅड. निवेदिता मयेकर, अ‍ॅड. मानसी चव्हाण, अ‍ॅड. प्रज्ञा जाधव, अ‍ॅड. स्नेहल यादव, अ‍ॅड. ममता पराडकर आदी वकील सहभागी झाले होते.देशातील वकिल बंधू व भगिनींसाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात कल्याणकारी योजना समाविष्ट न केल्याने सर्व वकील संघांमध्ये सभा बोलावून केंद्र व राज्य सरकारकडे मागण्या मांडाव्यात असा ठराव भारतीय विधिज्ञ परिषदेने घेतला होता. त्यानुसार या देशव्यापी निदर्शन कार्यक्रमात आज मालवण वकील संघाने सहभागी होत आपल्या मागण्यांसाठी मालवण दिवाणी न्यायाधीश व तहसीलदार यांना निवेदने सादर केली.देशातील सर्व बार असोसिएशनमध्ये वकिलांसाठी चेंबर, पुरेशी बिल्डिंग, बसण्याची व्यवस्था, सुसज्ज लायब्ररी, ई- लायब्ररी, इंटरनेट व्यवस्था, शौचालय व्यवस्था, महिला वकिलांसाठी स्वतंत्र बसण्याची व शौचालयाची व्यवस्था व्हावी, वकिलांच्या कुटुंबियांसाठी वैद्यकीय सेवा मिळावी, नवीन नोंदणीकृत वकिलांसाठी मानधन तसेच ज्यांचा वकिली व्यवसाय ५ वर्षांपर्यंत आहे त्यांना महिन्याला कमीत कमी १० हजार रुपये मानधन मिळावे, वकिलांसाठी व त्यांच्या पक्षकारांसाठी नैसर्गिक मृत्यू, अक्षमता किंवा आजारपण व अपघात झाल्यास आर्थिक मदत मिळावी, या सर्वांसाठी अर्थसंलकल्पात कल्याणकारी योजनेसाठी रुपये ५ हजार करोडची तरतूद करावी, वकिलांच्या निवासासाठी सरकारने कमीत कमी किंमतीत जागा उपलब्ध करून द्यावी, लिगल सर्व्हिसेस अ‍ॅथोरिटी अ‍ॅक्टमध्ये सुधारणा व दुरुस्ती करावी, निवृत्त न्यायाधीश विविध पदे दिलेल्या सर्व कायद्यात सुधारणा करावी जेणेकरून तेथे सक्षम वकिलांना नेमता येईल अशा विविध मागण्या यावेळी वकिलांनी निवेदनातून केल्या.

सध्या देशात वकिलांना अनेक अडचणींचा सामना करत काम करावे लागत असल्याने शासनाने या मागण्यांकडे लक्ष पुरवावे असे यावेळी मालवण वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. समीर गवाणकर यांनी सांगितले. 

टॅग्स :advocateवकिलsindhudurgसिंधुदुर्ग